शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:58 IST

विमानातून प्रवास करताना सामान घेऊन जाण्याचे नियम आहे. नियमापेक्षा जास्त सामान असल्यास पैसे द्यावे लागतात, अशीच पद्धती रेल्वेतही सुरू होणार असल्याची माहिती समोर आली. त्यावर रेल्वेमंत्री काय बोलले?

Railway Luggage Charges: रेल्वेतून प्रवास करताना आता मर्यादित स्वरूपातच सामान घेऊन जाता येणार. जास्तीचे सामान असेल, तर पैसे मोजावे लागणार, अशी बातमी दिली गेली. पण, हे वृत्त केंद्रीय रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी फेटाळून लावले आहे. अनेक दशकांपासून असा नियम आहे की, प्रवाशी सोबत कितीही सामान घेऊ जाऊ शकतात. आता कोणताही नवीन नियम बनवला गेलेला नाही, असे वैष्णव यांनी स्पष्ट केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आजतक वृत्तवाहिनीशी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, जास्त सामानावर कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही. अनेक दशकांपासून प्रवाशी कितीही सामान घेऊन जाऊ शकतात. जास्त सामान घेऊन जात असेल, तर दंड आकारला जात नाही. आता कोणताही नवीन नियम तयार केला गेलेला नाही, अशी माहिती वैष्णव यांनी दिली. 

आधी अशी माहिती समोर आली होती की, भारतीय रेल्वेनेही आता विमानाप्रमाणेच सामानाबद्दल नियम तयार केले आहेत. निर्धारित वजनापेक्षा जास्त सामान जर रेल्वेतून नेल्यास त्या प्रवाशांना जास्तीचे पैसे द्यावे लागणार, असा नियम असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले गेले होते. 

रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले होते की, हा नियम आधीपासूनच अस्तित्वात आहे, फक्त त्याची सक्तीने अमलबजावणी केली जात नाही. या नियमानुसार निर्धारित केलेल्या वजनापेक्षा कमी सामानच मोफत नेता येऊ शकते. पण, सामानाचे वजन त्यापेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त पैसे द्यावे लागणार. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवrailwayरेल्वे