शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

भारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार की नाही ? सुषमा स्वराज यांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 13:08 IST

केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परराष्ट्रमंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिकेवरुन केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे

नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट संबंध सुधारण्यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीमारेषेपलीकडून वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन होत असल्या कारणाने भारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका होण्यासाठी सध्या योग्य परिस्थिती नसल्याचं सांगितलं जात आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परराष्ट्रमंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिकेवरुन केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. परराष्ट्र सचिव एस जयशंकरदेखील या बैठकीला उपस्थित होते. सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर भारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका होण्याची शक्यता थोडी कमीच आहे. 

केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली असता त्यांना दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध सुधारण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी मानवतेच्या आधारे महिला आणि ज्येष्ठ कैद्यांना सोडण्याचं सुचवलं. त्यांनी स्पष्ट केलं की, सीमारेषेपलीकडून वारंवार होत असलेल्या फायरिंगमुळे क्रिकेट मालिका सुरु करण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती नाहीये. सुषमा स्वराज यांनी या बैठकीत 2017 मध्ये सीमारेषेपलीकडून फायरिंगच्या 800 घटना घडल्याच्या घटना घडल्याचा उल्लेखही यावेळी केला. मात्र 2016 मध्ये हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला ठार करण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीरमधील हिंसेच्या घटनांमध्ये घट झाल्याचा दावा केला जात आहे. कुलभूषण जाधव प्रकरणामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. 

दोन्ही देशांमधील तणाव पाहता सध्या क्रिकेट सामने खेळले जात नाहीयेत. पाकिस्तानने दोन वेळा भारताचा दौरा केला आहे, मात्र भारताने अद्यापही पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. याआधी सामान्य परिस्थितीतही दोन्ही देशांमध्ये किमान एकतरी क्रिकेट मालिका खेळली जात असे. मात्र पाकिस्तानने आपली आडमुठी भूमिका कायम ठेवल्याने भारताने त्यांच्यासोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सुषमा स्वराज यांच्या भुमिकेनंतर भारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका होण्याची शक्यता फार कमी आहे.  

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजCricketक्रिकेट