शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

बेदरकारपणे गाडी चालविल्यास वाहन विमा पडणार महाग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 06:37 IST

तुम्ही वाहन कसे चालविता यावरून ठरणार विम्याचा हप्ता

नवी दिल्ली : तुम्ही गाडी कशी चालवता, तसेच तुम्ही किती अपघात केले आहेत, यावरून तुमच्या वाहन विम्याचा हप्ता ठरणार असून, यासंबंधीचा निर्णय लवकरच अंमलात आणला जाऊ शकतो.

देशातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नवा कायदा नुकताच अंमलात आला आहे. त्यानुसार, वाहतुकीचे नियम मोडल्यास लागणाऱ्या दंडात अनेक पट वाढ करण्यात आली आहे. यापुढील टप्पा म्हणून वाहतूक नियमांच्या भंगाचा वाहन विम्याशी संबंध जोडण्याचा निर्णय घेतला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले. वाहन विम्याचे हप्ते नियमभंगाशी जोडण्यासाठी आवश्यक अंमलबजावणी चौकट आणि पद्धती याबाबतच्या शिफारशी करण्यासाठी विमा नियामक ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी’ने (इरडा) नऊ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. समितीला दोन महिन्यांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. गृहमंत्रालयाच्या नेतृत्वाखालील, तसेच दिल्लीतील वाहतूक व्यवस्था पाहणाºया उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनंतर इरडाने ही समिती स्थापन केली आहे. यासंबंधीचा पथदर्शक प्रकल्प तत्काळ सुरू करण्यासाठी योजना सुचविण्याचे निर्देश इरडाच्या समितीला दिले.

बेदरकारपणे वाहने चालवून निष्पाप नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्यांना कसे वठणीवर आणायचे, यावर कित्येक वर्षांपासून विचारविनिमय सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की, इरडा समितीच्या संदर्भ शर्तीनुसार, समितीला सर्व राज्यांच्या वाहतूक विषयीच्या नियमांचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. समिती वाहतूक नियमभंगासाठी स्थायी अंक व्यवस्था सुचविणार आहे. या अंकांनुसार विमा कंपन्या संबंधित व्यक्तीच्या वाहन विम्याचा हप्ता ठरवतील.७० टक्के अपघातांना चालकच कारणीभूतविचारमंथन सुरू असले तरी वाहन विमा आणि वाहतूकविषयक नियमभंग यांची सांगड घालण्यासाठी देशात पहिल्यांदाच पुढाकार घेण्यात येत आहे. काही पाश्चात्य देशांत याची आधीच यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. जगभरातील आकडेवारीवरून असे समोर आले आहे की, ७0 टक्के अपघाताला चालकांचे वागणेच कारणीभूत असते.