शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

राहुल गांधीही 'मन की बात' करणार?, लवकरच ऑनलाइन पॉडकास्ट सुरू करण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 11:26 IST

राहुल गांधी यांचे  ट्विटरवर 14.4 मिलियन आणि फेसबुकवर 3.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

ठळक मुद्देनरेंद्र मोदी हे रेडिओच्या माध्यमातून 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधत आहेत.पॉडकास्ट एक ऑडिओ मेसेज किंवा डिस्कसन आहे. ज्याद्वारे डिजिटल माध्यमातून रिले किंवा प्रसारित केले जाऊ शकते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेडिओच्या माध्यमातून 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी पॉडकास्ट कार्यक्रम सुरू करणार असल्याची शक्यता आहे. 

यासंदर्भात काँग्रेसच्या एका नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले की,  "सध्या आम्ही योजना आखत आहोत आणि त्यावर कसे काम करता येईल. यावर चर्चा करीत आहोत. तसेच, आम्ही तज्ञांचा सल्ला घेत आहोत." याबाबतचे वृत्त हिंदी न्यूज १८ ने दिले आहे. 

पॉडकास्ट एक ऑडिओ मेसेज किंवा डिस्कसन आहे. ज्याद्वारे डिजिटल माध्यमातून रिले किंवा प्रसारित केले जाऊ शकते. काँग्रेस नेत्याने सांगितले की, "एकदा यासंदर्भातील गोष्टी अंतिम होऊ द्या. त्यानंतर राहुल गांधी या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांच्या 'मन की बात'ला उत्तर देतील." तसेच, लिंक्डइनसह इतर प्लॅटफॉर्मवरही आम्ही विचार करत आहोत, असेही या काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपले यूट्यूब चॅनेल लॉन्च केले होते. मात्र, लॉकडाऊच्या काळात याचा जास्तकरून वापर करण्यास सुरुवात केली. या यूट्यूब चॅनेलचे आतापर्यंत 294,000 सब्सक्राइबर आहेत.

राहुल गांधी यांनी लॉकडाऊन दरम्यान मजुरांशी साधलेला संवाद 7,52,000 लोकांनी पाहिला आहे. तर आरोग्य तज्ज्ञ आशिष झा आणि कोरोनो व्हायरसबद्दल प्रोफेसर जोहान गिसेके यांच्याशी केलेल्या संभाषणाचा व्हिडिओ 90,000 लोकांपर्यंत पोहोचला होता. याचबरोबर, राहुल गांधी यांचे  ट्विटरवर 14.4 मिलियन आणि फेसबुकवर 3.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम्सच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या नेत्याने असा दावा केला आहे की, कोरोनो विषाणूमुळे लॉकडाऊन दरम्यान पक्षाच्या सोशल मीडिया मोहिमेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 2 मे रोजी झालेले 'Speak Up India’ ऑनलाइन अभियान चांगले यशस्वी झाले. यामध्ये 5.7 मिलियनहून अधिक आपले मेसेज पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले.

दरम्यान, काँग्रेसच्या या योजनेवर मुंबईतील पॉडकास्टर अमित वर्मा यांनी सांगितले की, "नेत्यांनी नागरिकांशी संवाद साधणे महत्वाचे आहे. पॉडकास्टिंग हा संभाषण करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. मात्र, त्यावेळी राजकीय नेत्यांनी दोन्ही बाजूने संवाद साधावा. त्यांना लोकांशीच नव्हे तर लोकांशी बोलण्याचा मार्ग शोधावा लागेल." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMan ki Baatमन की बात