शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमार पुन्हा महाआघाडीत येणार? लालू प्रसाद यादव यांचं सूचक विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 14:27 IST

Nitish Kumar News: बिहारमध्ये झालेल्या बहुमत चाचणीवेळी सभागृहात संबोधित करताना तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार हे पुन्हा पलटी मारतील, असा इशारा दिला होता. तर आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्या महाआघाडीतील पुनरागमाबाबत सूचक संकेत दिले आहेत.

सातत्याने राजकीय भूमिका बदलणाऱ्या नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी महाआघाडीची साथ सोडून एनडीएमध्ये पुनरागमन केले होते. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सत्तेतून बाहेर व्हाले लागले होते. तर भाजपाचा सत्तेत समावेश झाला होता. दरम्यान, बिहारमध्ये झालेल्या बहुमत चाचणीवेळी सभागृहात संबोधित करताना तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार हे पुन्हा पलटी मारतील, असा इशारा दिला होता. तर आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्या महाआघाडीतील पुनरागमाबाबत सूचक संकेत दिले आहेत. नितीश कुमार पुन्हा महाविकास आघाडीत आले तर विचार करू. आमचे दरवाजे नेहमी उघडे असतात, आता लालूप्रसाद यादव यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

दरम्यान, नितीश कुमार यांनी आता यापुढे आपण एनडीएमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे. जेडीयूचा पुन्हा एकदा एनडीएमध्ये समावेश करून भाजपासोबत सरकार स्थापन केल्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती. तर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार म्हणाले होते की, मी आधीही त्यांच्यासोबत होतो. आम्ही वेगवेगळ्या मार्गावरून चाललो. मात्र आता आम्ही एकत्र आहोत, तसेच यापुढे एकत्र राहू. मी जिथे होतो, तिथेच परत आलो आहेत. आता पुन्हा कुठे जाण्याचा प्रश्नच उलटत नाही, असे नितीश कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, नितीश कुमार यांनी राजकीय भूमिका बदलण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. नव्वदच्या दशकात लालूप्रसाद यादव यांची साथ सोडल्यानंतर नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष हे भाजपासोबत आले. त्यानंतर २०१३ पर्यंत ते एनडीएसोबत होते. मात्र २०१३ मध्ये नरेंद्र मोदींना भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख बनवल्यानंतर नितीश कुमार यांनी एनडीए सोडली होती. पुढे काही वर्षे जेडीयू आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत महाआघाडीमध्ये राहिल्यानंतर नितीश कुमार हे २०१७ मध्ये पुन्हा एनडीएमध्ये आले. नितीस कुमार एनडीएत परत आल्यावर एनडीएने बिहारमध्ये २०१९ मध्ये लोकसभा आणि २०२० मध्ये बिहारची विधानसभा निवडणूक जिंकली होती. मात्र २०२२ मध्ये पुन्हा एकदा पलटी मारत नितीश कुमार भाजपाची साथ सोडून महाआघाडीमध्ये गेले होते. त्यानंतर दीड वर्षे महाआघाडीचं सरकार चालवल्यावर नितीश कुमार भूमिका बदलून पुन्हा एनडीएमध्ये आले आहेत. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार