शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेत बोलणार, कृषी कायद्यांवर उत्तर देणार ?

By महेश गलांडे | Updated: February 8, 2021 08:54 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होईल. केंद्र सरकार या कायद्यातील बदलाला तयार आहे, पण शेतकरी आंदोलकांच्या मागणीनुसार तिन्ही कायदे रद्द करण्यास सरकार तयार नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होईल. केंद्र सरकार या कायद्यातील बदलाला तयार आहे, पण शेतकरी आंदोलकांच्या मागणीनुसार तिन्ही कायदे रद्द करण्यास सरकार तयार नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्याचा प्रस्तावावर राज्यसभेत आज चर्चा होत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करु शकतात. देशात गेल्या 72 दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर अद्यापही तोडगा निघाला नाही. केंद्र सरकारने लागू केलेल्या 3 कृषी कायद्यांना विरोध करत, हे शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सीमारेषेवर सुरु आहे. यासंदर्भात कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी अनेकदा संसदेत चर्चा केली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात राज्यसभेत बोलतील, अशी शक्यता आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होईल. केंद्र सरकार या कायद्यातील बदलाला तयार आहे, पण शेतकरी आंदोलकांच्या मागणीनुसार तिन्ही कायदे रद्द करण्यास सरकार तयार नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. शेतकरी नेते आणि सरकारमध्ये आत्तापर्यंत तब्बल 12 वेळा चर्चा झाली आहे, पण अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यामुळे, शेतकरी आंदोलन कधी संपुष्टात येईल, हा प्रश्न सर्वांसाठीच अनुत्तरीत असा आहे.     

भाजपाने 5 फेब्रुवारी रोजी राज्यसभेतील सदस्यांसाठी व्हीप जारी केला होता, भाजपाने आपल्या सर्वच खासदारांना 8 ते 12 फेब्रुवारी रोजी खासदारांना संसद सभागृहात हजर राहण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे काँग्रेसनेही सर्वच खासदारांना सोमवारी संसदेत उपस्थित राहण्याचे सांगितले होते. त्यामुळे, सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे, कारण कृषी कायद्यांना अुनुसरून सभागृहात चर्चा घडविण्याची मागणी काँग्रेसकडून वारंवार होत आहे. काँग्रेस नेते आणि पदाधिकारी शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत असून मोदी सरकारविरुद्ध रस्त्यावरही उतरताना दिसून येत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी सभागृहातून काहीजण वॉकआऊट करुन आपला निषेध नोंदविण्याची शक्यता आहे. शेतकरी कायद्यावरुन विरोधी पक्ष पहिल्या दिवशीपासूनच चर्चेची मागणी करत, सभागृहात गोंधळ घालत आहे. त्यासंदर्भात 17 विरोधी पक्षांची एक बैठकही घेण्यात आली आहे. त्यामध्ये, लोकसभा सभागृहात विरोधी पक्षाने रणनिती कशी आखायची, याची चर्चा झाल्याचे समजते.  

कृषी कायद्यांना विरोध ठराविकच

केंद्रीय कृषी कायद्यांना हाेत असलेला विराेध हा ठराविक भागापुरता मर्यादित असून, लवकरच काेंडी फुटेल, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह ताेमर यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याचा आराेपही त्यांनी काॅंग्रेसवर केला. शेतकऱ्यांचे आंदाेलन ठराविक भागापुरते मर्यादित आहे. सरकार शेतकऱ्यांसाेबत चर्चा करण्यास तयार आहे. लवकरच काेंडी फुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ताेमर यांनी काॅंग्रेसच्या भूमिकेवरही टीका केली. सत्तेवर असताना काॅंग्रेसने शेतकऱ्यांसाठी काहीच का केले नाही?, असा प्रश्नही ताेमर यांनी केला.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदी