शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळणार?; सुप्रीम कोर्ट आज देणार ऐतिहासिक निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 10:12 IST

मागील वर्षी १४ डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्याबाबत दिल्ली हायकोर्टासह इतर विविध न्यायालयांतील याचिकांवर केंद्राकडून म्हणणे मागितले होते

नवी दिल्ली – पुरुषाने पुरुषाशी अन् महिलेने महिलेशी अशा समलिंगी विवाह कायद्याला मान्यता द्यायची की नाही यावर सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार आहे. ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने सलग १० दिवस सुनावणी घेऊन ११ मे रोजी या प्रकरणाचा निकाल राखीव ठेवला होता. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्य अध्यक्षतेत न्या. संजय किशन कौल, न्या. एस रविंद्र भट, न्या. हिमा कोहली आणि न्या. पीएस नरसिम्हा यांनी यावर सुनावणी घेतली होती.

सुप्रीम कोर्टात १८ एप्रिलपासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. सुप्रीम कोर्टाने यात स्पष्ट केले होते की, या विषयावर संसद काय प्रतिक्रिया देईल या अपेक्षेने कोणतीही घटनात्मक घोषणा करू शकत नाही. तर सुनावणीवेळी केंद्र सरकारने समलिंगी विवाह कायद्याला मान्यता द्यावी या याचिकेला विरोध केला होता. इतकेच नाही तर समलिंगी कायद्याला मान्यता द्यायची की नाही याचा अधिकार संसदेला आहे. कोर्टाला नाही असंही केंद्र सरकारने स्पष्ट केले होते.

काय आहे प्रकरण?

मागील वर्षी १४ डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्याबाबत दिल्ली हायकोर्टासह इतर विविध न्यायालयांतील याचिकांवर केंद्राकडून म्हणणे मागितले होते. २५ नोव्हेंबरला २ वेगवेगळ्या समलिंगी जोडप्याच्या याचिकांवर केंद्राला नोटीस पाठवली होती. यावर्षीच्या ६ जानेवारीला विविध कोर्टातील याचिका सुप्रीम कोर्टाने स्वत:कडे ट्रान्सफर केल्या.

समलैंगिकांनी दाखल केलेल्या या याचिकांमध्ये विशेष विवाह कायदा, परदेशी विवाह कायदा आदींसह विवाहाशी संबंधित अनेक कायदेशीर तरतुदींना आव्हान देत समलिंगी विवाहाला मान्यता देण्याची मागणी केली होती. आपल्या पसंतीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्याचा अधिकार LGBTQ (लेस्बियन, गे, बायसेक्सुअल, ट्रान्सजेंडर आणि क्वीर) समुदायाला त्यांच्या मुलभूत अधिकारांचा भाग म्हणून द्यावी. एका याचिकेत विशेष विवाह कायदा १९५४ ला जेंडर न्यूट्रल बनवण्याची मागणी केली होती. जेणेकरून कुठल्याही व्यक्तीसोबत सेक्सुअल ओरिएंटेशनमुळे भेदभाव करू नये.

केंद्र सरकारने केला विरोध

समलिंगी विवाह कायद्याला केंद्र सरकारने विरोध केला आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होण्यापूर्वी केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करत या याचिका फेटाळण्याची मागणी केली. केंद्राने म्हटलं की, सुप्रीम कोर्ट आयपीसी कलम ३७७ ला रद्दबातल केले असले तरी याचा अर्थ असा नाही की याचिकाकर्ते समलिंगी विवाह हा त्यांचा मुलभूत अधिकार असल्याचा दावा करेल. समलिंगी विवाहाला मान्यता देऊ शकत नाही. कारण कायद्यात पती आणि पत्नी यांची परिपूर्ण व्याख्या आहे. त्यानुसार दोघांना कायदेशीर अधिकार आहे. समलिंगी विवाहात पती-पत्नीला वेगवेगळे कसे मानले जाईल? त्याचसोबत समलिंगी विवाहाला मान्यता देण्याने दत्तक घेणे, घटस्फोट, पालन-पोषण, वारसा इत्यादी मुद्द्यांमध्येही अनेक समस्या उद्भावतील. कारण या संबंधित सर्व कायदेशीर तरतुदी या पुरुष आणि महिला यांच्यातील विवाहावर आधारित आहेत असं केंद्राने म्हटलं.

सुप्रीम कोर्टाने काय काय म्हटलं?

सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्व टिप्पणी दिली होती. कोर्टाने म्हटलं होते की, समलैंगिकांना एकत्र राहण्याबाबत सरकारने लग्न म्हणावे अथवा नाही परंतु काही ना काही लेबल असणे गरजेचे आहे. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता न देता समलैंगिकांना इतर योजनांचा लाभ दिला जाऊ शकतो का याचा सरकारने विचार करावा. समलिंगी प्रकरणात कुणा एक पार्टनरला मुल दत्तक घेण्यापासून रोखले नाही. जर मुलगा शाळेत जायला लागला तर सरकार या मुलाला सिंगल पॅरेंट चाईल्ड म्हणून वागणूक देऊ शकत नाही. कमीत कमी या मुलाला तरी लाभ मिळायला हवा असं कोर्टाने म्हटलं. ६ सप्टेंबर २०१८ रोजी सुप्रीम कोर्टाने समलैंगिक असणे गुन्हा नाही म्हटलं. त्यावेळी एका सामान्य नागरिकाला जो अधिकार आहे तो समलैंगिकांनाही आहे. सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे असं म्हणत आयपीसी कलम ३७७ रद्द ठरवले. त्यानंतर सहमतीने दोन समलैंगिक जोडप्यांच्या संबंधांना गुन्हा मानले जात नाही. त्यामुळे आजच्या निकालात कोर्ट समलिंगी विवाहाला मान्यता देणार की नाही याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGay Marriageसमलिंगी विवाह