शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

मक्का मशीद आणि अजमेर ब्लास्ट प्रकरणात का केले नाही अपील? सरकारवर एवढे का भडकले ओवेसी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 19:22 IST

२००६ च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटात १८९ लोक मारले गेले होते. तर ८०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

मुंबईमध्ये २००६ मध्ये झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. एक-दोन नव्हे तर तब्बल ७ बॉम्बस्फोट केवळ ११ मिनिटांत झाले होते. यांत १८० हून अधिक लोकांचा बळी गेला होता. यासंदर्भात अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाने १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे दारवाजा ठोठावला आहे. सरकारच्या अपीलावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यासंपूर्ण प्रकरणावर आता एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी अत्यंत नाराज दिसत आहेत, त्यांनी सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय म्हणाले ओवेसी? -ओवैसी म्हणाले, न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यांनी त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे आणि १८ वर्षांनंतर तुरुंगातून सुटलेल्या आरोपींना पुन्हा अटक केली जाणार नाही, असे म्हटले आहे. मी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला विचारू इच्छितो की जेव्हा हे लोक कायदेशीररित्याच नव्हे, तर पूर्णपणे निर्दोष आहेत तेव्हा तुम्ही हे अपील का दाखल करत आहात. 

याशिवाय ओवेसी म्हणाले, सरकारने घाईघाईने अपील केले, मात्र मक्का मशीद आणि अजमेर बॉम्बस्फोटासंदर्भात तसे केले नाही. उद्या मालेगाव प्रकरणातही निर्दोष सुटका झाली, तर तुम्ही अपील कराल का? हे खरे परिमान आहे. दहशतवाद समूळ नष्ट करायला हवा. मात्र, जर सरकार आरोपींच्या धर्माच्या आधारावर अपील करत असेल, तर दहशतवादाविरुद्धची तुमची लढाई कमकुवत होईल.

१८९ लोक मारले गेले होते, ८०० हून अधिक लोक जखमी झाले होते -२००६ च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटात १८९ लोक मारले गेले होते. तर ८०० हून अधिक लोक जखमी झाले होते. मुंबई उच्च न्यायालयाने २१ जुलै रोजी या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. २०१५ मध्ये, कनिष्ठ न्यायालयाने या १२ आरोपींना दोषी ठरवले होते, यांपैकी पाच जणांना मृत्युदंडाची, तर इतरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीState Governmentराज्य सरकारTerrorismदहशतवादSupreme Courtसर्वोच्च न्यायालय