शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सारांश: हवापाण्याची पाच वर्षांत वाट लागणार?

By सचिन लुंगसे | Updated: May 15, 2022 10:51 IST

कधी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहायची अन् पाऊस पडला तर एकदम धो...धो... सगळीकडे पाणीच पाणी.... शेती, पिके वाहून जाणारी अतिवृष्टीच.

सचिन लुंगसे, वरिष्ठ वार्ताहर, मुंबई

कधी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहायची अन् पाऊस पडला तर एकदम धो...धो... सगळीकडे पाणीच पाणी.... शेती, पिके वाहून जाणारी अतिवृष्टीच. एवढंच कशाला यंदाच्या उन्हाळ्याने 122 वर्षांचा विक्रम मोडला. मार्च सर्वाधिक उष्ण महिना नोंदविला गेला. हे सगळं 100-150 वर्षांत कधीतरी व्हायचं. मात्र, आता सातत्याने हे घडतंय. थंडीतही तसंच पडली तर एकदम रक्त गोठवणारी.  हे असंच सुरू राहिलं तर पुढील पिढ्यांसमोर अन्नापाण्यापासून अनेक संकटं उभी ठाकणार आहेत. मुंबईसारखं महाकाय शहर बुडणार तर नाही ना, अशीही भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.   

अहवाल काय म्हणतात? 

गेल्या पंधरा वर्षांत आलेल्या अहवालानुसार, हरितगृह वायू उत्सर्जन वाढत असून, त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. त्याचे परिणाम नागरिकांना आता जाणवू लागले आहेत. जागतिक तापमानवाढीचा परिणाम शेती, आरोग्य, अर्थव्यवस्थेवर होत असतो.

चक्रीवादळे वाढणार

ऊर्जानिर्मितीसाठी आपण जी साधने वापरतो त्यातूनही उत्सर्जन होते. कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. हा वायू हवेच्या वरच्या थरात जातो तेव्हा उष्णता शोषली जाते. कार्बन डायऑक्साईडमुळे तापमान वाढते. समुद्राचे तापमान वाढत आहे. परिणामी अंटार्टिका आणि आर्टिक ध्रुवावर तापमान वाढते. याचा परिणाम बर्फ वितळतो. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढले की चक्रीवादळाचा धोका वाढतो. समुद्राचे तापमान वाढले की अल निनो मान्सूनला घातक ठरतो. त्याचा प्रभाव मान्सूनवर होतो. पर्यावरणातला प्रत्येक घटक एकमेकांशी निगडित आहे. सतत राहणारे पावसाचे दिवस कमी होत आहेत. कमी दिवसांत जास्त पाऊस पडत आहे.

राजकीय इच्छाशक्ती हवी

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी प्रत्येक राज्याला आपला हवामान कृती आरखडा कठोर पद्धतीने राबवावा लागणार आहे. राजकीय इच्छाशक्ती आणखी पणाला लावावी लागणार आहे. जेव्हा राजकीय पक्षांच्या अंजेड्यात स्वच्छ हवा हा विषय येईल तेव्हा आपण जागतिक तापमानवाढीविरोधातील अर्धी लढाई जिंकलेली असेल.

संकट मोठे आहे 

गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या उष्णतेच्या लाटा, कमी दिवसांत पडणारा जास्त पाऊस, लांबलेले मान्सूनचे आगमन हे सगळे आपण अनुभवले आहे.

नवी आव्हाने पेलणार कशी?

पॅरिस करारानुसार आपल्याला उत्सर्जन कमी करत दशकभरात तापमान दीड अंशाने कमी राहील, यासाठी काम करायचे आहे. आपल्या तापमानवाढीचा वेग कमी करायचा आहे. हे आव्हानात्मक आहे. कोरोनादरम्यान आपण स्वच्छ पर्यावरण अनुभवले. मात्र, आपण निसर्गाची एवढी हानी केली आहे की तो बदल तात्पुरता राहिला.

टॅग्स :weatherहवामान