शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

नियुक्ती मध्यरात्री का केली? मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर राहुल गांधींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 06:49 IST

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विद्यमान नियुक्ती प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आलेले असतानाही केंद्र सरकारने सोमवारी मध्यरात्री त्या पदावर ज्ञानेशकुमार यांची नियुक्ती केली.

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विद्यमान नियुक्ती प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आलेले असतानाही केंद्र सरकारने सोमवारी मध्यरात्री त्या पदावर ज्ञानेशकुमार यांची नियुक्ती केली. हा निर्णय अवमानकारक व अनादर करणारा आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, केंद्रीय गृहमंत्री यांचा समावेश असलेल्या समितीने हा निर्णय घेतला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आणि भारताच्या सरन्यायाधीशांना समितीतून काढून टाकून मोदी सरकारने निवडणूक प्रक्रियेबद्दल लाखो मतदारांच्या चिंता वाढवल्याचा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्षनेता या नात्याने बाबासाहेब आंबेडकर आणि धोरण ठरविणाऱ्या नेत्यांचा आदर्श राखणे आणि सरकारला जबाबदार धरणे हे माझे कर्तव्य आहे. समितीची रचना आणि कार्यपद्धतीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्यावर ४८ तासांपेक्षा कमी कालावधीत सुनावणी होणार आहे. अशा वेळी नवीन निवडणूक आयुक्त निवडण्याचा मध्यरात्री निर्णय घेणे हे देशाच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिष्ठेला न शोभणारे आणि चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसनेही मुख्य निवडणूक आयुक्त निवड समितीची बैठक पुढे ढकलावी, अशी मागणी केली होती. मात्र तरीही बैठक घेण्यात आली.

कोर्टाचा आदेश असतानाही...

राहुल गांधी यांनी सांगितले की, सरन्यायाधीश, पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांच्या समितीने मुख्य निवडणूक आयुक्त, निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्तीसंदर्भात निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २ मार्च २०२३ रोजी दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारने या नियुक्त्यांसंदर्भात एक कायदा ऑगस्ट २०२३मध्ये मंजूर केला. त्यात सदर समितीतून सरन्यायाधीशांना वगळण्यात आले होते, अशी टीका गांधी यांनी केली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग