शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

भारताच्या समृद्धीने होईल जगाचीही प्रगती; उत्तर प्रदेश गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे ठिकाण, PM नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 11:04 IST

उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे त्यांनी उद्घाटन केले. ही परिषद तीन दिवस चालणार असून, त्यात देश-विदेशातील महत्त्वाच्या कंपन्यांचे प्रतिनिधी व गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत.

लखनऊ : भारत जगाला समृद्धी मिळवून देणार आहे. भारत समृद्ध झाला, तर जगाचीही प्रगती होईल. उत्तर प्रदेश हे परकीय गुंतवणुकीसाठी अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे त्यांनी उद्घाटन केले. ही परिषद तीन दिवस चालणार असून, त्यात देश-विदेशातील महत्त्वाच्या कंपन्यांचे प्रतिनिधी व गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत. यावेळी मोदी म्हणाले की, भारतीय समाजातील लोकांच्या आकांक्षा आता सरकारला वेगाने काम करण्यासाठी प्रेरित करत आहेत. त्यामुळे विकासाच्या कामांनाही गती आली आहे. 

बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश यांचा फार विकास न झाल्याने, त्यांना पूर्वी ‘बिमारू’ राज्ये म्हटले जात असे. त्याचा संदर्भ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एके काळी बिमारू अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशने आता लोकांच्या मनात आशा निर्माण केली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत उत्तर प्रदेशने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता हे राज्य उत्तम कारभार, सुधारलेली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती यासाठी ओळखले जाते. त्यामुळे उद्योजकांना या राज्यात गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या परिषदेच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी मान्यवर उपस्थित होते. उद्योगपती मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, एन.चंद्रशेखरन यांचीही या  परिषदेत भाषणे झाली.

रिलायन्सची गुंतवणूक  ७५ हजार कोटींची उत्तर प्रदेशमध्ये ५-जी मोबाइल सेवा, रिटेल नेटवर्क, अक्षय ऊर्जा या क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज येत्या चार वर्षांत ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा या उद्योगसमूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली. या गुंतवणुकीमुळे उत्तर प्रदेशात अतिरिक्त एक लाख रोजगार उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसाय