शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रदूषणाच्या नावाखाली चिता जाळण्यावरही बंदी घालणार?, त्रिपुराचे राज्यपाल भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:33 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली व राजधानी व आसपासच्या परिसरात घातलेल्या बंदीविषयी नापसंती व्यक्त करताना, त्रिपुराचे राज्यपाल तथागत राय यांनी हा निर्णय हिंदुविरोधी असल्याची टीका केली आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली व राजधानी व आसपासच्या परिसरात घातलेल्या बंदीविषयी नापसंती व्यक्त करताना, त्रिपुराचे राज्यपाल तथागत राय यांनी हा निर्णय हिंदुविरोधी असल्याची टीका केली आहे. एवढेच नव्हे, तर हिंदुच्या चिता जाळण्यामुळे प्रदूषण होते, अशी याचिका कोणी न्यायालयात केल्यास, ते अंत्यसंस्कारही रोखणार का, असा सवाल तथागत राय यांनी केला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एखाद्या राज्याच्या राज्यपालांनी अशा शब्दांत टीका करण्याचा हा बहुधा पहिलाच प्रसंग असावा. आधी दहीहंडीवर निर्बंध आणले गेले आणि आता फटाक्यांवर बंदी घालण्यात आली, असे ट्विट करून ते पुढे म्हणाले की, पुरस्कार वापसी करणारी व मेणबत्ती मोर्चा काढणारी गँग चितेमुळेही प्रदूषण होते, अशी याचिका न्यायालयात करेल. त्यांनी या वादात पुरस्कार परत करणारे तसेच मेणबत्ती मोर्चा काढणारे यांनाही निष्कारण खेचले आहे.निर्भया प्रकरणात दिल्लीत सर्वसामान्यांनीही मेणबत्ती मोर्चे काढले होते आणि त्यात भाजपा कार्यकर्तेही सहभागी झाले होते, याचा त्यांना विसर पडला असावा.विश्व हिंदू परिषद, स्वदेशी जागरण मंच या रा. स्व. संघाशी संबंधित संघटनांनीही फटाकेबंदीविरुद्ध भूमिका घेतली आहे. त्यात आता त्रिपुराच्या राज्यपालांनीही उडी घेतली आहे. स्वदेशी जागर मंचाने फटाकेबंदीमुळे लाखो लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होईल, असे म्हटले आहे.इंग्रजी लेखक चेतन भगत यांनीही न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली आहे. ते म्हणाले की, फटाक्यांशिवाय दिवाळी कशी साजरी होणार? लहान मुलांच्या हातात यंदा फुलबाजीही दिसणार नाही? फटाक्यांवर प्रदूषणाच्या नावाखाली बंदी घातली जाते, मग बकरी ईद, मुहर्रम व ख्रिस्तमस याबाबत काय भूमिका घेतली जाणार आहे? बकरी ईद व मुहर्रममध्ये तर हिंसा होते, त्याचे काय?ख्रिस्तमस ट्रीवरही बंदी घातली जाणार का?आदेशात सुधारणा व्हावी-फटाकेबंदीमुळे दिल्लीतील व्यापारी अस्वस्थ आहेत. त्यांच्याकडे आधीपासूनच फटाक्यांचे साठे आहेत. त्याचे काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने आधीच्या आदेशात सुधारणा करून, असलेले फटाके विकण्यास परवानगी द्यावी, अशी याचिका न्यायालयात केली आहे. त्याबाबत न्यायालयाने अद्याप निर्णय दिलेला नाही.

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीpollutionप्रदूषण