शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

हेमंत सोरेन सरकार देणार विश्वासमताची परीक्षा? ५ सप्टेंबरला विशेष अधिवेशन; ठराव पारीत करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 06:56 IST

jharkhand Political Crisis: झारखंडमधील राजकीय संकटाची टांगती तलवार असताना गुरुवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात ५ सप्टेंबर रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

- एस. पी. सिन्हारांची : झारखंडमधील राजकीय संकटाची टांगती तलवार असताना गुरुवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात ५ सप्टेंबर रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने सांगितले की, एक दिवसीय पावसाळी अधिवेशन घ्यायचे राहिले आहे. ते पाच सप्टेंबर रोजी बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात सरकार स्वत:च विश्वासमत प्राप्त करू शकते, असे समजले जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुनी निवृत्ती योजना लागू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. बैठकीत एकूण २५ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

एक-दोन दिवसांत स्थिती स्पष्ट होईल - राज्यपालयूपीएच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैंस यांची भेट घेतली. त्यानंतर झामुमोचे सरचिटणीस विनोद पांडेय यांनी सांगितले की, राज्यपालांनी सांगितले की, त्यांना निवडणूक आयोगाकडून पत्र प्राप्त झालेले आहे. यावर एक-दोन दिवसांत कायदेशीर सल्ला घेऊन स्थिती स्पष्ट केली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या शक्यतेचा इन्कार करून पांडेय म्हणाले की, राजभवनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असे राज्यपालांनी सांगितले आहे. राज्यपालांनी १-२ दिवसांत आपला निर्णय आयोगाकडे पाठविणार आहेत.

बैठकीसाठी रायपूरहून आले मंत्रीराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्र्यांना रायपूरहून रांचीमध्ये बोलावण्यात आले होते. झामुमोच्या कोट्यातील मंत्री आधीपासूनच रांचीमध्ये होते, तर काँग्रेसच्या कोट्यातील ४ मंत्री रायपूरला होते. त्यांना बुधवारी सायंकाळी विशेष विमानाने रांचीमध्ये बोलावण्यात आले होते. राज्यातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंत्री रायपूरला रवाना होण्याची शक्यता आहे.

आरपीएन सिंह यांच्यावर काँग्रेस फोडण्याची जबाबदारीभाजपमध्ये जाण्यापूर्वी आरपीएन सिंह झारखंड काँग्रेसचे प्रभारी होते. राज्यात काँग्रेस मजबूत उभी करण्यात व सत्तेत वाटा मिळवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तिकीट वाटपापासून ते मंत्री निश्चित करण्यापर्यंत सर्व कामे त्यांनीच केली होती. त्यामुळे काँग्रेस फोडण्याची जबाबदारी भाजपने त्यांच्यावर सोपविली आहे, असे समजते. अनेक आमदार सिंह यांच्या थेट संपर्कात असल्याचे सांगितले जाते. मात्र, कोणताही प्रकार टाळण्यासाठी अविनाश पांडे यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.

टॅग्स :JharkhandझारखंडPoliticsराजकारण