शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

भारताच्या समृद्धीने होईल जगाचीही प्रगती; उत्तर प्रदेश गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे ठिकाण, PM नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 11:04 IST

उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे त्यांनी उद्घाटन केले. ही परिषद तीन दिवस चालणार असून, त्यात देश-विदेशातील महत्त्वाच्या कंपन्यांचे प्रतिनिधी व गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत.

लखनऊ : भारत जगाला समृद्धी मिळवून देणार आहे. भारत समृद्ध झाला, तर जगाचीही प्रगती होईल. उत्तर प्रदेश हे परकीय गुंतवणुकीसाठी अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे त्यांनी उद्घाटन केले. ही परिषद तीन दिवस चालणार असून, त्यात देश-विदेशातील महत्त्वाच्या कंपन्यांचे प्रतिनिधी व गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत. यावेळी मोदी म्हणाले की, भारतीय समाजातील लोकांच्या आकांक्षा आता सरकारला वेगाने काम करण्यासाठी प्रेरित करत आहेत. त्यामुळे विकासाच्या कामांनाही गती आली आहे. 

बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश यांचा फार विकास न झाल्याने, त्यांना पूर्वी ‘बिमारू’ राज्ये म्हटले जात असे. त्याचा संदर्भ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एके काळी बिमारू अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशने आता लोकांच्या मनात आशा निर्माण केली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत उत्तर प्रदेशने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता हे राज्य उत्तम कारभार, सुधारलेली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती यासाठी ओळखले जाते. त्यामुळे उद्योजकांना या राज्यात गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या परिषदेच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी मान्यवर उपस्थित होते. उद्योगपती मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, एन.चंद्रशेखरन यांचीही या  परिषदेत भाषणे झाली.

रिलायन्सची गुंतवणूक  ७५ हजार कोटींची उत्तर प्रदेशमध्ये ५-जी मोबाइल सेवा, रिटेल नेटवर्क, अक्षय ऊर्जा या क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज येत्या चार वर्षांत ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा या उद्योगसमूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली. या गुंतवणुकीमुळे उत्तर प्रदेशात अतिरिक्त एक लाख रोजगार उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसाय