शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 15:37 IST

"जर आपल्या पक्षाला सन्मानास्पद जागा दिल्या गेल्या नाही, तर हिंदुस्तानी अवाम मोर्चा एकटा निवडणूक लढेल आणि शंभर जागांवर उमेदवार उभे करेल."

केंद्रीय मंत्री तथा हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) चे अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी रविवारी आपल्या बोधगया येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले आहे. यावेळी, "कोणत्याही परिस्थितीत मान्यताप्राप्त पक्ष बनणे हे आपल्या पक्षाचे ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी पक्षाला किमान आठ जागा जिंकणे आवश्यक आहे. तसेच, एकूण मतांपैकी सहा टक्के एवढी मते मिळवणे आवश्यक आहे. एनडीए आघाडीत आपल्याला १५ जागा दिल्या तरच हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे, कारण सर्व जागा जिंकणे शक्य नसते," असे मांझी यांनी म्हटले आहे.

"जर आपल्या पक्षाला सन्मानास्पद जागा दिल्या गेल्या नाही, तर हिंदुस्तानी अवाम मोर्चा एकटा निवडणूक लढेल आणि शंभर जागांवर उमेदवार उभे करेल, असा इशाराह जितन राम मांझी यांनी दिला आहे. एवढेच नाही, तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ्यात आपले १० ते १५ हजार मतदार आहेत आणि या आधारावर आपण निवडणुकीत एकटे ६% मते मिळवू शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे. 

याच बरोबर, पक्षाची स्थापना होऊन दहा वर्षे झाली आहेत आणि आतापर्यंत मान्यता नसलेला पक्ष राहणे आपल्यासाठी अपमानास्पद आहे. त्यामुळे, या निवडणुकीत आपल्यासाठी "करो या मरो" स्थिती असल्याचेही ते म्हणाले. यामुळे, विरोधकांची इच्छा पूर्ण होणार का...? NDA मध्ये फुट पडणार का...? अशी चर्चा सुरू झाली आहे.

एनडीएमध्ये आपली ताकद असल्याचा दावा करत मांझी म्हणाले, आपला पक्ष पैसे खर्च न करता गर्दी जमवतो, तर इतर पक्ष पैशाच्या जोरावर गर्दी जमवतात. एनडीएच्या नेत्यांनाही हे माहिती आहे. जागावाटपात प्रत्यक्षात कोणता पक्ष जिंकू शकतो, हेही पाहिले जाईल. मांझी यांनी विश्वास व्यक्त केला की, आपल्याल पुरेशा जागा मिळतील आणि २०२५ मध्ये आपल्या पक्षाला मान्यता मिळेल.

टॅग्स :BiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी