शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

झारखंडमध्ये महिलेची हत्या; चोटी गँगमधील असल्याच्या संशयावरून केलं ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 09:26 IST

गेल्या काही दिवसांपाससून उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, मुंबई या भागांमध्ये महिलांची वेणी कापण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहेत.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपाससून उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, मुंबई या भागांमध्ये महिलांची वेणी कापण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहेत.झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यात वेणी कापणाऱ्या टोळीतील असल्याच्या संशयावरून एका महिलेला जमावाने ठेचून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. चोटी गँग असल्याचा संशय घेऊन शनिवारी तीन जणांवर  हल्ला करण्यात आला होता, पण त्यांची सुटका करण्यात यश आलं होत,

रांची, दि. 22- गेल्या काही दिवसांपाससून उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, मुंबई या भागांमध्ये महिलांची वेणी कापण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहेत. पण हा प्रकार नेमका कोण करतो हे अजूनही समोर आलेलं नाही. पण झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यात वेणी कापणाऱ्या टोळीतील असल्याच्या संशयावरून एका महिलेला जमावाने ठेचून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. चोटी गँग असल्याचा संशय घेऊन शनिवारी तीन जणांवर  हल्ला करण्यात आला होता, पण त्यांची सुटका करण्यात यश आलं होत, असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

साहिबगंजमध्ये जमावाने चोटी गँगमधील असल्याच्या संशयावरून काही जणांना ताब्यात घेतलं होतं,त्यात एका महिलेचाही समावेश होता. या सर्वावर चोटी गँगच्या कृत्यात सामील असल्याचं समजून हल्ला करण्यात आला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना त्यातील तीन जणांना वाचविण्यात यश आलं होतं. पण हल्ल्यात एक महिला जबर जखमी झाली होती. त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण त्यावेळी तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला, असं पोलिस अधीक्षक पी. मुरुगन यांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी या जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला होता पण तोपर्यंत या चौघांना गंभीरपणे मारहाण झालेली होती. साहिबगंज जिल्हय़ात वेणी कापण्याचा एकही प्रकार घडलेला नसताना हा हल्ला करण्यात आला. वेणी कापण्याच्या फक्त अफवा आहेत असंही, पोलिस अधीक्षक पी. मुरुगन म्हणाले आहेत. चोटी गँगमध्ये असल्याच्या संशयावरून महिलेची हत्या झाल्याच्या प्रकरणावर झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दास यांनी लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन केलं आहे. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मारल्या गेलेल्या महिलेच्या १४ वर्षीय मुलाची सरकार काळजी घेईल, असं दास यांनी सांगितलं. पूर्व सिंगभूम जिल्ह्यात वेणी कापण्याच्या घटना घडल्याच्या अफवा पसरल्याने पोलिसांनी सरपंच व लोक प्रतिनिधींची बैठक घेऊन या बाबत सविस्तर माहिती देत या घटना खोट्या असल्याचं सांगितलं आहे.