शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

सारांश: हवापाण्याची पाच वर्षांत वाट लागणार?

By सचिन लुंगसे | Updated: May 15, 2022 10:51 IST

कधी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहायची अन् पाऊस पडला तर एकदम धो...धो... सगळीकडे पाणीच पाणी.... शेती, पिके वाहून जाणारी अतिवृष्टीच.

सचिन लुंगसे, वरिष्ठ वार्ताहर, मुंबई

कधी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहायची अन् पाऊस पडला तर एकदम धो...धो... सगळीकडे पाणीच पाणी.... शेती, पिके वाहून जाणारी अतिवृष्टीच. एवढंच कशाला यंदाच्या उन्हाळ्याने 122 वर्षांचा विक्रम मोडला. मार्च सर्वाधिक उष्ण महिना नोंदविला गेला. हे सगळं 100-150 वर्षांत कधीतरी व्हायचं. मात्र, आता सातत्याने हे घडतंय. थंडीतही तसंच पडली तर एकदम रक्त गोठवणारी.  हे असंच सुरू राहिलं तर पुढील पिढ्यांसमोर अन्नापाण्यापासून अनेक संकटं उभी ठाकणार आहेत. मुंबईसारखं महाकाय शहर बुडणार तर नाही ना, अशीही भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.   

अहवाल काय म्हणतात? 

गेल्या पंधरा वर्षांत आलेल्या अहवालानुसार, हरितगृह वायू उत्सर्जन वाढत असून, त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. त्याचे परिणाम नागरिकांना आता जाणवू लागले आहेत. जागतिक तापमानवाढीचा परिणाम शेती, आरोग्य, अर्थव्यवस्थेवर होत असतो.

चक्रीवादळे वाढणार

ऊर्जानिर्मितीसाठी आपण जी साधने वापरतो त्यातूनही उत्सर्जन होते. कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. हा वायू हवेच्या वरच्या थरात जातो तेव्हा उष्णता शोषली जाते. कार्बन डायऑक्साईडमुळे तापमान वाढते. समुद्राचे तापमान वाढत आहे. परिणामी अंटार्टिका आणि आर्टिक ध्रुवावर तापमान वाढते. याचा परिणाम बर्फ वितळतो. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढले की चक्रीवादळाचा धोका वाढतो. समुद्राचे तापमान वाढले की अल निनो मान्सूनला घातक ठरतो. त्याचा प्रभाव मान्सूनवर होतो. पर्यावरणातला प्रत्येक घटक एकमेकांशी निगडित आहे. सतत राहणारे पावसाचे दिवस कमी होत आहेत. कमी दिवसांत जास्त पाऊस पडत आहे.

राजकीय इच्छाशक्ती हवी

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी प्रत्येक राज्याला आपला हवामान कृती आरखडा कठोर पद्धतीने राबवावा लागणार आहे. राजकीय इच्छाशक्ती आणखी पणाला लावावी लागणार आहे. जेव्हा राजकीय पक्षांच्या अंजेड्यात स्वच्छ हवा हा विषय येईल तेव्हा आपण जागतिक तापमानवाढीविरोधातील अर्धी लढाई जिंकलेली असेल.

संकट मोठे आहे 

गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या उष्णतेच्या लाटा, कमी दिवसांत पडणारा जास्त पाऊस, लांबलेले मान्सूनचे आगमन हे सगळे आपण अनुभवले आहे.

नवी आव्हाने पेलणार कशी?

पॅरिस करारानुसार आपल्याला उत्सर्जन कमी करत दशकभरात तापमान दीड अंशाने कमी राहील, यासाठी काम करायचे आहे. आपल्या तापमानवाढीचा वेग कमी करायचा आहे. हे आव्हानात्मक आहे. कोरोनादरम्यान आपण स्वच्छ पर्यावरण अनुभवले. मात्र, आपण निसर्गाची एवढी हानी केली आहे की तो बदल तात्पुरता राहिला.

टॅग्स :weatherहवामान