शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नितीश कुमारांच्या नव्या मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार? राजदला १७ ते १८, जदयूला १२ ते १३, काँग्रेसला ३ मंत्रिपदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 07:28 IST

Nitish Kumar : राजदला १७ ते १८, जदयूला १२ ते १३, तर काँग्रेसला तीन मंत्रिपदे मिळू शकतात. नियमानुसार मुख्यमंत्र्यांशिवाय अधिकाधिक ३६ जणांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. 

- एस. पी. सिन्हा

पाटणा :  बिहारमधील महाआघाडीच्या नव्या सरकारचा उद्या, मंगळवारी (दि.१६) मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. जदयूचे वरिष्ठ नेते विजय चौधरी यांनी तसे संकेत दिले आहेत. महाआघाडीच्या घटक पक्षांत मंत्रिपद वाटपाबाबत सहमती झाली आहे. राजदला १७ ते १८, जदयूला १२ ते १३, तर काँग्रेसला तीन मंत्रिपदे मिळू शकतात. नियमानुसार मुख्यमंत्र्यांशिवाय अधिकाधिक ३६ जणांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळात यावेळी पहिल्यांदा मंत्री बनणारे अनेक चेहरे असतील. मुख्यमंत्र्यांकडे पूर्वीप्रमाणे गृहमंत्रालयाची जबाबदारी असेल. मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली आहे. काँग्रेसला तीन मंत्रिपदे मिळणार आहेत. काँग्रेसचे बिहार प्रभारी भक्त चरण दास म्हणाले की, सध्या आमचे दोनच मंत्री शपथ घेतील. राहिलेल्या एका मंत्र्याचा पुढील मंत्रिमंडळ विस्तारात शपथविधी होईल. मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होताच शपथविधी सोहळ्याच्या तारखेची घोषणा केली जाईल. 

जातीय समीकरणे लक्षात घेऊन राजदची यादीजदयूला १२ ते १३ मंत्रिपदे, राजदला १७ ते १८, तर काँग्रेसला ३ मंत्रिपदे मिळणार आहेत. एक मंत्रिपद जीतन राम मांझी यांचा पक्ष हमला मिळण्याची शक्यता आहे. जदयूचे सध्या जे मंत्री होते. त्यातील बहुतांशजणांना पुन्हा मंत्री बनविले जाणार आहे. तेजस्वी यादव जातीय समीकरणे लक्षात घेऊन मंत्र्यांची नावे निश्चित करणार आहेत. मांझी यांच्या मुलाला मंत्री केले जाऊ शकते.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार