शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुका ठरल्याप्रमाणे होतील? राजकीय वर्तुळात चर्चा सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 05:53 IST

कोविड-१९, ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये होतेय वाढ

व्यंकटेश केसरी, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली असतानाच राजकीय वर्तुळात या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील की नाही, याची चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण आहे ते कोविड-१९ आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ. उत्तर प्रदेश राज्य दिल्ली, पंजाब आणि उत्तराखंडच्या सीमेवर असले तरी राजधानी दिल्लीपासूनही फार दूर नाही. एकदा निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यावर कोविडसंबंधित आचारसंहितेचे पालन करून घेणे निवडणूक आयोगाला कठीण होणार आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोवा विधानसभेची निवडणूक येत्या ६० दिवसांत घेतली जाणे अपेक्षित आहे तर उत्तर प्रदेशमध्ये ती ५ ते ६ टप्प्यांत होईल. 

उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजप हा प्रचारात आघाडीवर असून, त्याने जाहिरातींवर कोट्यवधी रूपये खर्च सुरू केला आहे तर आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेसही पंजाबमध्ये मागे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर प्रदेशमध्ये दौरे वाढले आहेत. त्यात ते  विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करतात किंवा नव्या प्रकल्पांचे उद्घाटन. या निवडणुकीला त्यांनी किती महत्त्व दिले आहे, हेच यातून दिसते. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी लोकांच्या संपर्कात आहेतच. परंतु, जनतेच्या मनात निवडणुका घेतल्या जाण्याची अनिश्चितता आहे. लॉकडाऊन व निर्बंध लागू केले जातील, याबद्दल ते बोलतात. कारण सरकार आणि त्याच्या यंत्रणा तिसरी लाट हाताळू शकणार नाहीत, याची त्यांना खात्री आहे.

लाटेचा कळस फेब्रुवारीत?

राष्ट्रीय कोविड - १९ सुपर मॉडेल समितीचे प्रमुख विद्यासागर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, “डेल्टाची जागा ओमायक्रॉन विषाणूने प्रभावीपणे घ्यायला सुरूवात केली की, भारतात कोरोना विषाणूची तिसरी लाट निश्चित आहे. ही लाट ओमायक्रॉनमुळे असेल व ती पुढील वर्षाच्या सुरुवातीला येण्याची आणि तिचा कळस फेब्रुवारीत गाठला जाण्याची शक्यता आहे.” 

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग