शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

हेमंत सोरेन सरकार देणार विश्वासमताची परीक्षा? ५ सप्टेंबरला विशेष अधिवेशन; ठराव पारीत करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 06:56 IST

jharkhand Political Crisis: झारखंडमधील राजकीय संकटाची टांगती तलवार असताना गुरुवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात ५ सप्टेंबर रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

- एस. पी. सिन्हारांची : झारखंडमधील राजकीय संकटाची टांगती तलवार असताना गुरुवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात ५ सप्टेंबर रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने सांगितले की, एक दिवसीय पावसाळी अधिवेशन घ्यायचे राहिले आहे. ते पाच सप्टेंबर रोजी बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात सरकार स्वत:च विश्वासमत प्राप्त करू शकते, असे समजले जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुनी निवृत्ती योजना लागू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. बैठकीत एकूण २५ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

एक-दोन दिवसांत स्थिती स्पष्ट होईल - राज्यपालयूपीएच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैंस यांची भेट घेतली. त्यानंतर झामुमोचे सरचिटणीस विनोद पांडेय यांनी सांगितले की, राज्यपालांनी सांगितले की, त्यांना निवडणूक आयोगाकडून पत्र प्राप्त झालेले आहे. यावर एक-दोन दिवसांत कायदेशीर सल्ला घेऊन स्थिती स्पष्ट केली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या शक्यतेचा इन्कार करून पांडेय म्हणाले की, राजभवनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असे राज्यपालांनी सांगितले आहे. राज्यपालांनी १-२ दिवसांत आपला निर्णय आयोगाकडे पाठविणार आहेत.

बैठकीसाठी रायपूरहून आले मंत्रीराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्र्यांना रायपूरहून रांचीमध्ये बोलावण्यात आले होते. झामुमोच्या कोट्यातील मंत्री आधीपासूनच रांचीमध्ये होते, तर काँग्रेसच्या कोट्यातील ४ मंत्री रायपूरला होते. त्यांना बुधवारी सायंकाळी विशेष विमानाने रांचीमध्ये बोलावण्यात आले होते. राज्यातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंत्री रायपूरला रवाना होण्याची शक्यता आहे.

आरपीएन सिंह यांच्यावर काँग्रेस फोडण्याची जबाबदारीभाजपमध्ये जाण्यापूर्वी आरपीएन सिंह झारखंड काँग्रेसचे प्रभारी होते. राज्यात काँग्रेस मजबूत उभी करण्यात व सत्तेत वाटा मिळवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तिकीट वाटपापासून ते मंत्री निश्चित करण्यापर्यंत सर्व कामे त्यांनीच केली होती. त्यामुळे काँग्रेस फोडण्याची जबाबदारी भाजपने त्यांच्यावर सोपविली आहे, असे समजते. अनेक आमदार सिंह यांच्या थेट संपर्कात असल्याचे सांगितले जाते. मात्र, कोणताही प्रकार टाळण्यासाठी अविनाश पांडे यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.

टॅग्स :JharkhandझारखंडPoliticsराजकारण