शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

विधानसभा निवडणुका ठरल्याप्रमाणे होतील? राजकीय वर्तुळात चर्चा सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 05:53 IST

कोविड-१९, ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये होतेय वाढ

व्यंकटेश केसरी, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली असतानाच राजकीय वर्तुळात या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील की नाही, याची चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण आहे ते कोविड-१९ आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ. उत्तर प्रदेश राज्य दिल्ली, पंजाब आणि उत्तराखंडच्या सीमेवर असले तरी राजधानी दिल्लीपासूनही फार दूर नाही. एकदा निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यावर कोविडसंबंधित आचारसंहितेचे पालन करून घेणे निवडणूक आयोगाला कठीण होणार आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोवा विधानसभेची निवडणूक येत्या ६० दिवसांत घेतली जाणे अपेक्षित आहे तर उत्तर प्रदेशमध्ये ती ५ ते ६ टप्प्यांत होईल. 

उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजप हा प्रचारात आघाडीवर असून, त्याने जाहिरातींवर कोट्यवधी रूपये खर्च सुरू केला आहे तर आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेसही पंजाबमध्ये मागे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर प्रदेशमध्ये दौरे वाढले आहेत. त्यात ते  विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करतात किंवा नव्या प्रकल्पांचे उद्घाटन. या निवडणुकीला त्यांनी किती महत्त्व दिले आहे, हेच यातून दिसते. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी लोकांच्या संपर्कात आहेतच. परंतु, जनतेच्या मनात निवडणुका घेतल्या जाण्याची अनिश्चितता आहे. लॉकडाऊन व निर्बंध लागू केले जातील, याबद्दल ते बोलतात. कारण सरकार आणि त्याच्या यंत्रणा तिसरी लाट हाताळू शकणार नाहीत, याची त्यांना खात्री आहे.

लाटेचा कळस फेब्रुवारीत?

राष्ट्रीय कोविड - १९ सुपर मॉडेल समितीचे प्रमुख विद्यासागर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, “डेल्टाची जागा ओमायक्रॉन विषाणूने प्रभावीपणे घ्यायला सुरूवात केली की, भारतात कोरोना विषाणूची तिसरी लाट निश्चित आहे. ही लाट ओमायक्रॉनमुळे असेल व ती पुढील वर्षाच्या सुरुवातीला येण्याची आणि तिचा कळस फेब्रुवारीत गाठला जाण्याची शक्यता आहे.” 

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग