शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 15:37 IST

"जर आपल्या पक्षाला सन्मानास्पद जागा दिल्या गेल्या नाही, तर हिंदुस्तानी अवाम मोर्चा एकटा निवडणूक लढेल आणि शंभर जागांवर उमेदवार उभे करेल."

केंद्रीय मंत्री तथा हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) चे अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी रविवारी आपल्या बोधगया येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले आहे. यावेळी, "कोणत्याही परिस्थितीत मान्यताप्राप्त पक्ष बनणे हे आपल्या पक्षाचे ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी पक्षाला किमान आठ जागा जिंकणे आवश्यक आहे. तसेच, एकूण मतांपैकी सहा टक्के एवढी मते मिळवणे आवश्यक आहे. एनडीए आघाडीत आपल्याला १५ जागा दिल्या तरच हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे, कारण सर्व जागा जिंकणे शक्य नसते," असे मांझी यांनी म्हटले आहे.

"जर आपल्या पक्षाला सन्मानास्पद जागा दिल्या गेल्या नाही, तर हिंदुस्तानी अवाम मोर्चा एकटा निवडणूक लढेल आणि शंभर जागांवर उमेदवार उभे करेल, असा इशाराह जितन राम मांझी यांनी दिला आहे. एवढेच नाही, तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ्यात आपले १० ते १५ हजार मतदार आहेत आणि या आधारावर आपण निवडणुकीत एकटे ६% मते मिळवू शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे. 

याच बरोबर, पक्षाची स्थापना होऊन दहा वर्षे झाली आहेत आणि आतापर्यंत मान्यता नसलेला पक्ष राहणे आपल्यासाठी अपमानास्पद आहे. त्यामुळे, या निवडणुकीत आपल्यासाठी "करो या मरो" स्थिती असल्याचेही ते म्हणाले. यामुळे, विरोधकांची इच्छा पूर्ण होणार का...? NDA मध्ये फुट पडणार का...? अशी चर्चा सुरू झाली आहे.

एनडीएमध्ये आपली ताकद असल्याचा दावा करत मांझी म्हणाले, आपला पक्ष पैसे खर्च न करता गर्दी जमवतो, तर इतर पक्ष पैशाच्या जोरावर गर्दी जमवतात. एनडीएच्या नेत्यांनाही हे माहिती आहे. जागावाटपात प्रत्यक्षात कोणता पक्ष जिंकू शकतो, हेही पाहिले जाईल. मांझी यांनी विश्वास व्यक्त केला की, आपल्याल पुरेशा जागा मिळतील आणि २०२५ मध्ये आपल्या पक्षाला मान्यता मिळेल.

टॅग्स :BiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी