शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

Corona Vaccine: ती म्हणते, कोरोना लस घेतल्यामुळेच पतीचा मृत्यू; भारत बायोटेक म्हणतं, संबंधच नाही!

By प्रविण मरगळे | Updated: January 12, 2021 15:31 IST

२० डिसेंबर रोजी दीपकची तब्येत आणखी बिघडली, त्यांनी जेवणं सोडलं, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २१ डिसेंबरला अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

ठळक मुद्देज्याठिकाणी ते मजुरी करत होते, तिथे कोणीतरी सांगितले कोव्हॅक्सिन लावल्यानंतर ७५० रुपये मिळतीलतु आईला सांगू नको, लस घेतल्यानंतर दुसऱ्यादिवशी त्यांची तब्येत बिघडलीजर पोस्टमोर्टम रिपोर्ट योग्य असेल तर तो येण्यास इतका विलंब का लागला?

भोपाळच्या इंदिरा कॉलनीमध्ये ४० वर्षीय वैजयंतीचे पती दीपक मरावी सध्या या जगात नाहीत, दीपक १२ डिसेंबर रोजी कोव्हॅक्सिनच्या चाचणीमध्ये सहभागी झाले होते, २१ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्युनंतर पत्नी वैजयंतीही काही दिवस आजारी होती, ती म्हणाली, कोरोना लस घेण्यास नकार दिला तरीही त्यांनी ऐकलं नाही, आता आमचा आधार गेलाय, कुटुंब कसं उभं करायचं हे माहिती नाही.

दीपक कोरोना लस चाचणीसाठी कसे गेले? यावर वैजयंती म्हणाली, ज्याठिकाणी ते मजुरी करत होते, तिथे कोणीतरी सांगितले कोव्हॅक्सिन लावल्यानंतर ७५० रुपये मिळतील, ते घरात सगळ्यांना लस घेण्यासाठी बोलत होते, परंतु मी नकार दिला. जेव्हा ते इंजेक्शन घेऊन आले तेव्हा घरी कोणालाच सांगितले नाही, त्यांच्याकडे कागदही नव्हता. जेव्हा त्यांचा हात दुखू लागला तेव्हा छोट्या मुलाला सांगितले इंजेक्शन घेतलं आहे. तु आईला सांगू नको, लस घेतल्यानंतर दुसऱ्यादिवशी त्यांची तब्येत बिघडली, २-३ दिवस जेवण करणं सोडून दिलं, तब्येत ढासळत गेली, नंतर उलट्या सुरू झाल्या. औषधे द्या, डॉक्टरांना दाखवा सांगितलं तर ते आम्हालाच ओरडले.

२० डिसेंबर रोजी दीपकची तब्येत आणखी बिघडली, त्यांनी जेवणं सोडलं, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २१ डिसेंबरला अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये दीपकच्या शरीरात विष आढळलं, यावर पत्नी वैजयंती म्हणाली, ते पागल होते का, म्हणून विष प्यायले, विष पितो तेव्हा आपल्याला माहिती पडत नाही का? जर लस घेतल्यामुळे मृत्यू झाला नाही तर इंजेक्शन टोचल्यानंतर ते आजारी कसे पडले? त्यांनी चालणं-फिरणं सोडून दिलं, उलट्या का करू लागले? जर पोस्टमोर्टम रिपोर्ट योग्य असेल तर तो येण्यास इतका विलंब का लागला? १२ दिवस आम्ही भटकत राहिलो, आम्ही गरीब, अशिक्षित आहोत, ज्याच्याकडे पैसा आहे ते रिपोर्टमध्ये काहीही लिहू शकतात ते आम्ही कसं मानायचं? देवाने जरी सांगितलं तरी मी ते मान्य करणार नाही. ते कधी आजारीही पडत नव्हते. त्यांना कसलाही त्रास नव्हता आणि कसलं टेन्शनही नव्हतं असं पत्नीने सांगितले.

मृत्यूशी लसीची कोणताही संबंध नाही – भारत बायोटेक

दीपकच्या मृत्यूनंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले त्यानंतर भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनशी याचा काहीही संबंध नाही असं म्हटलं, तर रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, १२ डिसेंबर रोजी प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना पहिला डोस दिला, ७ दिवसापर्यंत त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली गेली, त्यात कोणताही त्रास नाही असं दीपकने सांगितले, तर कुटुंबाचा आरोप आहे की, आम्हाला कोणत्याही प्रकारे फोन आला नाही, कोणीही परिस्थिती जाणून घेतली नाही. इतकचं नाही तर ८ जानेवारीला रुग्णालयाकडून दुसऱ्या डोससाठी फोन आल्याचं दीपकच्या मुलाने सांगितले.

आता प्रश्न असा आहे की, दीपकच्या मृत्यूनंतर १८ दिवसांनी रुग्णालय प्रशासनाने स्वयंसेवकाच्या यादीतून दीपकचं नाव का काढलं नाही? डॉक्टर्स वारंवार दीपकच्या घरच्यांकडून अपडेट घेत होते, मग कुटुंबाच्या म्हणण्यानुसार आजारी असताना ते घरी का पोहचले नाहीत. मृत्यूनंतर तपासात बनवण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये ३ तासात रुग्णालय प्रशासनाला क्लीनचिट कशी दिली? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.   

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या