शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अयोध्येतील वाद मध्यस्थीने सोडविणार ?, सुप्रीम कोर्टाच्या सूचनेवर पुन्हा मतभिन्नता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 06:07 IST

अयोध्येतील राममंदिर-बाबरी मशिदीच्या २.७७ एकर वादग्रस्त जमिनीच्या मालकीचा वाद मध्यस्थीने सोडविण्याचे प्रयत्न करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केली.

नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिर-बाबरी मशिदीच्या २.७७ एकर वादग्रस्त जमिनीच्या मालकीचा वाद मध्यस्थीने सोडविण्याचे प्रयत्न करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केली. त्यास हिंदू पक्षकारांनी विरोध केला, तर मुस्लीम पक्षकारांनी शक्यता तपासण्याची तयारी दर्शविली. दोन्ही बाजूंंमध्ये एकवाक्यता नसल्याने मध्यस्थीचा आदेश देण्याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला.सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण व न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या विशेष घटनापीठापुढे हे प्रकरण आले. मध्यस्थी व पुराव्याच्या कागदपत्रांचे भाषांतर यावर मतभिन्नता कायम राहिल्याने मुख्य सुनावणी पुन्हा पुढे गेली.मध्यस्थीचा विषय काढून न्या. बोबडे म्हणाले की, बाबराने काय केले यात आम्ही शिरू शकत नाही. हा विषय केवळ दोन पक्षकारांमधील मालकी हक्काच्या वादाचा नाही. या वादाने दुभंगलेली मने सांधली जात असतील तर त्यास संधी द्यायला हवी. न्या. चंद्रचूड यांनीही मध्यस्थीस अनुकुलता दर्शविली. मात्र मध्यस्थीने होणारी तडजोड न्यायालयाबाहेरील लाखो लोकांवर कितपत थोपविली जाऊ शकेल, याविषयी साशंकता व्यक्त केली. त्यानंतर मध्यस्थीचा आदेश द्यावा का, यावरही चर्चा झाली.>श्रीरामाचे मंदिर जन्मस्थानीच व्हायला हवे. याआधी मध्यस्थी फोल ठरली. पर्याय आहे मशीद अन्यत्र हलविण्याचा. तो मान्य असेल तर आम्ही लोकवर्गणीतून मशीद बांधून द्यायला तयार आहोत.- सी. एस. वैद्यनाथन,ज्येष्ठ वकील, श्री रामलल्ला विराजमान>मध्यस्थीच्या प्रयत्नांना हरकत नाही. आमचे म्हणणे आहे की, न्यायालयाने मध्यस्थीचा आदेश देण्यासाठी सर्व पक्षकारांमध्ये एकमत होण्याची गरज नाही.- डॉ. राजीव धवन, ज्येष्ठ वकील, अ.भा. सुन्नी वक्फ बोर्ड

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAyodhyaअयोध्या