शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

'जमावाचा हिंसाचार खपवून घेणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 03:37 IST

जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराचा आपण व केंद्र सरकार तीव्र निषेध करीत असून, अशा घटनांतील आरोपींविरोधात कडक कारवाई करावी

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराचा आपण व केंद्र सरकार तीव्र निषेध करीत असून, अशा घटनांतील आरोपींविरोधात कडक कारवाई करावी, अशा सूचना राज्यांना दिल्या आहेत. अफवा पसरविल्या जाऊ नयेत म्हणून सोशल मीडिया कंपन्यांनीही काळजी घ्यावी, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले.स्वामी अग्निवेश यांना झारखंडमध्ये झालेली मारहाण, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना केलेले ट्रोलिंग आदी मुद्दे काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी उपस्थित केले होते. त्यावर निवेदन करताना राजनाथ सिंह म्हणाले की, जमावाच्या हिंसाचारात काही निरपराधांचे बळीही गेले आहेत. कायदा व सुव्यवस्था हा राज्यांचा विषय असला तरी स्थिती बिघडत असेल तर केंद्र सरकार गप्प बसणार नाही.जयंत सिन्हा यांचा विरोधकांकडून निषेधझारखंड येथील एका मांस विक्रेत्याला ठार मारणाºया सात आरोपींचा पुष्पहार घालून सत्कार करणाºया केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांचा विरोधी सदस्यांनी जोरदार निषेध केला. विमानतळांच्या आधुनिकीकरणावर उत्तर देण्यासाठी सिन्हा उभे राहताच विरोधी सदस्यांनी अध्यक्षांसमोरील जागेत जाऊन घोषणा देण्यास सुरुवात केली. जयंत सिन्हा यांनी माफी मागावी, अशी त्यांची मागणी होती. त्याकडे दुर्लक्ष करीत सिन्हा यांनी उत्तर देणे सुरूच ठेवले. नितीन गडकरी यांनी विरोधकांना आपापल्या जागेवर जाण्याची विनंती केली. अर्थात सिन्हा यांचे उत्तर संपताच विरोधक आपल्या जागी गेले. आरोपींचा सत्कार केल्याबद्दल सिन्हा यांनी याआधी दिलगिरी व्यक्त केली आहे.>भाजपा सदस्यांकडूनच निषेधलोकांचे बळी घेणे, चोप देणे हे नित्याचे प्रकार झाले असल्याचा आरोप करून वेणुगोपाल म्हणाले की, हे घडूनही केंद्र सरकार शांतच आहे. एका प्रकरणातील आरोपींचा तर केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनीच सत्कार केला. याला कायद्याचे राज्य म्हणायचे का? ही स्थिती गंभीर असून लोकशाही वाचविण्यासाठी सरकारने वेळीच पावले उचलावीत. जमावाचा हिंसाचार रोखण्यासाठी कडक कायदा करायला हवा. त्यांचे भाषण सुरू असताना भाजपाचे काही सदस्य त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत होते. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह