शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

अयोध्येतील वाद मध्यस्थीने सोडविणार ?, सुप्रीम कोर्टाच्या सूचनेवर पुन्हा मतभिन्नता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 06:07 IST

अयोध्येतील राममंदिर-बाबरी मशिदीच्या २.७७ एकर वादग्रस्त जमिनीच्या मालकीचा वाद मध्यस्थीने सोडविण्याचे प्रयत्न करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केली.

नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिर-बाबरी मशिदीच्या २.७७ एकर वादग्रस्त जमिनीच्या मालकीचा वाद मध्यस्थीने सोडविण्याचे प्रयत्न करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केली. त्यास हिंदू पक्षकारांनी विरोध केला, तर मुस्लीम पक्षकारांनी शक्यता तपासण्याची तयारी दर्शविली. दोन्ही बाजूंंमध्ये एकवाक्यता नसल्याने मध्यस्थीचा आदेश देण्याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला.सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण व न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या विशेष घटनापीठापुढे हे प्रकरण आले. मध्यस्थी व पुराव्याच्या कागदपत्रांचे भाषांतर यावर मतभिन्नता कायम राहिल्याने मुख्य सुनावणी पुन्हा पुढे गेली.मध्यस्थीचा विषय काढून न्या. बोबडे म्हणाले की, बाबराने काय केले यात आम्ही शिरू शकत नाही. हा विषय केवळ दोन पक्षकारांमधील मालकी हक्काच्या वादाचा नाही. या वादाने दुभंगलेली मने सांधली जात असतील तर त्यास संधी द्यायला हवी. न्या. चंद्रचूड यांनीही मध्यस्थीस अनुकुलता दर्शविली. मात्र मध्यस्थीने होणारी तडजोड न्यायालयाबाहेरील लाखो लोकांवर कितपत थोपविली जाऊ शकेल, याविषयी साशंकता व्यक्त केली. त्यानंतर मध्यस्थीचा आदेश द्यावा का, यावरही चर्चा झाली.>श्रीरामाचे मंदिर जन्मस्थानीच व्हायला हवे. याआधी मध्यस्थी फोल ठरली. पर्याय आहे मशीद अन्यत्र हलविण्याचा. तो मान्य असेल तर आम्ही लोकवर्गणीतून मशीद बांधून द्यायला तयार आहोत.- सी. एस. वैद्यनाथन,ज्येष्ठ वकील, श्री रामलल्ला विराजमान>मध्यस्थीच्या प्रयत्नांना हरकत नाही. आमचे म्हणणे आहे की, न्यायालयाने मध्यस्थीचा आदेश देण्यासाठी सर्व पक्षकारांमध्ये एकमत होण्याची गरज नाही.- डॉ. राजीव धवन, ज्येष्ठ वकील, अ.भा. सुन्नी वक्फ बोर्ड

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAyodhyaअयोध्या