शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

हिवाळी अधिवेशन: राहुल गांधी सुट्टीवर आहेत; लोकसभा अध्यक्षांनी सभागृहात सांगितले, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 17:09 IST

तसेच राहुल गांधी यांचं नाव प्रश्नोत्तराच्या पत्रिकेत छापील होतं.

नवी दिल्ली - संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं आहे. आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांच्या हजेरीचा उल्लेख करत सांगितलं की मी त्यांना प्रश्न विचारण्याची संधी देणार होतो. मंगळवारी लोकसभेत काँग्रेसचे खासदार के.सुरेश हे राहुल गांधी यांच्या सीटवरुन बोलण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी एलईडी स्क्रीनवर राहुल गांधी यांचे नाव पाहून लोकसभा अध्यक्षांनी के. सुरेश यांना त्यांच्या जागेवर जाण्याची सूचना केली. कारण राहुल गांधी सभागृहात उपस्थित नव्हते अन् त्यांचे नाव स्क्रीनवर दिसत होते. 

यावेळी बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, तुमची सीट रिक्त दाखवत आहे. तुम्ही ज्या सीटवरुन बोलत आहात ती राहुल गांधी यांची सीट आहे. राहुल गांधी आज सुट्टीवर आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा. यावेळी भाजपा खासदार राजीव प्रताप रुडी यांनी या घटनेवर भाष्य करताना सदस्यांनी त्यांच्या जागेवरुन बोलावं अशी मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली. कारण आपल्याला संपूर्ण देश बघत आहे, त्यामुळे टीव्ही स्क्रीनवर आपलं नावं चुकीचं जावू नये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सोमवारपासून राहुल गांधी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊनही उपस्थित दिसले नाहीत. 

तसेच राहुल गांधी यांचं नाव प्रश्नोत्तराच्या पत्रिकेत छापील होतं. ते जर उपस्थित असते तर त्यांना बोलण्याची संधी द्यायची होती असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. लोकसभा कार्यक्रमानुसार २८ नंबरवर राहुल गांधी यांचा प्रश्न छापील होता. केरळमध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनासंदर्भात ते प्रश्न विचारणार होते.  

दरम्यान, इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं. या ट्वीटरवर इंदिरा गांधींच्या आठवणींना राहुल यांनी उजाळा दिला आहे. वडील जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इंदिरा गांधी राजकारणात आल्या. त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. शास्त्री यांच्या निधनानंतर त्या देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधींना 1971मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली होती. भारतला सशक्त रुप देणाऱ्या अशा महिलेला शतश: अभिवादन आहे असं त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाom birlaओम बिर्ला