शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

राहुल गांधीही 'मन की बात' करणार?, लवकरच ऑनलाइन पॉडकास्ट सुरू करण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 11:26 IST

राहुल गांधी यांचे  ट्विटरवर 14.4 मिलियन आणि फेसबुकवर 3.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

ठळक मुद्देनरेंद्र मोदी हे रेडिओच्या माध्यमातून 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधत आहेत.पॉडकास्ट एक ऑडिओ मेसेज किंवा डिस्कसन आहे. ज्याद्वारे डिजिटल माध्यमातून रिले किंवा प्रसारित केले जाऊ शकते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेडिओच्या माध्यमातून 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी पॉडकास्ट कार्यक्रम सुरू करणार असल्याची शक्यता आहे. 

यासंदर्भात काँग्रेसच्या एका नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले की,  "सध्या आम्ही योजना आखत आहोत आणि त्यावर कसे काम करता येईल. यावर चर्चा करीत आहोत. तसेच, आम्ही तज्ञांचा सल्ला घेत आहोत." याबाबतचे वृत्त हिंदी न्यूज १८ ने दिले आहे. 

पॉडकास्ट एक ऑडिओ मेसेज किंवा डिस्कसन आहे. ज्याद्वारे डिजिटल माध्यमातून रिले किंवा प्रसारित केले जाऊ शकते. काँग्रेस नेत्याने सांगितले की, "एकदा यासंदर्भातील गोष्टी अंतिम होऊ द्या. त्यानंतर राहुल गांधी या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांच्या 'मन की बात'ला उत्तर देतील." तसेच, लिंक्डइनसह इतर प्लॅटफॉर्मवरही आम्ही विचार करत आहोत, असेही या काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपले यूट्यूब चॅनेल लॉन्च केले होते. मात्र, लॉकडाऊच्या काळात याचा जास्तकरून वापर करण्यास सुरुवात केली. या यूट्यूब चॅनेलचे आतापर्यंत 294,000 सब्सक्राइबर आहेत.

राहुल गांधी यांनी लॉकडाऊन दरम्यान मजुरांशी साधलेला संवाद 7,52,000 लोकांनी पाहिला आहे. तर आरोग्य तज्ज्ञ आशिष झा आणि कोरोनो व्हायरसबद्दल प्रोफेसर जोहान गिसेके यांच्याशी केलेल्या संभाषणाचा व्हिडिओ 90,000 लोकांपर्यंत पोहोचला होता. याचबरोबर, राहुल गांधी यांचे  ट्विटरवर 14.4 मिलियन आणि फेसबुकवर 3.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम्सच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या नेत्याने असा दावा केला आहे की, कोरोनो विषाणूमुळे लॉकडाऊन दरम्यान पक्षाच्या सोशल मीडिया मोहिमेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 2 मे रोजी झालेले 'Speak Up India’ ऑनलाइन अभियान चांगले यशस्वी झाले. यामध्ये 5.7 मिलियनहून अधिक आपले मेसेज पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले.

दरम्यान, काँग्रेसच्या या योजनेवर मुंबईतील पॉडकास्टर अमित वर्मा यांनी सांगितले की, "नेत्यांनी नागरिकांशी संवाद साधणे महत्वाचे आहे. पॉडकास्टिंग हा संभाषण करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. मात्र, त्यावेळी राजकीय नेत्यांनी दोन्ही बाजूने संवाद साधावा. त्यांना लोकांशीच नव्हे तर लोकांशी बोलण्याचा मार्ग शोधावा लागेल." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMan ki Baatमन की बात