शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 13:56 IST

हिमाचल प्रदेश आणि गुजरात येथील विधानसभांच्या निवडणुकांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन उशिरा सुरु होईल अशी शक्य़ता वर्तवण्यात येत आहे.

ठळक मुद्दे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन या महिन्यात सुरु होण्याची आजिबात शक्यता नसून गुजरात निवडणुकींचा शेवटचा टप्पा 12 डिसेंबरला संपल्यावरच ते सुरु होण्याची शक्यता आहे. साधारणतः संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून सुरु होते आणि

नवी दिल्ली- हिमाचल प्रदेश आणि गुजरात येथील विधानसभांच्या निवडणुकांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन उशिरा सुरु होईल अशी शक्य़ता वर्तवण्यात येत आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन गुजरात निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यावरच सुरु होईल असे सरकारमधील काही उच्च सूत्रांनी सांगितल्याचे द इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत नमूद केले आहे.

या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन या महिन्यात सुरु होण्याची आजिबात शक्यता नसून गुजरात निवडणुकींचा शेवटचा टप्पा 12 डिसेंबरला संपल्यावरच ते सुरु होण्याची शक्यता आहे. साधारणतः संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून सुरु होते आणि ख्रिसमसच्या आसपास संपते. एका वृत्तसंस्थेने यापुर्वी यावर्षीचे हिवाळी अधिवेशन कमी दिवसांचे असू शकते आणि त्याच्या तारखा संसदीय कामकाज विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतरच समजतील असे वृत्त प्रसिद्ध केले होते. संसदेतील बहुतांश सदस्य गुजरात निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असतील त्यामुळे सरकारने अधिवेशन पुढे ढकलावे अशी प्रतिक्रीया एका वरिष्ठ मंत्र्यांने मिंट वर्तमानपत्राकडे व्यक्त केली होती. संसदेतील भाजपा आणि कॉंग्रेसचे सदस्य गुजरात निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असताना केवळ तिसऱ्या आघाडीचेच लोक संसदेत शिल्लक राहतील त्यामुळे बहुतांश सद्सय अनुपस्थित असताना चर्चा करणे अवघड होईल असे या मंत्र्यांने मिंटशी बोलताना सांगितले होते.

गुजरात-हिमाचल प्रदेशात कोण बाजी मारणार?

 हिमाचल प्रदेशात भाजपाचा भगवा ध्वज फडकण्याच्या तयारीत असला तरी गुजरातेत मात्र पक्षाला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांना विजयरथ अखंडित ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये निवडणूक दौरे ज्या वेगाने चालवले आहेत, त्यामुळे भाजपाच्या नेत्यांना सुखाने झोपही येईनाशी झाली आहे. गुजरातच्या आधी हिमाचल प्रदेशात मतदान होणार आहे. पण राहुल गांधी व काँग्रेसने सारी शक्ती गुजरातमध्ये लावली असून, हिमाचल प्रदेशला मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या खांद्यावर सोपवले आहे. हिमाचल प्रदेश आपल्या हातातून निसटत चालल्याची जाणीव काँग्रेस नेत्यांना झाली आहे. त्यामुळे चांगली शक्यता असलेल्या गुजरातेत अधिक प्रयत्न करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. काँग्रेसने गुजरात जिंकण्यासाठी जातींच्या समीकरणांच्या आधारे धोरणे आखली. गुजरातेत ४० टक्के लोकसंख्या मागासवर्गीय आहे. विधानसभेच्या एकूण १८२ जागा असून, मागासवर्ग ७५ जागांवर प्रभाव टाकू शकतो, हे पाहून राहुल गांधी यांनी मागासवर्गीयांचा नेता अल्पेश ठाकूर याला काँग्रेसमध्ये आणले. काँग्रेसचे दुसरे लक्ष्य होते पाटीदार (पटेल) समाज. त्यामुळे हार्दिक पटेल यांच्याशी चर्चा सुरू आहे.