शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 12:10 IST

गेल्या ७५ वर्षांत भारताने ५० मोहिमांमध्ये २,९०,००० हून अधिक शांती सैनिक तैनात केले आहेत, त्यापैकी १८२ सैनिकांनी बलिदान दिले आहे. २००७ मध्ये, भारताने लायबेरियामध्ये पहिली पूर्णपणे महिला पोलिस तुकडी तैनात करून इतिहास रचला.

मागील काही दिवसांपासून गाझामध्ये हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यामुळे गाझाची परिस्थिती बिघडली आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील अशांततेच्या पार्श्वभूमीवर, भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिक देशांच्या लष्कर प्रमुखांची परिषद १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान राजधानी दिल्ली येथे होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकी कारवायांमध्ये योगदान देणाऱ्या सुमारे ३० देशांचे वरिष्ठ लष्करी नेतृत्व यात सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे, भारताने या परिषदेत सहभागी होण्यासाठी चीन आणि पाकिस्तानला आमंत्रित केलेले नाही. शिवाय, भारताने गाझा आणि युक्रेनसारख्या युद्धग्रस्त भागात आपल्या सैन्याच्या तैनातीलाही स्पष्ट प्रतिसाद दिला आहे.

"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) परवानगी दिल्याशिवाय भारत युक्रेन किंवा गाझा सारख्या परदेशी संघर्ष क्षेत्रात सैन्य तैनात करणार नाही. इतर देशांमध्ये सैन्य तैनात करणे केवळ संयुक्त राष्ट्रांच्या ध्वजाखाली असेल असे भारताचे म्हणणे आहे.

१ ऑक्टोबर रोजी झालेल्या कर्टन रेझर कार्यक्रमात, लेफ्टनंट जनरल राकेश कपूर, एव्हीएसएम, व्हीएसएम, उप-सेनाप्रमुख यांनी लष्करप्रमुखांच्या वतीने उपस्थितांना संबोधित केले. सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत केले. त्यांनी सांगितले की, या बहुपक्षीय कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा भारताला सन्मान आहे. या परिषदेचे उद्दिष्ट एक समान व्यासपीठ तयार करणे होते तिथे विविध देशांचे आणि सैन्यांचे अनुभव, दृष्टिकोन आणि वचनबद्धता एकत्रित होऊन संयुक्त राष्ट्रांच्या चार्टर अंतर्गत शांतता राखण्याच्या जबाबदाऱ्यांवर चर्चा करतील.

भारताचे मोठे योगदान

कार्यक्रमात असे म्हटले आहे की हे भारताच्या सांस्कृतिक मूल्यांचे, नैतिक परराष्ट्र धोरणाचे आणि जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठीच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. गेल्या ७५ वर्षांत, भारताने ५० मोहिमांमध्ये २९०,००० हून अधिक शांती सैनिक तैनात केले आहेत, त्यापैकी १८२ जणांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. २००७ मध्ये, भारताने लायबेरियामध्ये पहिली पूर्णपणे महिला पोलिस तुकडी तैनात करून इतिहास घडवला. अलीकडेच, फेब्रुवारीमध्ये, भारताने ग्लोबल साउथमधील महिला शांती सैनिकांची एक परिषद आयोजित केली होती, यामध्ये ३५ देशांनी भाग घेतला होता.

भारताचे उपक्रम

२०२१ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) अध्यक्षपदाच्या काळात, भारताने "UN शांतीरक्षकांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी जबाबदारी" आणि "शांतता निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञान" यासारख्या प्रमुख कागदपत्रांचा स्वीकार करण्यात भूमिका बजावली. जून २०२३ मध्ये, भारताने न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात शांतीरक्षकांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक भिंत उभारण्याचा ठराव मांडला. भारताने सुधारित आदेश, शांतीरक्षकांची सुरक्षा आणि योगदान देणाऱ्या देशांचे योग्य प्रतिनिधित्व यासाठी सातत्याने वकिली केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India to Send Troops to Gaza? UN Peacekeeping Meet Excludes China, Pakistan

Web Summary : India hosts UN peacekeeping chiefs, excluding China, Pakistan amid Gaza unrest. India clarifies troop deployment contingent on UN mandate. India's commitment to global peace highlighted with past contributions.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवान