शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असणार वाय-फाय सुविधा, 2018 अखेरपर्यंत साडेसात लाख हॉटस्पॉट स्थापन करण्याचा सरकारचा मानस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 08:39 IST

पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत वायफायच्या माध्यमातून कमीत कमी साडेसात लाख पब्लिक इंटरनेट हॉटस्पॉट प्रस्थापित केले जाणार आहेत.

ठळक मुद्देडिजिटल इंडियाच्या दिशेने केंद्र सरकारने मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत वायफायच्या माध्यमातून कमीत कमी साडेसात लाख पब्लिक इंटरनेट हॉटस्पॉट प्रस्थापित केले जाणार आहेत. अर्ध शहरी आणि ग्रामीण भागात हायस्पीड इंटरनेट सुविधा सुरू करण्याची सरकारची योजना आहे.

नवी दिल्ली- डिजिटल इंडियाच्या दिशेने केंद्र सरकारने मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत वायफायच्या माध्यमातून कमीत कमी साडेसात लाख पब्लिक इंटरनेट हॉटस्पॉट प्रस्थापित केले जाणार आहेत. अर्ध शहरी आणि ग्रामीण भागात हायस्पीड इंटरनेट सुविधा सुरू करण्याची सरकारची योजना आहे. यासाठी खासगी कंपन्याही इंटरनेट सेवा देणार आहेत.इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडर्स व्यतिरिक्त रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि सरकारी कंपनी बीएसएनएलच्या मदतीने या योजनेला पूर्ण केलं जाणार आहे. हायस्पीड आणि स्वस्त इंटरनेटच्या माध्यमातून ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल विकासासाठी लोकांचा पुढाकार वाढविण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती दूरसंचार सचिव अरूणा सुंदराजन यांनी दिली आहे. 

दुनियेतील अनेक देशांमध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचं मूळ हे वायफाय सुविधा असतं. पण भारत यामध्ये बराच मागे आहे. आकडेवारीनुसार,2016 पर्यंत भारतात फक्त 31 हजार हॉटस्पॉट होते. तर फ्रान्समध्ये 1 करोड तीन लाख, अमेरिकेत 98 लाख आणि ब्रिटनमध्ये 56 लाख हॉटस्पॉट आहेत. भारतातील हॉटस्पॉटची आकडेवारी या तुलनेत अतिशय कमी आहे. 

देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये फायबर नेटवर्क पसरविण्याचं काम जोरदार सुरू आहे. आत्तापर्यंत 75 हजार ग्रामपंचायतींमध्ये काम पूर्ण झालं असून डिसेंबरपर्यंत एक लाख ग्रामपंचायतींमध्ये फायबर नेटवर्क पसरविण्याचा संकल्प असल्याचं सुंदराजन यांनी सांगितलं. दूरसंचार मंत्रालय वाय-फायच्या या मेगा प्रोजेक्टसाठी टेंडरही जारी करणार आहे. मंत्रालयाने सगळ्या राज्य सरकारच्या प्रतिनिधींची उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. आरोग्य, शिक्षण आणि ग्रामिण विकाससारख्या क्षेत्रांमध्ये डिजिटल सेवा पोहचविण्याच्या तर्कांवर विचार करण्याबद्दल या बैठकित सांगण्यात आलं.

दूरसंचार कंपन्या संपूर्ण देशात 4जी स्पीडचं नेटवर्क पसरवते आहे पण ग्रामीण भागात अजूनही हे काम खूप संथ गतीने सुरू आहे. या ग्रामीण भागांमध्ये हायस्पीड इंटरनेट पोहचविण्याची योजना सरकारने आखली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तीन वाय-फाय स्पॉट असावे, अशी सरकारची योजना आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एख जीबी डेटा देण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचं सुंदराजन यांनी सांगितलं.