शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

घटनेच्या प्रास्ताविकेतून 'समाजवाद' शब्द काढावा, भाजप खासदाराच्या विधेयकावर विरोधकांची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 14:46 IST

खासदार केजे अल्फोन्स यांनी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतील 'समाजवाद' हा शब्द काढून त्याजागी 'न्यायसंगत' हा शब्द टाकण्यात यावा, अशा मागणीचे विधेयक त्यांनी मांडले.

नवी दिल्ली : सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सभागृहात गदारोळ होत आहे. यादरम्यान शुक्रवारी(3 डिसेंबर) माजी केंद्रीय मंत्री आणि राजस्थानचे भाजप खासदार केजे अल्फोन्स यांनी राज्यसभेत एक खासगी विधेयक मांडले, त्याला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला. यानंतर सभागृहाचे उपसभापती हरिवंश यांनी विधेयक राखीव ठेवले.

IAS ची नोकरी सोडून राजकारणी बनलेले केरळचे केजे अल्फोन्स यांनी खाजगी घटना दुरुस्ती विधेयक सादर केले. राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतील 'समाजवाद' हा शब्द काढून त्याजागी 'न्यायसंगत' हा शब्द टाकण्यात यावा, अशा मागणीचे विधेयक त्यांनी मांडले. पण, त्यांनी हे विधेयक मांडताच विरोधकांनी त्या विधेयकांला जोरदार विरोध केला. यावेळी भाजपवर विरोधकांकडून संविधानात बदल करत असल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी राजद नेते खासार मनोज झा यांनी विधेयकाला विरोध केला आणि हे विधेयक म्हणजे संविधानाच्या आत्म्याला दुखवणे असल्याची प्रतिक्रिया दिली. सभागृह चालवण्याच्या प्रक्रियेतील नियम क्रमांक 62चा संदर्भ देत अशी खाजगी विधेयके राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय मांडता येत नाहीत, असे ते म्हणाले. अशाप्रकारची विधेयके मांडण्यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी किंवा शिफारस हवी, असेही ते म्हणाले. 

यानंतर उपसभापतींनी या विधेयकाला राष्ट्रपतींची मान्यता किंवा शिफारस नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर उपसभापतींनी भाजप खासदाराला या विधेयकावर सभागृहाचा आक्षेप असल्याचे सांगितले. या प्रकरणी सभापती कोणताही निर्णय घेणार नसून, सभागृहच निर्णय घेईल, असे ते म्हणाले. हा गदारोळ पाहून सत्ताधारी पक्षाच्या एका सदस्याने उपसभापतींना विधेयक राखीव ठेवण्याचा सल्ला दिला, तो सर्वांनी मान्य केला आणि ते विधेयक राखीव ठेवण्यात आले. 

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा