शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात केसीआर पॅटर्न पुन्हा दिसणार?, विकासाचे मॉडेल केले उभे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 05:23 IST

भाजपा आणि काँग्रेसपासून दूर राहत के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात दुसऱ्यांदा निर्विवाद सत्ता मिळविली़ तेलंगणाने लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा केला आहे.

- धर्मराज हल्लाळेभाजपा आणि काँग्रेसपासून दूर राहत के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात दुसऱ्यांदा निर्विवाद सत्ता मिळविली़ तेलंगणाने लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा केला आहे. ज्याच्या बळावर चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राष्ट्र समितीने बहुमत मिळवीत दुस-यांदा सत्ता हस्तगत केली. हाच पॅटर्न लोकसभेत दिसेल, असा अंदाज जाणकारांचा आहे. काँग्रेस, भाजपा वायएसआर, तेलगू देसम पार्टी या पक्षांना तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) मोठे आव्हान आहे.अंतरिम अर्थसंकल्पात शेतकºयांना वार्षिक सहा हजारांची मदत घोषित करून पाठ थोपटून घेणाºया केंद्र सरकारच्या आधी तेलंगणाने निव्वळ घोषणा केली नाही तर प्रत्यक्षात शेतकºयांना वार्षिक दोन हप्त्यात आठ हजारांची मदत देऊ केली आहे़ ज्यामुळे टीआरएसचा प्रभाव कायम असून, त्यांची किमया लोकसभेतही दिसून येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे़केसीआर यांनी महाआघाडीत सहभाग घेतला नाही़ परंतु, तिसरा मोर्चा स्थापण्यास त्यांनी स्टालिन, नवीन पटनायक, ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली़ मायावती आणि अखिलेश यांच्या भेटीचाही त्यांचा इरादा होता़ परंतु, महाआघाडीमुळे अन्य तिसºया मोर्चाची शक्यता नाही़ टीआरएसचा राजकीय इतिहास पाहिला तर २००४ मध्ये त्यांनी काँग्रेस सोबत निवडणूक लढविली़ पाच जागा जिंकल्या़ परंतु, तेलंगणा राज्य निर्मितीवरून के़ चंद्रशेखर राव आघाडीतून बाहेर पडले़ तेलंगणा राज्यनिर्मिती हा त्यांचा मूळ उद्देश होता़ आंदोलक ते शासक असा त्यांचा प्रवास झाला़ तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांमध्ये २०१४ साली ६३ जागा के़ चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला होत्या़ त्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ८८ वर पोहोचल्या़केंद्रात सत्तेत असलेल्या आणि मोदींचा करिश्मा देशभर दाखविणाºया भाजपाला तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत एका जागेवर समाधान मानावे लागले़ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणातील एकूण १७ खासदारांपैकी टीआरएसचे ११ खासदार निवडणून आले़ तिथेही भाजपाकडे १ आणि काँग्रेसकडे २ जागा आहेत़ भाजपाचे बंडारू दत्तात्रय हे एकमेव खासदार आहेत़ सद्यस्थितीत त्यांचीही जागा अडचणीत आहे़ टीआरएस खालोखाल राज्यामध्ये १७ पैकी ११ लोकसभा मतदार संघात काँग्रेस दुसºया स्थानावर आहे़ या पार्श्वभूमीवर टीआरएस विरूद्ध सर्व पक्ष अशी लढाई होईल़ ज्यामध्ये टीआरएसचे पारडे अधिक मजबूत असून, अनुक्रमे काँग्रेस आणि तेलगू देसम पार्टी काही ठिकाणी लढत देईल़ मात्र सत्ताधारी भाजपाची स्थिती तेलंगणात नगण्य आहे़मोदी सरकारच्या आधी शेतकरी मित्र योजनारयतू बंधू अर्थात शेतकरी मित्र ही योजना तेलंगणा राष्ट्र समितीने अमलात आणली़ वर्षात दोन वेळा प्रत्येकी ४ हजार प्रमाणे एकूण ८ हजार रूपये खते, बी-बियाणांसाठी प्रत्येक शेतकºयाला मिळणार आहेत़ देशात निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने शेतकºयांना दोन हजार रूपये देऊ केले़ या उलट तेलंगणाने मे २०१८ पासून ही योजना अमलात आणली़ त्याचबरोबर केंद्राने असंघटित क्षेत्रासाठी पेन्शन योजना आणली, पण भरीव तरतूद केली नाही़ तेलंगणा सरकारने मात्र गरीब तसेच एचआयव्ही बाधितांसाठी एक हजार रूपयांची आसरा पेन्शन योजना आणली़ महिलांसाठी प्रसूतीनंतर केसीआर कीट, घरकुल योजना, दलितांना ३ एकर जमीन, पेयजलासाठी मिशन भगीरथ, २४ तास शेतीला वीज अशा कितीतरी योजना अंमलात आणल्याने तेलंगणात भाजपाची जादू आणि हवा चालत नाही़

टॅग्स :TelanganaतेलंगणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९