शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

सारांश: हवापाण्याची पाच वर्षांत वाट लागणार?

By सचिन लुंगसे | Updated: May 15, 2022 10:51 IST

कधी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहायची अन् पाऊस पडला तर एकदम धो...धो... सगळीकडे पाणीच पाणी.... शेती, पिके वाहून जाणारी अतिवृष्टीच.

सचिन लुंगसे, वरिष्ठ वार्ताहर, मुंबई

कधी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहायची अन् पाऊस पडला तर एकदम धो...धो... सगळीकडे पाणीच पाणी.... शेती, पिके वाहून जाणारी अतिवृष्टीच. एवढंच कशाला यंदाच्या उन्हाळ्याने 122 वर्षांचा विक्रम मोडला. मार्च सर्वाधिक उष्ण महिना नोंदविला गेला. हे सगळं 100-150 वर्षांत कधीतरी व्हायचं. मात्र, आता सातत्याने हे घडतंय. थंडीतही तसंच पडली तर एकदम रक्त गोठवणारी.  हे असंच सुरू राहिलं तर पुढील पिढ्यांसमोर अन्नापाण्यापासून अनेक संकटं उभी ठाकणार आहेत. मुंबईसारखं महाकाय शहर बुडणार तर नाही ना, अशीही भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.   

अहवाल काय म्हणतात? 

गेल्या पंधरा वर्षांत आलेल्या अहवालानुसार, हरितगृह वायू उत्सर्जन वाढत असून, त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. त्याचे परिणाम नागरिकांना आता जाणवू लागले आहेत. जागतिक तापमानवाढीचा परिणाम शेती, आरोग्य, अर्थव्यवस्थेवर होत असतो.

चक्रीवादळे वाढणार

ऊर्जानिर्मितीसाठी आपण जी साधने वापरतो त्यातूनही उत्सर्जन होते. कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. हा वायू हवेच्या वरच्या थरात जातो तेव्हा उष्णता शोषली जाते. कार्बन डायऑक्साईडमुळे तापमान वाढते. समुद्राचे तापमान वाढत आहे. परिणामी अंटार्टिका आणि आर्टिक ध्रुवावर तापमान वाढते. याचा परिणाम बर्फ वितळतो. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढले की चक्रीवादळाचा धोका वाढतो. समुद्राचे तापमान वाढले की अल निनो मान्सूनला घातक ठरतो. त्याचा प्रभाव मान्सूनवर होतो. पर्यावरणातला प्रत्येक घटक एकमेकांशी निगडित आहे. सतत राहणारे पावसाचे दिवस कमी होत आहेत. कमी दिवसांत जास्त पाऊस पडत आहे.

राजकीय इच्छाशक्ती हवी

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी प्रत्येक राज्याला आपला हवामान कृती आरखडा कठोर पद्धतीने राबवावा लागणार आहे. राजकीय इच्छाशक्ती आणखी पणाला लावावी लागणार आहे. जेव्हा राजकीय पक्षांच्या अंजेड्यात स्वच्छ हवा हा विषय येईल तेव्हा आपण जागतिक तापमानवाढीविरोधातील अर्धी लढाई जिंकलेली असेल.

संकट मोठे आहे 

गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या उष्णतेच्या लाटा, कमी दिवसांत पडणारा जास्त पाऊस, लांबलेले मान्सूनचे आगमन हे सगळे आपण अनुभवले आहे.

नवी आव्हाने पेलणार कशी?

पॅरिस करारानुसार आपल्याला उत्सर्जन कमी करत दशकभरात तापमान दीड अंशाने कमी राहील, यासाठी काम करायचे आहे. आपल्या तापमानवाढीचा वेग कमी करायचा आहे. हे आव्हानात्मक आहे. कोरोनादरम्यान आपण स्वच्छ पर्यावरण अनुभवले. मात्र, आपण निसर्गाची एवढी हानी केली आहे की तो बदल तात्पुरता राहिला.

टॅग्स :weatherहवामान