शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 12:10 IST

गेल्या ७५ वर्षांत भारताने ५० मोहिमांमध्ये २,९०,००० हून अधिक शांती सैनिक तैनात केले आहेत, त्यापैकी १८२ सैनिकांनी बलिदान दिले आहे. २००७ मध्ये, भारताने लायबेरियामध्ये पहिली पूर्णपणे महिला पोलिस तुकडी तैनात करून इतिहास रचला.

मागील काही दिवसांपासून गाझामध्ये हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यामुळे गाझाची परिस्थिती बिघडली आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील अशांततेच्या पार्श्वभूमीवर, भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिक देशांच्या लष्कर प्रमुखांची परिषद १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान राजधानी दिल्ली येथे होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकी कारवायांमध्ये योगदान देणाऱ्या सुमारे ३० देशांचे वरिष्ठ लष्करी नेतृत्व यात सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे, भारताने या परिषदेत सहभागी होण्यासाठी चीन आणि पाकिस्तानला आमंत्रित केलेले नाही. शिवाय, भारताने गाझा आणि युक्रेनसारख्या युद्धग्रस्त भागात आपल्या सैन्याच्या तैनातीलाही स्पष्ट प्रतिसाद दिला आहे.

"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) परवानगी दिल्याशिवाय भारत युक्रेन किंवा गाझा सारख्या परदेशी संघर्ष क्षेत्रात सैन्य तैनात करणार नाही. इतर देशांमध्ये सैन्य तैनात करणे केवळ संयुक्त राष्ट्रांच्या ध्वजाखाली असेल असे भारताचे म्हणणे आहे.

१ ऑक्टोबर रोजी झालेल्या कर्टन रेझर कार्यक्रमात, लेफ्टनंट जनरल राकेश कपूर, एव्हीएसएम, व्हीएसएम, उप-सेनाप्रमुख यांनी लष्करप्रमुखांच्या वतीने उपस्थितांना संबोधित केले. सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत केले. त्यांनी सांगितले की, या बहुपक्षीय कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा भारताला सन्मान आहे. या परिषदेचे उद्दिष्ट एक समान व्यासपीठ तयार करणे होते तिथे विविध देशांचे आणि सैन्यांचे अनुभव, दृष्टिकोन आणि वचनबद्धता एकत्रित होऊन संयुक्त राष्ट्रांच्या चार्टर अंतर्गत शांतता राखण्याच्या जबाबदाऱ्यांवर चर्चा करतील.

भारताचे मोठे योगदान

कार्यक्रमात असे म्हटले आहे की हे भारताच्या सांस्कृतिक मूल्यांचे, नैतिक परराष्ट्र धोरणाचे आणि जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठीच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. गेल्या ७५ वर्षांत, भारताने ५० मोहिमांमध्ये २९०,००० हून अधिक शांती सैनिक तैनात केले आहेत, त्यापैकी १८२ जणांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. २००७ मध्ये, भारताने लायबेरियामध्ये पहिली पूर्णपणे महिला पोलिस तुकडी तैनात करून इतिहास घडवला. अलीकडेच, फेब्रुवारीमध्ये, भारताने ग्लोबल साउथमधील महिला शांती सैनिकांची एक परिषद आयोजित केली होती, यामध्ये ३५ देशांनी भाग घेतला होता.

भारताचे उपक्रम

२०२१ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) अध्यक्षपदाच्या काळात, भारताने "UN शांतीरक्षकांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी जबाबदारी" आणि "शांतता निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञान" यासारख्या प्रमुख कागदपत्रांचा स्वीकार करण्यात भूमिका बजावली. जून २०२३ मध्ये, भारताने न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात शांतीरक्षकांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक भिंत उभारण्याचा ठराव मांडला. भारताने सुधारित आदेश, शांतीरक्षकांची सुरक्षा आणि योगदान देणाऱ्या देशांचे योग्य प्रतिनिधित्व यासाठी सातत्याने वकिली केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India to Send Troops to Gaza? UN Peacekeeping Meet Excludes China, Pakistan

Web Summary : India hosts UN peacekeeping chiefs, excluding China, Pakistan amid Gaza unrest. India clarifies troop deployment contingent on UN mandate. India's commitment to global peace highlighted with past contributions.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवान