शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: ती म्हणते, कोरोना लस घेतल्यामुळेच पतीचा मृत्यू; भारत बायोटेक म्हणतं, संबंधच नाही!

By प्रविण मरगळे | Updated: January 12, 2021 15:31 IST

२० डिसेंबर रोजी दीपकची तब्येत आणखी बिघडली, त्यांनी जेवणं सोडलं, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २१ डिसेंबरला अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

ठळक मुद्देज्याठिकाणी ते मजुरी करत होते, तिथे कोणीतरी सांगितले कोव्हॅक्सिन लावल्यानंतर ७५० रुपये मिळतीलतु आईला सांगू नको, लस घेतल्यानंतर दुसऱ्यादिवशी त्यांची तब्येत बिघडलीजर पोस्टमोर्टम रिपोर्ट योग्य असेल तर तो येण्यास इतका विलंब का लागला?

भोपाळच्या इंदिरा कॉलनीमध्ये ४० वर्षीय वैजयंतीचे पती दीपक मरावी सध्या या जगात नाहीत, दीपक १२ डिसेंबर रोजी कोव्हॅक्सिनच्या चाचणीमध्ये सहभागी झाले होते, २१ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्युनंतर पत्नी वैजयंतीही काही दिवस आजारी होती, ती म्हणाली, कोरोना लस घेण्यास नकार दिला तरीही त्यांनी ऐकलं नाही, आता आमचा आधार गेलाय, कुटुंब कसं उभं करायचं हे माहिती नाही.

दीपक कोरोना लस चाचणीसाठी कसे गेले? यावर वैजयंती म्हणाली, ज्याठिकाणी ते मजुरी करत होते, तिथे कोणीतरी सांगितले कोव्हॅक्सिन लावल्यानंतर ७५० रुपये मिळतील, ते घरात सगळ्यांना लस घेण्यासाठी बोलत होते, परंतु मी नकार दिला. जेव्हा ते इंजेक्शन घेऊन आले तेव्हा घरी कोणालाच सांगितले नाही, त्यांच्याकडे कागदही नव्हता. जेव्हा त्यांचा हात दुखू लागला तेव्हा छोट्या मुलाला सांगितले इंजेक्शन घेतलं आहे. तु आईला सांगू नको, लस घेतल्यानंतर दुसऱ्यादिवशी त्यांची तब्येत बिघडली, २-३ दिवस जेवण करणं सोडून दिलं, तब्येत ढासळत गेली, नंतर उलट्या सुरू झाल्या. औषधे द्या, डॉक्टरांना दाखवा सांगितलं तर ते आम्हालाच ओरडले.

२० डिसेंबर रोजी दीपकची तब्येत आणखी बिघडली, त्यांनी जेवणं सोडलं, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २१ डिसेंबरला अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये दीपकच्या शरीरात विष आढळलं, यावर पत्नी वैजयंती म्हणाली, ते पागल होते का, म्हणून विष प्यायले, विष पितो तेव्हा आपल्याला माहिती पडत नाही का? जर लस घेतल्यामुळे मृत्यू झाला नाही तर इंजेक्शन टोचल्यानंतर ते आजारी कसे पडले? त्यांनी चालणं-फिरणं सोडून दिलं, उलट्या का करू लागले? जर पोस्टमोर्टम रिपोर्ट योग्य असेल तर तो येण्यास इतका विलंब का लागला? १२ दिवस आम्ही भटकत राहिलो, आम्ही गरीब, अशिक्षित आहोत, ज्याच्याकडे पैसा आहे ते रिपोर्टमध्ये काहीही लिहू शकतात ते आम्ही कसं मानायचं? देवाने जरी सांगितलं तरी मी ते मान्य करणार नाही. ते कधी आजारीही पडत नव्हते. त्यांना कसलाही त्रास नव्हता आणि कसलं टेन्शनही नव्हतं असं पत्नीने सांगितले.

मृत्यूशी लसीची कोणताही संबंध नाही – भारत बायोटेक

दीपकच्या मृत्यूनंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले त्यानंतर भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनशी याचा काहीही संबंध नाही असं म्हटलं, तर रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, १२ डिसेंबर रोजी प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना पहिला डोस दिला, ७ दिवसापर्यंत त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली गेली, त्यात कोणताही त्रास नाही असं दीपकने सांगितले, तर कुटुंबाचा आरोप आहे की, आम्हाला कोणत्याही प्रकारे फोन आला नाही, कोणीही परिस्थिती जाणून घेतली नाही. इतकचं नाही तर ८ जानेवारीला रुग्णालयाकडून दुसऱ्या डोससाठी फोन आल्याचं दीपकच्या मुलाने सांगितले.

आता प्रश्न असा आहे की, दीपकच्या मृत्यूनंतर १८ दिवसांनी रुग्णालय प्रशासनाने स्वयंसेवकाच्या यादीतून दीपकचं नाव का काढलं नाही? डॉक्टर्स वारंवार दीपकच्या घरच्यांकडून अपडेट घेत होते, मग कुटुंबाच्या म्हणण्यानुसार आजारी असताना ते घरी का पोहचले नाहीत. मृत्यूनंतर तपासात बनवण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये ३ तासात रुग्णालय प्रशासनाला क्लीनचिट कशी दिली? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.   

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या