शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

बेदरकारपणे गाडी चालविल्यास वाहन विमा पडणार महाग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 06:37 IST

तुम्ही वाहन कसे चालविता यावरून ठरणार विम्याचा हप्ता

नवी दिल्ली : तुम्ही गाडी कशी चालवता, तसेच तुम्ही किती अपघात केले आहेत, यावरून तुमच्या वाहन विम्याचा हप्ता ठरणार असून, यासंबंधीचा निर्णय लवकरच अंमलात आणला जाऊ शकतो.

देशातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नवा कायदा नुकताच अंमलात आला आहे. त्यानुसार, वाहतुकीचे नियम मोडल्यास लागणाऱ्या दंडात अनेक पट वाढ करण्यात आली आहे. यापुढील टप्पा म्हणून वाहतूक नियमांच्या भंगाचा वाहन विम्याशी संबंध जोडण्याचा निर्णय घेतला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले. वाहन विम्याचे हप्ते नियमभंगाशी जोडण्यासाठी आवश्यक अंमलबजावणी चौकट आणि पद्धती याबाबतच्या शिफारशी करण्यासाठी विमा नियामक ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी’ने (इरडा) नऊ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. समितीला दोन महिन्यांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. गृहमंत्रालयाच्या नेतृत्वाखालील, तसेच दिल्लीतील वाहतूक व्यवस्था पाहणाºया उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनंतर इरडाने ही समिती स्थापन केली आहे. यासंबंधीचा पथदर्शक प्रकल्प तत्काळ सुरू करण्यासाठी योजना सुचविण्याचे निर्देश इरडाच्या समितीला दिले.

बेदरकारपणे वाहने चालवून निष्पाप नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्यांना कसे वठणीवर आणायचे, यावर कित्येक वर्षांपासून विचारविनिमय सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की, इरडा समितीच्या संदर्भ शर्तीनुसार, समितीला सर्व राज्यांच्या वाहतूक विषयीच्या नियमांचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. समिती वाहतूक नियमभंगासाठी स्थायी अंक व्यवस्था सुचविणार आहे. या अंकांनुसार विमा कंपन्या संबंधित व्यक्तीच्या वाहन विम्याचा हप्ता ठरवतील.७० टक्के अपघातांना चालकच कारणीभूतविचारमंथन सुरू असले तरी वाहन विमा आणि वाहतूकविषयक नियमभंग यांची सांगड घालण्यासाठी देशात पहिल्यांदाच पुढाकार घेण्यात येत आहे. काही पाश्चात्य देशांत याची आधीच यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. जगभरातील आकडेवारीवरून असे समोर आले आहे की, ७0 टक्के अपघाताला चालकांचे वागणेच कारणीभूत असते.