शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

चीनमधील भारतीयांना विमानाने आणणार; कोरोनाग्रस्त वुहानमध्ये २५0 विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 05:20 IST

चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे.

नवी दिल्ली : चीनमध्ये राहणाऱ्या २५0 भारतीयांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये, यासाठी त्यांना परत आणण्यात येणार आहे. त्यांना आणण्याची परवानगी मिळावी, असे पत्र भारताने चीन सरकारला पत्र पाठविले आहे. त्यानंतर, एअर इंडियाचे ४२३ आसनांचे विमान वुहानलो रवाना होणार होईल. चीनमधून आलेल्या नांदेडमधील एका व्यक्तीला देखरेखीखाली रुग्णालयात ठेवले आहे. मात्र, आतापर्यंत भारतात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. चीनमध्ये आतापर्यंत या विषाणूचा संसर्ग झाल्याने १0६ जण मरण पावले असून, ४,५00 जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. तिथे २५0 भारतीय असून, त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थी आहेत. आतापर्यंत १३ देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जागतिक आणीबाणी जाहीर केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.चीनमधून थेट वा अन्य देशांच्या मार्गे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे भारतात स्कॅनिंग सुरू असून, आतापर्यंत ३0 हजारांहून अधिक जणांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. केरळमध्ये ४३६ संशयित असून, त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. त्यातील काही जण चीनमधून तर काही कोरोनाचा संसर्ग झालेल्या देशांतून आले आहेत.चीनमधून परतलेल्या आठ जणांना तामिळनाडूतील रुग्णालयात चार आठवड्यांसाठी देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. मुंबई व पुणे येथेही सहा संशयित रुग्ण असून, त्यांनाही रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले आहे. दिल्लीतही तीन संशयित रुग्णांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले आहे, तर मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील रुग्णालयात एक मुलगा व त्याच्या आईला दाखल केले आहे. ते दोघे वुहानहून भारतात आले आहेत. पंजाबमध्येही एका संशयित रुग्णाला इस्पितळात दाखल केले आहे.ईशान्येकडील राज्यांत अ‍ॅलर्टआतापर्यंत भारतात कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही, पण परदेशांतून येणाºया भारतीयांची संख्या मोठी असल्याने अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीलंकेनेही चीनमधील नागरिकांना व्हिसा नाकारला आहे. कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून म्यानमारने देशाच्या सीमा बंद केल्या आहेत. नेपाळमध्येही एक रुग्ण आढळला आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्ये नेपाळ व चीनला लागून असल्याने तिथे अधिक खबरदारीचा अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना