शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

‘ते’ निकाल घटनेच्या चौकटीतच, चंद्रचूड स्पष्टच बोलले; अयोध्या, कलम ३७० प्रकरणावर प्रथमच खुलेपणाने मांडली मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 06:55 IST

अयोध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींनी निर्णयात कोणत्याही न्यायमूर्तींचे नाव दिले जाणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेतला होता, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

नवी दिल्ली : ‘अयोध्या प्रकरण, कलम ३७० यावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या चौकटीतच दिला,’ असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी एका मुलाखतीत स्पष्ट केले. 

अयोध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींनी निर्णयात कोणत्याही न्यायमूर्तींचे नाव दिले जाणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेतला होता, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले. ‘या खटल्याला विविध  दृष्टिकोनांचा, संघर्षाचा दीर्घ इतिहास आहे व खंडपीठाचा भाग असलेल्या सर्वांनी ठरवले की, हा न्यायालयाचा निर्णय असेल. अंतिम निकालातच नव्हे तर निकालातील कारणांमध्येही आम्ही एकत्र आहोत, असा स्पष्ट संदेश देणे ही त्यामागची कल्पना होती,’ असे  चंद्रचूड म्हणाले.

समलिंगी विवाह निकालाबद्दल...सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मंजुरी देण्याबाबतची याचिका फेटाळल्याबद्दल चंद्रचूड यांनी सांगितले की, एखाद्या खटल्याचा निकाल हा न्यायाधीशांसाठी कधीही वैयक्तिक नसतो आणि त्याला त्याचा कोणताही पश्चात्ताप नसतो. आता या खटल्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तो विषय संपला आहे.

कलम ३७०च्या निकालावरील टीकेबद्दलसरन्यायाधीशांनी घटनेतील कलम ३७० रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयावर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यास नकार दिला. ‘न्यायाधीश संविधान आणि कायद्याच्या चौकटीत एखाद्या खटल्याचा निर्णय घेतात,’ असे ते म्हणाले. 

कॉलेजियम व्यवस्थेबद्दल...उच्च न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांची नियुक्ती करणाऱ्या न्यायमूर्तींच्या कॉलेजियम प्रणालीत अधिक पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. कॉलेजियम प्रणालीमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRam Mandirराम मंदिरDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडArticle 370कलम 370