शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 12:28 IST

स्थानिक लोकांनी जम्मू-काश्मीर चालवावे, केंद्राने नव्हे

सुरणकोट/नवी दिल्ली : भाजप बहुजन समाजाच्या विरूद्ध असून, त्यांनी कितीही खोटे पसरवले तरी आम्ही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही,” असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान ‘जात जनगणना हा शब्द उच्चारायलाही घाबरतात आणि त्यांना बहुजनांना त्यांचे हक्क मिळू द्यायचे नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. ‘सर्वंकष जातगणनेनंतर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा दूर होऊन प्रत्येक वर्गाला त्यांचे हक्क, वाटा आणि न्याय मिळत नाही, जातजनणनेतील माहिती भविष्यातील धोरणांचा आधार होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असेही राहुल म्हणाले. आपल्यासाठी हा केवळ राजकीय मुद्दा नाही, तर बहुजनांना न्याय मिळवून देणे, हे माझे आयुष्याचे ध्येय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवण्याची काँग्रेसची मागणी आहे, असे सांगणाऱ्या भाषणांचे व्हिडीओही त्यांनी पोस्ट केले आहेत.

संसदेत तुमचा आवाज बनणार, मला आदेश द्या

जम्मू-काश्मीर केंद्राने नव्हे, तर स्थानिकांनी चालवावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरला सध्याच्या विधानसभा निवडणुका झाल्यावर राज्याचा पुन्हा दर्जा बहाल व्हावा यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकणार,” अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली. पूँछ जिल्ह्यातील सुरणकोट विधानसभा मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

ते हरवण्यासाठी एकत्र आलेत : इंजिनीअर राशीद

नॅशनल कॉन्फरन्स नेते ओमर अब्दुल्ला आणि पीपल्स कॉन्फरन्स प्रमुख सज्जाद गनी लोन हे आमच्या अवामी इत्तेहाद पार्टीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी एकत्र आले आहेत, असा दावा खासदार शेख अब्दुल राशीद ऊर्फ इंजिनिअर राशीद यांनी केला.

त्यांनी लोकसभा निवडणुकीत बारामुल्ला मतदारसंघातून या दोन्ही नेत्यांचा पराभव केला होता. त्यामुे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJammu Kashmirजम्मू-काश्मीर