शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोदी, योगींविरोधात घोषणाबाजी कराल, तर जिवंत गाडेन; भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 08:42 IST

सीएएच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला संबोधित करताना भाजपा मंत्री बरळला

अलीगढ: सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला संबोधित करताना भाजपा नेते आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रघुराज सिंह यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यास जिवंत गाडेन, असं सिंह म्हणाले. अलीगढमधील नुमाइश मैदानावर रविवारी सिंह यांचं भाषण झालं. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य रविवारी एका जनसभेला संबोधित करण्यासाठी अलीगढमधील नुमाइश मैदानात पोहोचले. त्यांच्या आधी रघुराज सिंह यांनी उपस्थितांना संबोधित केलं. अलीगढ मुस्लिम विद्यापीठात घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी थेट इशारा दिला. 'मोदी आणि योगी यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांना मी जिवंत गाडेन,' असं वादग्रस्त विधान सिंह यांनी केलं. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतानाही सिंह यांची जीभ घसरली. नेहरूंची कोणती जात आहे का? त्यांचं तर कुटुंबदेखील नव्हतं, असं ते म्हणाले. रघुराज सिंह यांनी अलीगढ विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना थेट धमकी दिली. 'ही मूठभर मंडळी, केवळ एक टक्का असलेली मंडळी, आपल्या देशाचा पैसा वाया घालवत आहेत. देशाशी बेईमानी करत आहेत. मोदी आणि योगी देशाला आणि राज्याला ज्या पद्धतीनं चालवत आहेत, त्याच पद्धतीनं यापुढेही चालवतील. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी कराल, तर जिवंत गाडेन. हा देश आम्ही चालवू. तुम्ही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. अन्यथा तुरुंगात टाकू. कोणालाही सोडणार नाही. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू. मग तुम्हाला जामीनदेखील मिळणार नाही,' असं सिंह म्हणाले.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू