शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

'ट्रेनच्या खिडक्यांमधून...; तरुणीने तक्रार करताच नेटकऱ्यांनी वाचली वंदे भारतमधल्या त्रुटींची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 17:35 IST

Vande Bharat Express : एकीकडे वंदे भारत एक्सप्रेसचे कौतुक होत असताना दुसरीकडे प्रवाशांकडून ट्रेनमध्ये असलेल्या त्रुटींबाबतही प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Vande Bharat Express : वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी अनेकजण आतुरतेने वाट पाहतायत. बाह्य किंवा आंतरिक सौंदर्यासोबत वंदे भारत ट्रेन वेग आणि निसर्गरम्य दृश्यांपेक्षा बरेच काही अनुभवत देते.त्यामुळे अनेकजण आपल्या प्रवासाबद्दलही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. मात्र वंदे भारतबद्दल एका तरुणीने तिला आलेला वाईट अनुभव शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झालीय.

देशातील सर्वात लोकप्रिय ट्रेन वंदे भारतबाबत लोक खूप उत्सुक आहेत. मंत्र्यांपासून, अभिनेते आणि ब्लॉगर्सपर्यंत सर्वांनी वंदे भारतने  प्रवास करण्याबाबत आपापली मते मांडली आहेत. मात्र आता एका तरुणीने या ट्रेनबद्दलचा तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. वंदे भारत संदर्भात महिलेने सोशल मीडियावर केलेली टिप्पणी सध्या व्हायरल झाली आहे.

कोलकातमधल्या एका तरुणीने वंदे भारतमधील तिच्या पहिल्या प्रवासाबद्दल आणि जवळजवळ प्रत्येक गोष्टीबद्दल नकारात्मक बाबी शेअर केल्या आहेत. @epicnephrin_e या नावाने युजरच्या मते वंदे भारतच्या खिडक्या सूर्यप्रकाश रोखण्यासाठी पुरेशा प्रभावी नाहीत. तरुणीने सांगितले की, संपूर्ण प्रवासादरम्यान तिला तिच्या डेनिम जॅकेटने तिचा चेहरा झाकावा लागला होता.

तरुणीने वंदे भारत ट्रेनमधील जेवण देखील सामान्य असल्याचे म्हटलं. जेवणाबद्दल बोलताना तरुणीने म्हटलं की वंदे भारतमधील जेवण हे शताब्दीमधील गाड्यांमधील सरासरी भाड्याइतके आहे. मात्र, दुपारचे जेवण समाधानकारक असल्याचे तरुणीने सांगितले. स्वयंचलित दरवाजे आणि स्वच्छ स्वच्छतागृहांमुळे तरुणी प्रभावित झाली. ट्रेनमधील सर्व सूचनांसाठी तरुणीने ब्रेल लिपीतील भाषांतराचे कौतुक देखील केले. तरुणीने ट्रेनमधील तिचा संपूर्ण अनुभव फोटोंच्या माध्यमातून शेअर केला.

तरुणीच्या वंदे भारतच्या पोस्टला १.५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दुसरीकडे या पोस्टवर नेटकऱ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने वंदे भारतमध्ये सर्वात खराब ओव्हरहेड सामानाचे शेल्फ आहेत, असं म्हटलं आहे. ते शेल्फ खूपच अरुंद आहेत आणि बॅग बाहेर पडू नयेत यासाठीच पुरेसे आहेत, असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने, "होय मलाही याच समस्येचा सामना करावा लागला,जेवण देखील पूर्णपणे दयनीय आहे," असं म्हटलं आहे. "ट्रेनचा वेग वाढल्यावर एसी नीट काम करत नाही. ओव्हरहेड सामानाच्या जागेमुळे खिडकीच्या सीटला थंड हवा मिळत नाही. लोकांसाठीही मधल्या जागा अत्यंत अस्वस्थ असतात, असेही एका युजरने सांगितले. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेSocial Mediaसोशल मीडिया