शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

'अग्निपथ'मधून कमजोर सैनिक तयार होतील? लष्कराला विचारण्यात आला प्रश्न, उत्तर मिळाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 16:46 IST

New Army Recruitment Policy: गेल्या दोन वर्षात मोठ्या विचारमंथनानंतर लष्करात भरतीची नवी योजना जाहीर करण्यात आली आहे.

New Army Recruitment Policy : लष्कर, नौदल आणि हवाई दलात सैनिकांच्या भरतीसाठी भारत सरकारने मंगळवारी नवीन 'अग्निपथ योजना' जाहीर केली. या योजनेंतर्गत सैनिकांची भरती केवळ 4 वर्षांसाठी असेल, ज्याला 'अग्निवीर' म्हटले जाईल. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) च्या बैठकीत नवीन योजनेला मंजुरी दिल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याची घोषणा केली. यावेळी माध्यमांनी नोकरीतील प्रशिक्षण, अनुभव, पगार, निवड याबाबत अनेक प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांची लष्कराकडून उत्तरे देण्यात आली.

प्रशिक्षण कमी पडणार नाही? त्याचा काही परिणाम होणार नाही का?उत्तर- मूलभूत प्रशिक्षण 18 आठवड्यांचे असते, त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. अजूनही हीच प्रक्रिया फॉलो केली जाते. आम्ही फक्त त्याची वेळ कमी केली आहे. प्रशिक्षण वेळेवर आणि योग्य असावे हा यामागचा विचार आहे. प्रथम उमेदवारांना मूलभूत प्रशिक्षण दिले जाईल, नंतर व्यावसायिक कामासाठी 16 आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर 3 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा असेल.

यामुळे सैन्यात असलेल्यांच्या मनोबलावर परिणाम होणार नाही का?उत्तर- सैन्यात असलेल्या अधिकारी आणि सैनिकांच्या मनोबलावर काही परिणाम होणार नाही. सैन्यात युनिटनुसार बदल्या केल्या जातात. नौदलाच्या बाबतीत, जहाज किंवा युनिटमध्ये 2-3 वर्षांत बदली होते. एका जहाजावरुन दुसऱ्या जहाजावरही पाठवले जाते. सर्व पोस्टिंग वरिष्ठांसह कनिष्ठांसाठीही असते. आता यात अग्निवीरही असतील.

चीन-पाकिस्तान सीमेवर कमी प्रशिक्षण घेऊन कसे चालेल?उत्तर- प्रशिक्षण दिल्यानंतर अग्निवीरदेखील सध्याच्या सैनिकांप्रमाणेच आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम असेल. लष्करातील प्रशिक्षणाचा दर्जा कठीण आहे. यंत्रणेच्या माध्यमातून सैनिकांवर सतत देखरेख ठेवली जाते. अग्निवीरच्या प्रशिक्षणात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ते पाकिस्तान किंवा चीन सीमेवर तैनात केले जातील. यामुळे आमची ऑपरेशनल क्षमता कमी होणार नाही. 

स्थिर नोकरी आणि पेन्शन नाही, तरुणांना पर्याय काय?उत्तर- बारावीनंतर तीन पर्याय आहेत: उच्च अभ्यास, दुसरा कौशल्य विकास, तिसरी नोकरी. आम्ही तरुणांना तीनही संधी देत ​​आहोत. चांगला पगार, चांगला बँक बॅलन्स, त्यांच्याकडे 4 वर्षांनंतर चांगले कौशल्य असेल. हे कौशल्य बाहेर उपयोगी पडेल, तसेच क्रेडिट पॉइंट्स दिले जातील, जे उच्च अभ्यासात उपयुक्त ठरतील. बाहेरील आव्हानांना हे उमेदवार सहज सामोरे जाऊ शकतील. 

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागRajnath Singhराजनाथ सिंह