शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

"३ मुलं माझ्या नवऱ्याची नाहीत तर प्रियकराची आहेत..."; विचित्र प्रेमकहाणीने चक्रावले पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 11:51 IST

होळीच्या दिवशी महिला नात्याने तिचा पुतण्या लागणाऱ्या तरुणासोबत पळून गेली. यानंतर पतीने हरिसिद्धी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बिहारमधील मोतिहारी येथून प्रेमप्रकरणाचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. तीन मुलांची आई तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. आता महिलेने पोलिसांसमोर दावा केला आहे की, ही तीन मुलं तिच्या पतीची नसून तिच्या प्रियकराची आहेत. हे संपूर्ण प्रकरण हरसिद्धी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. होळीच्या दिवशी महिला नात्याने तिचा पुतण्या लागणाऱ्या तरुणासोबत पळून गेली. यानंतर पतीने हरिसिद्धी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पुतण्यासोबत फरार झालेल्या ३० वर्षीय महिलेने सोमवारी हरसिद्धी पोलीस ठाण्यातील पोलिसांना फोन करून सांगितलं की, ही तीन मुलं तिच्या पतीची नसून तिच्या प्रियकराची आहेत आणि ती मुलं परत करणार नाही. या प्रेमप्रकरणामुळे पोलीसही हैराण झाले आहेत. संपूर्ण गावात याच घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. 

दाथी गावातील रहिवासी चुनमुन राम याचं २२ एप्रिल २०१४ रोजी मनीषा कुमारी हिच्याशी लग्न झालं होतं. चुनमुन रामने सांगितलं की, त्याच्या वडिलांचं २०१७ मध्ये निधन झालं. त्यानंतर तो बंगळुरूला मजूर म्हणून काम करण्यासाठी गेला. तेव्हापासून बहुतेक वेळ तो पैसे कमवण्यासाठी बाहेर असायचा. याच दरम्यान, तो घरी येत-जात असायचा.

चुनमुन म्हणाला की, जेव्हा पत्नीचे पुतण्या आकाश कुमारशी असलेले संबंध पाहिले तेव्हा त्याला सुरुवातीला काहीही संशय आला नाही. एकदा ऑगस्ट २०२४ मध्ये तो घरी आला तेव्हा त्याने त्याचा पुतण्या आणि पत्नी दोघांनाही एकत्र पाहिलं. यानंतर त्याने त्याची पत्नी मनीषा हिला तिच्या आईवडिलांच्या घरी पाठवल आणि तो बंगळुरूला गेला. यावेळी जेव्हा तो होळीसाठी घरी आला तेव्हा त्याला कळालं की त्याची पत्नी मनीषा तिच्या तीन मुलांसह तिचा प्रियकर आकाश कुमारसोबत तिच्या आईवडिलांच्या घरातून पळून गेली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिस