शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: 'कोणालाही सोडणार नाही मग तो...', अमित शाहांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 20:52 IST

Delhi Violence: अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी आतापर्यंत ४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देराजधानी दिल्लीत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी लोकसभेत चर्चा झाली.'दंगल घडवण्यासाठी ३०० हून अधिक लोक यूपीमधून आले होते.''२७ फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत ७०० एफआयआर दाखल झाल्या आहेत'

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी लोकसभेत चर्चा झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच, दिल्ली दंगलीसाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल. मग, तो कोणत्याही समाजाचा असो किंवा पार्टीचा, सर्वांवर कारवाई करण्यात येईल, असे अमित शाह यांनी सांगितले.

सीएएवरून ईशान्य दिल्लीत दंगली उसळली. काही तासांत दिल्लीत दंगल उसळली. इतक्या कमी वेळात कुठल्याही कटाशिवाय दंगल उसळू शकत नाही. दंगल घडवण्यासाठी ३०० हून अधिक लोक यूपीमधून आले होते. या दंगल प्रकरणी कटकारस्थान रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दिशेने तपास सुरू असून याप्रकरणी कारवाई करताना कुठल्याही निष्पापावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचे अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले.

याचबरोबर, अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी आतापर्यंत ४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १५३ शस्त्र जप्त केली गेली आहेत. तसंच शांतता प्रस्थापित करण्यासाठी २५ फेब्रुवारीपासून ६५० बैठका घेण्यात आल्या आहेत. दिल्ली दंगल प्रकरणी एकूण २, ६४७ जणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यापैकी काहींना अटकही केली गेली. २७ फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत ७०० एफआयआर दाखल झाल्या आहेत, अशी माहिती अमित शहा यांनी दिली.

याशिवाय, अमित शाह म्हणाले की, "मी दंगलीत झालेल्या नुकसानाची आकडेवारी सादर करू शकतो. पण त्यामध्ये हिंदू किंवा मुस्लिम असा भेदभाव करू शकत नाही. तुम्हीसुद्धा असे काही करू नका. दंगलीत किती मुस्लिमांचे नुकसान झाले, किती हिंदूंचे नुकसान झाले ही काही विचारण्याची पद्धत नाही. या दंगलीत ज्यांचे नुकसान झाले ते सर्व भारतीय आहेत. दिल्लीत झालेल्या या दंगलीत ५२ भारतीयांचा मृत्यू झाला. तर ५२६ भारतीय जखमी झाले. तसेच ३०० अधिक भारतीयांची घरे जाळली गेली." 

टॅग्स :Amit Shahअमित शहाdelhi violenceदिल्ली