शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार की नाही ? सुषमा स्वराज यांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 13:08 IST

केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परराष्ट्रमंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिकेवरुन केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे

नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट संबंध सुधारण्यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीमारेषेपलीकडून वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन होत असल्या कारणाने भारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका होण्यासाठी सध्या योग्य परिस्थिती नसल्याचं सांगितलं जात आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परराष्ट्रमंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिकेवरुन केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. परराष्ट्र सचिव एस जयशंकरदेखील या बैठकीला उपस्थित होते. सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर भारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका होण्याची शक्यता थोडी कमीच आहे. 

केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली असता त्यांना दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध सुधारण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी मानवतेच्या आधारे महिला आणि ज्येष्ठ कैद्यांना सोडण्याचं सुचवलं. त्यांनी स्पष्ट केलं की, सीमारेषेपलीकडून वारंवार होत असलेल्या फायरिंगमुळे क्रिकेट मालिका सुरु करण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती नाहीये. सुषमा स्वराज यांनी या बैठकीत 2017 मध्ये सीमारेषेपलीकडून फायरिंगच्या 800 घटना घडल्याच्या घटना घडल्याचा उल्लेखही यावेळी केला. मात्र 2016 मध्ये हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला ठार करण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीरमधील हिंसेच्या घटनांमध्ये घट झाल्याचा दावा केला जात आहे. कुलभूषण जाधव प्रकरणामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. 

दोन्ही देशांमधील तणाव पाहता सध्या क्रिकेट सामने खेळले जात नाहीयेत. पाकिस्तानने दोन वेळा भारताचा दौरा केला आहे, मात्र भारताने अद्यापही पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. याआधी सामान्य परिस्थितीतही दोन्ही देशांमध्ये किमान एकतरी क्रिकेट मालिका खेळली जात असे. मात्र पाकिस्तानने आपली आडमुठी भूमिका कायम ठेवल्याने भारताने त्यांच्यासोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सुषमा स्वराज यांच्या भुमिकेनंतर भारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका होण्याची शक्यता फार कमी आहे.  

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजCricketक्रिकेट