शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

नितीश कुमार पुन्हा महाआघाडीत येणार? लालू प्रसाद यादव यांचं सूचक विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 14:27 IST

Nitish Kumar News: बिहारमध्ये झालेल्या बहुमत चाचणीवेळी सभागृहात संबोधित करताना तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार हे पुन्हा पलटी मारतील, असा इशारा दिला होता. तर आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्या महाआघाडीतील पुनरागमाबाबत सूचक संकेत दिले आहेत.

सातत्याने राजकीय भूमिका बदलणाऱ्या नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी महाआघाडीची साथ सोडून एनडीएमध्ये पुनरागमन केले होते. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सत्तेतून बाहेर व्हाले लागले होते. तर भाजपाचा सत्तेत समावेश झाला होता. दरम्यान, बिहारमध्ये झालेल्या बहुमत चाचणीवेळी सभागृहात संबोधित करताना तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार हे पुन्हा पलटी मारतील, असा इशारा दिला होता. तर आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्या महाआघाडीतील पुनरागमाबाबत सूचक संकेत दिले आहेत. नितीश कुमार पुन्हा महाविकास आघाडीत आले तर विचार करू. आमचे दरवाजे नेहमी उघडे असतात, आता लालूप्रसाद यादव यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

दरम्यान, नितीश कुमार यांनी आता यापुढे आपण एनडीएमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे. जेडीयूचा पुन्हा एकदा एनडीएमध्ये समावेश करून भाजपासोबत सरकार स्थापन केल्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती. तर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार म्हणाले होते की, मी आधीही त्यांच्यासोबत होतो. आम्ही वेगवेगळ्या मार्गावरून चाललो. मात्र आता आम्ही एकत्र आहोत, तसेच यापुढे एकत्र राहू. मी जिथे होतो, तिथेच परत आलो आहेत. आता पुन्हा कुठे जाण्याचा प्रश्नच उलटत नाही, असे नितीश कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, नितीश कुमार यांनी राजकीय भूमिका बदलण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. नव्वदच्या दशकात लालूप्रसाद यादव यांची साथ सोडल्यानंतर नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष हे भाजपासोबत आले. त्यानंतर २०१३ पर्यंत ते एनडीएसोबत होते. मात्र २०१३ मध्ये नरेंद्र मोदींना भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख बनवल्यानंतर नितीश कुमार यांनी एनडीए सोडली होती. पुढे काही वर्षे जेडीयू आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत महाआघाडीमध्ये राहिल्यानंतर नितीश कुमार हे २०१७ मध्ये पुन्हा एनडीएमध्ये आले. नितीस कुमार एनडीएत परत आल्यावर एनडीएने बिहारमध्ये २०१९ मध्ये लोकसभा आणि २०२० मध्ये बिहारची विधानसभा निवडणूक जिंकली होती. मात्र २०२२ मध्ये पुन्हा एकदा पलटी मारत नितीश कुमार भाजपाची साथ सोडून महाआघाडीमध्ये गेले होते. त्यानंतर दीड वर्षे महाआघाडीचं सरकार चालवल्यावर नितीश कुमार भूमिका बदलून पुन्हा एनडीएमध्ये आले आहेत. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार