शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नितीश कुमार पुन्हा महाआघाडीत येणार? लालू प्रसाद यादव यांचं सूचक विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 14:27 IST

Nitish Kumar News: बिहारमध्ये झालेल्या बहुमत चाचणीवेळी सभागृहात संबोधित करताना तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार हे पुन्हा पलटी मारतील, असा इशारा दिला होता. तर आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्या महाआघाडीतील पुनरागमाबाबत सूचक संकेत दिले आहेत.

सातत्याने राजकीय भूमिका बदलणाऱ्या नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी महाआघाडीची साथ सोडून एनडीएमध्ये पुनरागमन केले होते. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सत्तेतून बाहेर व्हाले लागले होते. तर भाजपाचा सत्तेत समावेश झाला होता. दरम्यान, बिहारमध्ये झालेल्या बहुमत चाचणीवेळी सभागृहात संबोधित करताना तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार हे पुन्हा पलटी मारतील, असा इशारा दिला होता. तर आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्या महाआघाडीतील पुनरागमाबाबत सूचक संकेत दिले आहेत. नितीश कुमार पुन्हा महाविकास आघाडीत आले तर विचार करू. आमचे दरवाजे नेहमी उघडे असतात, आता लालूप्रसाद यादव यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

दरम्यान, नितीश कुमार यांनी आता यापुढे आपण एनडीएमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे. जेडीयूचा पुन्हा एकदा एनडीएमध्ये समावेश करून भाजपासोबत सरकार स्थापन केल्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती. तर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार म्हणाले होते की, मी आधीही त्यांच्यासोबत होतो. आम्ही वेगवेगळ्या मार्गावरून चाललो. मात्र आता आम्ही एकत्र आहोत, तसेच यापुढे एकत्र राहू. मी जिथे होतो, तिथेच परत आलो आहेत. आता पुन्हा कुठे जाण्याचा प्रश्नच उलटत नाही, असे नितीश कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, नितीश कुमार यांनी राजकीय भूमिका बदलण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. नव्वदच्या दशकात लालूप्रसाद यादव यांची साथ सोडल्यानंतर नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष हे भाजपासोबत आले. त्यानंतर २०१३ पर्यंत ते एनडीएसोबत होते. मात्र २०१३ मध्ये नरेंद्र मोदींना भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख बनवल्यानंतर नितीश कुमार यांनी एनडीए सोडली होती. पुढे काही वर्षे जेडीयू आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत महाआघाडीमध्ये राहिल्यानंतर नितीश कुमार हे २०१७ मध्ये पुन्हा एनडीएमध्ये आले. नितीस कुमार एनडीएत परत आल्यावर एनडीएने बिहारमध्ये २०१९ मध्ये लोकसभा आणि २०२० मध्ये बिहारची विधानसभा निवडणूक जिंकली होती. मात्र २०२२ मध्ये पुन्हा एकदा पलटी मारत नितीश कुमार भाजपाची साथ सोडून महाआघाडीमध्ये गेले होते. त्यानंतर दीड वर्षे महाआघाडीचं सरकार चालवल्यावर नितीश कुमार भूमिका बदलून पुन्हा एनडीएमध्ये आले आहेत. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार