शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

'अग्निपथ'मधून कमजोर सैनिक तयार होतील? लष्कराला विचारण्यात आला प्रश्न, उत्तर मिळाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 16:46 IST

New Army Recruitment Policy: गेल्या दोन वर्षात मोठ्या विचारमंथनानंतर लष्करात भरतीची नवी योजना जाहीर करण्यात आली आहे.

New Army Recruitment Policy : लष्कर, नौदल आणि हवाई दलात सैनिकांच्या भरतीसाठी भारत सरकारने मंगळवारी नवीन 'अग्निपथ योजना' जाहीर केली. या योजनेंतर्गत सैनिकांची भरती केवळ 4 वर्षांसाठी असेल, ज्याला 'अग्निवीर' म्हटले जाईल. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) च्या बैठकीत नवीन योजनेला मंजुरी दिल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याची घोषणा केली. यावेळी माध्यमांनी नोकरीतील प्रशिक्षण, अनुभव, पगार, निवड याबाबत अनेक प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांची लष्कराकडून उत्तरे देण्यात आली.

प्रशिक्षण कमी पडणार नाही? त्याचा काही परिणाम होणार नाही का?उत्तर- मूलभूत प्रशिक्षण 18 आठवड्यांचे असते, त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. अजूनही हीच प्रक्रिया फॉलो केली जाते. आम्ही फक्त त्याची वेळ कमी केली आहे. प्रशिक्षण वेळेवर आणि योग्य असावे हा यामागचा विचार आहे. प्रथम उमेदवारांना मूलभूत प्रशिक्षण दिले जाईल, नंतर व्यावसायिक कामासाठी 16 आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर 3 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा असेल.

यामुळे सैन्यात असलेल्यांच्या मनोबलावर परिणाम होणार नाही का?उत्तर- सैन्यात असलेल्या अधिकारी आणि सैनिकांच्या मनोबलावर काही परिणाम होणार नाही. सैन्यात युनिटनुसार बदल्या केल्या जातात. नौदलाच्या बाबतीत, जहाज किंवा युनिटमध्ये 2-3 वर्षांत बदली होते. एका जहाजावरुन दुसऱ्या जहाजावरही पाठवले जाते. सर्व पोस्टिंग वरिष्ठांसह कनिष्ठांसाठीही असते. आता यात अग्निवीरही असतील.

चीन-पाकिस्तान सीमेवर कमी प्रशिक्षण घेऊन कसे चालेल?उत्तर- प्रशिक्षण दिल्यानंतर अग्निवीरदेखील सध्याच्या सैनिकांप्रमाणेच आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम असेल. लष्करातील प्रशिक्षणाचा दर्जा कठीण आहे. यंत्रणेच्या माध्यमातून सैनिकांवर सतत देखरेख ठेवली जाते. अग्निवीरच्या प्रशिक्षणात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ते पाकिस्तान किंवा चीन सीमेवर तैनात केले जातील. यामुळे आमची ऑपरेशनल क्षमता कमी होणार नाही. 

स्थिर नोकरी आणि पेन्शन नाही, तरुणांना पर्याय काय?उत्तर- बारावीनंतर तीन पर्याय आहेत: उच्च अभ्यास, दुसरा कौशल्य विकास, तिसरी नोकरी. आम्ही तरुणांना तीनही संधी देत ​​आहोत. चांगला पगार, चांगला बँक बॅलन्स, त्यांच्याकडे 4 वर्षांनंतर चांगले कौशल्य असेल. हे कौशल्य बाहेर उपयोगी पडेल, तसेच क्रेडिट पॉइंट्स दिले जातील, जे उच्च अभ्यासात उपयुक्त ठरतील. बाहेरील आव्हानांना हे उमेदवार सहज सामोरे जाऊ शकतील. 

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागRajnath Singhराजनाथ सिंह