शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

तेलंगणात केसीआर पॅटर्न पुन्हा दिसणार?, विकासाचे मॉडेल केले उभे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 05:23 IST

भाजपा आणि काँग्रेसपासून दूर राहत के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात दुसऱ्यांदा निर्विवाद सत्ता मिळविली़ तेलंगणाने लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा केला आहे.

- धर्मराज हल्लाळेभाजपा आणि काँग्रेसपासून दूर राहत के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात दुसऱ्यांदा निर्विवाद सत्ता मिळविली़ तेलंगणाने लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा केला आहे. ज्याच्या बळावर चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राष्ट्र समितीने बहुमत मिळवीत दुस-यांदा सत्ता हस्तगत केली. हाच पॅटर्न लोकसभेत दिसेल, असा अंदाज जाणकारांचा आहे. काँग्रेस, भाजपा वायएसआर, तेलगू देसम पार्टी या पक्षांना तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) मोठे आव्हान आहे.अंतरिम अर्थसंकल्पात शेतकºयांना वार्षिक सहा हजारांची मदत घोषित करून पाठ थोपटून घेणाºया केंद्र सरकारच्या आधी तेलंगणाने निव्वळ घोषणा केली नाही तर प्रत्यक्षात शेतकºयांना वार्षिक दोन हप्त्यात आठ हजारांची मदत देऊ केली आहे़ ज्यामुळे टीआरएसचा प्रभाव कायम असून, त्यांची किमया लोकसभेतही दिसून येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे़केसीआर यांनी महाआघाडीत सहभाग घेतला नाही़ परंतु, तिसरा मोर्चा स्थापण्यास त्यांनी स्टालिन, नवीन पटनायक, ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली़ मायावती आणि अखिलेश यांच्या भेटीचाही त्यांचा इरादा होता़ परंतु, महाआघाडीमुळे अन्य तिसºया मोर्चाची शक्यता नाही़ टीआरएसचा राजकीय इतिहास पाहिला तर २००४ मध्ये त्यांनी काँग्रेस सोबत निवडणूक लढविली़ पाच जागा जिंकल्या़ परंतु, तेलंगणा राज्य निर्मितीवरून के़ चंद्रशेखर राव आघाडीतून बाहेर पडले़ तेलंगणा राज्यनिर्मिती हा त्यांचा मूळ उद्देश होता़ आंदोलक ते शासक असा त्यांचा प्रवास झाला़ तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांमध्ये २०१४ साली ६३ जागा के़ चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला होत्या़ त्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ८८ वर पोहोचल्या़केंद्रात सत्तेत असलेल्या आणि मोदींचा करिश्मा देशभर दाखविणाºया भाजपाला तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत एका जागेवर समाधान मानावे लागले़ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणातील एकूण १७ खासदारांपैकी टीआरएसचे ११ खासदार निवडणून आले़ तिथेही भाजपाकडे १ आणि काँग्रेसकडे २ जागा आहेत़ भाजपाचे बंडारू दत्तात्रय हे एकमेव खासदार आहेत़ सद्यस्थितीत त्यांचीही जागा अडचणीत आहे़ टीआरएस खालोखाल राज्यामध्ये १७ पैकी ११ लोकसभा मतदार संघात काँग्रेस दुसºया स्थानावर आहे़ या पार्श्वभूमीवर टीआरएस विरूद्ध सर्व पक्ष अशी लढाई होईल़ ज्यामध्ये टीआरएसचे पारडे अधिक मजबूत असून, अनुक्रमे काँग्रेस आणि तेलगू देसम पार्टी काही ठिकाणी लढत देईल़ मात्र सत्ताधारी भाजपाची स्थिती तेलंगणात नगण्य आहे़मोदी सरकारच्या आधी शेतकरी मित्र योजनारयतू बंधू अर्थात शेतकरी मित्र ही योजना तेलंगणा राष्ट्र समितीने अमलात आणली़ वर्षात दोन वेळा प्रत्येकी ४ हजार प्रमाणे एकूण ८ हजार रूपये खते, बी-बियाणांसाठी प्रत्येक शेतकºयाला मिळणार आहेत़ देशात निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने शेतकºयांना दोन हजार रूपये देऊ केले़ या उलट तेलंगणाने मे २०१८ पासून ही योजना अमलात आणली़ त्याचबरोबर केंद्राने असंघटित क्षेत्रासाठी पेन्शन योजना आणली, पण भरीव तरतूद केली नाही़ तेलंगणा सरकारने मात्र गरीब तसेच एचआयव्ही बाधितांसाठी एक हजार रूपयांची आसरा पेन्शन योजना आणली़ महिलांसाठी प्रसूतीनंतर केसीआर कीट, घरकुल योजना, दलितांना ३ एकर जमीन, पेयजलासाठी मिशन भगीरथ, २४ तास शेतीला वीज अशा कितीतरी योजना अंमलात आणल्याने तेलंगणात भाजपाची जादू आणि हवा चालत नाही़

टॅग्स :TelanganaतेलंगणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९