शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 13:56 IST

हिमाचल प्रदेश आणि गुजरात येथील विधानसभांच्या निवडणुकांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन उशिरा सुरु होईल अशी शक्य़ता वर्तवण्यात येत आहे.

ठळक मुद्दे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन या महिन्यात सुरु होण्याची आजिबात शक्यता नसून गुजरात निवडणुकींचा शेवटचा टप्पा 12 डिसेंबरला संपल्यावरच ते सुरु होण्याची शक्यता आहे. साधारणतः संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून सुरु होते आणि

नवी दिल्ली- हिमाचल प्रदेश आणि गुजरात येथील विधानसभांच्या निवडणुकांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन उशिरा सुरु होईल अशी शक्य़ता वर्तवण्यात येत आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन गुजरात निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यावरच सुरु होईल असे सरकारमधील काही उच्च सूत्रांनी सांगितल्याचे द इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत नमूद केले आहे.

या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन या महिन्यात सुरु होण्याची आजिबात शक्यता नसून गुजरात निवडणुकींचा शेवटचा टप्पा 12 डिसेंबरला संपल्यावरच ते सुरु होण्याची शक्यता आहे. साधारणतः संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून सुरु होते आणि ख्रिसमसच्या आसपास संपते. एका वृत्तसंस्थेने यापुर्वी यावर्षीचे हिवाळी अधिवेशन कमी दिवसांचे असू शकते आणि त्याच्या तारखा संसदीय कामकाज विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतरच समजतील असे वृत्त प्रसिद्ध केले होते. संसदेतील बहुतांश सदस्य गुजरात निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असतील त्यामुळे सरकारने अधिवेशन पुढे ढकलावे अशी प्रतिक्रीया एका वरिष्ठ मंत्र्यांने मिंट वर्तमानपत्राकडे व्यक्त केली होती. संसदेतील भाजपा आणि कॉंग्रेसचे सदस्य गुजरात निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असताना केवळ तिसऱ्या आघाडीचेच लोक संसदेत शिल्लक राहतील त्यामुळे बहुतांश सद्सय अनुपस्थित असताना चर्चा करणे अवघड होईल असे या मंत्र्यांने मिंटशी बोलताना सांगितले होते.

गुजरात-हिमाचल प्रदेशात कोण बाजी मारणार?

 हिमाचल प्रदेशात भाजपाचा भगवा ध्वज फडकण्याच्या तयारीत असला तरी गुजरातेत मात्र पक्षाला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांना विजयरथ अखंडित ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये निवडणूक दौरे ज्या वेगाने चालवले आहेत, त्यामुळे भाजपाच्या नेत्यांना सुखाने झोपही येईनाशी झाली आहे. गुजरातच्या आधी हिमाचल प्रदेशात मतदान होणार आहे. पण राहुल गांधी व काँग्रेसने सारी शक्ती गुजरातमध्ये लावली असून, हिमाचल प्रदेशला मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या खांद्यावर सोपवले आहे. हिमाचल प्रदेश आपल्या हातातून निसटत चालल्याची जाणीव काँग्रेस नेत्यांना झाली आहे. त्यामुळे चांगली शक्यता असलेल्या गुजरातेत अधिक प्रयत्न करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. काँग्रेसने गुजरात जिंकण्यासाठी जातींच्या समीकरणांच्या आधारे धोरणे आखली. गुजरातेत ४० टक्के लोकसंख्या मागासवर्गीय आहे. विधानसभेच्या एकूण १८२ जागा असून, मागासवर्ग ७५ जागांवर प्रभाव टाकू शकतो, हे पाहून राहुल गांधी यांनी मागासवर्गीयांचा नेता अल्पेश ठाकूर याला काँग्रेसमध्ये आणले. काँग्रेसचे दुसरे लक्ष्य होते पाटीदार (पटेल) समाज. त्यामुळे हार्दिक पटेल यांच्याशी चर्चा सुरू आहे.