शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोनाची तमा न बाळगता गंगेला आला श्रद्धा व आस्थेचा पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 05:40 IST

‘बम भोले’ च्या गजरात हरिद्वार येथे पहिले शाही स्नान

किरण अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्क हरिद्वार : महाशिवरात्रीच्या पर्वावर ‘बम भोले’ व ‘हर हर महादेव’ चा गजर करीत शैव पंथीय आखाड्याचे पहिले शाही स्नान येथे उत्साहात पार पडले. विशेष म्हणजे कोरोना विषयक निर्बंधांची भीती न बाळगता देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक श्रद्धेने व आस्थेने गंगा स्नानासाठी येथे दाखल झाले आहेत. 

प्रयागराज नंतर हरिद्वार येथे होत असलेल्या कुंभ स्नानाची पहिली पर्वणी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर पार पडली, यात शैव पंथीय आखाड्यांनी शाही स्नान केले. महाराष्ट्रातील नाशिकच्या रामकुंडाप्रमाणे शाही स्नानाचे महत्त्व असलेल्या हरिद्वारच्या हर की पौडी येथे शाही स्नानाला प्रारंभ झाला, यात सर्वप्रथम श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्या नेतृत्वात साधू संन्यासी यांनी स्नान केले. जुना आखाडा, आवाहन, अग्नी, निरंजनी, आनंद, महानिर्वाणी, अटल आखाडा या आखाड्यांचे स्नान पार पडले. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरचे महंत शंकरानंद सरस्वती, आनंद आखाड्याचे सचिव महंत गणेशानंद सरस्वती, महंत गिरिजानंद, महंत रमेश गिरी (परभणी), अवधेश पुरी, सुमेर पुरी (हिंगोली),  महामंडलेश्वर राहुलेश्वरानंद गिरी(वसई, मुंबई), महंत कैवल्यगिरी (बुलढाणा), महंत हरिओम पुरी (अकोला), महामंडलेश्वर सुरेंद्र गिरी (लातूर) योग आनंद गिरी (शेगांव), गिरिजानंद सरस्वती (आळंदी), ईश्वर आनंद ब्रह्मचारी (औरंगाबाद), अर्जुन पुरी (बीड), विष्णू भारती (गेवराई) आदी साधू-महंत आपापल्या भक्तांसमवेत या शाही स्नानात सहभागी होते.  किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी, पायल गिरी, रागिणी गिरी (नाशिक), यांच्या नेतृत्वात किन्नरही स्नानात सहभागी झाले. 

मुख्यमंत्री पोहोचले स्वागतालाउत्तराखंडाच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ होताच हरिद्वार कुंभाला सामोरे जावे लागत असलेल्या तिरथ सिंह रावत यांनी सपत्नीक हर की पैडी येथील ब्रम्ह कुंडावर पोहोचून शाही स्नानासाठी आलेल्या विविध आखाड्याच्या संत महंतांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. उत्तराखंड राज्य शासनातर्फे शाही स्नानाच्या मिरवणुकांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात आली. 

ईश्वराप्रती श्रद्धा व आस्था अतूट असली तर त्यातून व्यक्तीचे मनोबल बळकट होते. शासनाने खबरदारीच्या पुरेशा योजना केल्या असून या मनोबलाच्या बळावरच कोरोनासारख्या संकटाशी मुकाबला करून हरिद्वारचा कुंभ यशस्वी होईल असा विश्वास आहे.- आचार्य महामंडलेश्वर, श्री बालकानंद गिरी,आनंद पीठाधीश्वर, हरिद्वार

वैष्णव पंथीय वृंदावनला यमुनातिरीदरम्यान शैव पंथीयांचे हरिद्वारमध्ये स्नान होत असताना वैष्णव संप्रदायाच्या आखाड्यांनी वृंदावन मध्ये बैठक घेऊन यमुनेत पवित्र स्नान केले. यावेळी तिन्ही आखाड्याचे प्रमुख महामंडलेश्वर व खालसा यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :riverनदीMahashivratriमहाशिवरात्रीcorona virusकोरोना वायरस बातम्या