शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उन्हाळ्यापर्यंत तरी हिवाळी अधिवेशन होणार काय ?, प्रकाश राज यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 14:03 IST

नवी दिल्ली- नोटाबंदी, जातीयवाद आदी मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका करणा-या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केंद्रावर टीकेची झोड उठवली आहे.

नवी दिल्ली- नोटाबंदी, जातीयवाद आदी मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका करणा-या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केंद्रावर टीकेची झोड उठवली आहे. उन्हाळ्यापर्यंत तरी हिवाळी अधिवेशन होणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित करत भाजपावर निशाणा साधला आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतं. परंतु यंदा अद्यापही अधिवेशन झालेलं नाही. अधिवेशन बोलावण्यास होणाऱ्या दिरंगाईबद्दल प्रकाश राज यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.अजून थंडी पडलेली नाही काय?, मग हिवाळी अधिवेशन का बोलावलं नाही, तुम्ही दुसरीकडे कुठं व्यस्त आहात का? निवडणुकीआधी उत्तर देणं तुम्हाला लाजिरवाणं वाटतंय का', असे सवाल प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावरील वारंवार होणा-या टीकेला उत्तर देण्यासाठी ‘जस्ट आस्किंग’, असं हॅशटॅग करत टीकाकारांनाही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘जस्ट आस्किंग’च्या माध्यमातून प्रकाश राज हे मोदी सरकारला नेहमीच अनेक प्रश्न विचारत असतात. नोटाबंदीच्या निर्णयानंतरही त्यांनी मोदी सरकारवर टि्वटरवरून टीका केली होती.गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत मौन बाळगणारे मोदी हे माझ्यापेक्षाही चांगले अभिनेते आहेत. त्यामुळे माझे राष्ट्रीय पुरस्कार हे त्यांनाच देण्यात यावेत, असंही ते म्हणाले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. देशात घडणाऱ्या चुकीच्या घटनांविरोधात आवाज उठवल्यानंतर आपला आवाज दाबण्याचं काम हे ट्रोल्स करतात. पण आपण न घाबरता जे योग्य आहे ते बोलत राहिलं पाहिजे, असं मत त्यानं एकदा मांडलं आहे. 

 

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा