शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:20 IST

श्रीनगर: जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील दुहेरी सत्ता रचनेमुळे विकासाची गती मंद असून लवकरच राज्याचा दर्जा बहाल न केल्यास त्यांचा पक्ष ...

श्रीनगर: जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील दुहेरी सत्ता रचनेमुळे विकासाची गती मंद असून लवकरच राज्याचा दर्जा बहाल न केल्यास त्यांचा पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाईल, असा इशारा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा उघडपणे इशारा देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. 

अब्दुल्ला यांनी शनिवारी सांगितले की, ऑक्टोबर २०२४ मध्ये निवडून आलेले सरकार स्थापन होऊनही पूर्ण राज्याचा दर्जा नसल्याने लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. २०१९ मध्ये या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाले. 

दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते म्हणाले की, लोकांना आशा होती की नवीन सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करेल. परंतु राज्याचा दर्जा नसणे हा एक मोठा अडथळा आहे. राज्याचा दर्जा मिळाल्याशिवाय आपण लोकांच्या आकांक्षा कशा पूर्ण करू शकतो?

फारुक अब्दुल्ला म्हणाले की, काही राजकीय शक्ती त्यांच्या हितसंबंधांशी तडजोड करण्यास तयार आहेत, हे पटवून देण्यासाठी आमच्या पक्षाने एक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या आठ महिन्यांच्या कार्यकाळानंतरही आम्ही राज्याचा दर्जा परत मिळेल याबद्दल आशावादी आहोत.  पण जर आणखी विलंब झाला, तर आमच्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही. 

काश्मीरमधील सरकार आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यातील सत्ता संघर्ष अधिकाधिक तीव्र झाला आहे. मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी सिन्हा यांच्यावर प्रशासकीय निर्णयात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. 

सत्तेच्या केंद्रीकरणावर सज्जाद लोन यांची टीका 

पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन यांनी राज्याच्या दर्जाच्या मागणीला पाठिंबा दिला. पण नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळावर टीका केली आहे. 

केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा निश्चितच विकासाला मर्यादा घालतो. पण जे अधिकार दिले गेले आहेत, ते या सरकारने वापरले नाहीत. त्याऐवजी त्यांनी प्रशासनातील बदल्यांचा शस्र म्हणून वापर केला आणि ज्या मतदारसंघात त्यांना विजय मिळवता आला नाही, त्यांच्या बाबतीत भेदभाव केला. 

त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील सत्तेच्या केंद्रीकरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांकडे ३२ विभाग आहेत. एखाद्या व्यक्तीसाठी ३२ विभाग चालविणे मानवीदृष्ट्या शक्य आहे का? असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Central Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय