शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

‘ते’ निकाल घटनेच्या चौकटीतच, चंद्रचूड स्पष्टच बोलले; अयोध्या, कलम ३७० प्रकरणावर प्रथमच खुलेपणाने मांडली मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 06:55 IST

अयोध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींनी निर्णयात कोणत्याही न्यायमूर्तींचे नाव दिले जाणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेतला होता, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

नवी दिल्ली : ‘अयोध्या प्रकरण, कलम ३७० यावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या चौकटीतच दिला,’ असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी एका मुलाखतीत स्पष्ट केले. 

अयोध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींनी निर्णयात कोणत्याही न्यायमूर्तींचे नाव दिले जाणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेतला होता, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले. ‘या खटल्याला विविध  दृष्टिकोनांचा, संघर्षाचा दीर्घ इतिहास आहे व खंडपीठाचा भाग असलेल्या सर्वांनी ठरवले की, हा न्यायालयाचा निर्णय असेल. अंतिम निकालातच नव्हे तर निकालातील कारणांमध्येही आम्ही एकत्र आहोत, असा स्पष्ट संदेश देणे ही त्यामागची कल्पना होती,’ असे  चंद्रचूड म्हणाले.

समलिंगी विवाह निकालाबद्दल...सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मंजुरी देण्याबाबतची याचिका फेटाळल्याबद्दल चंद्रचूड यांनी सांगितले की, एखाद्या खटल्याचा निकाल हा न्यायाधीशांसाठी कधीही वैयक्तिक नसतो आणि त्याला त्याचा कोणताही पश्चात्ताप नसतो. आता या खटल्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तो विषय संपला आहे.

कलम ३७०च्या निकालावरील टीकेबद्दलसरन्यायाधीशांनी घटनेतील कलम ३७० रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयावर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यास नकार दिला. ‘न्यायाधीश संविधान आणि कायद्याच्या चौकटीत एखाद्या खटल्याचा निर्णय घेतात,’ असे ते म्हणाले. 

कॉलेजियम व्यवस्थेबद्दल...उच्च न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांची नियुक्ती करणाऱ्या न्यायमूर्तींच्या कॉलेजियम प्रणालीत अधिक पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. कॉलेजियम प्रणालीमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRam Mandirराम मंदिरDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडArticle 370कलम 370