शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काश्मीरमधील कलम 370 ची तात्पुरती तरतूद 'राजकारणा'मुळे 70 वर्षे राहिली; एस. जयशंकर यांचा विरोधी पक्षांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 08:41 IST

S Jaishankar : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संवाद साधला.

कोलकाता : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी जम्मू-काश्मीरमधून  (Jammu-Kashmir) कलम 370 (Article 370) हटवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरून विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. राजकीय मजबुरी देशाच्या सीमांना धोका पोहोचवणारी किंवा देशाच्या हिताला बाधक ठरू नये, असे एस. जयशंकर म्हणाले. तसेच, विरोधी पक्षांवर टीका करताना एस. जयशंकर यांनी सवाल केला की, जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 सारखी तात्पुरती तरतूद दीर्घकाळ सुरू ठेवण्यामागे राजकारणाशिवाय दुसरे काय कारण आहे?

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संवाद साधला. यावेळी एस. जयशंकर म्हणाले की, कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरसाठी केलेली तात्पुरती तरतूद 'राजकारणा'मुळे 70 वर्षांहून अधिक काळ राहिली. राष्ट्रहिताला प्राधान्य देणे सर्वात महत्त्वाचे आहे. देशाच्या मोठ्या हिताला बाधा पोहोचेल, असे राजकारण करू नये. हा सर्व नेत्यांचा पहिला दृष्टिकोन असला पाहिजे.

आपल्या सीमांना धोका निर्माण करणारे राजकारण होऊ नये. 2019 मध्ये कलम 370 रद्द करण्याबाबत तात्पुरती तरतूद इतके दिवस टिकण्यासाठी राजकारणाशिवाय दुसरे कारण काय आहे, असा सवाल एस. जयशंकर यांनी केला. तसेच, खरं म्हणजे इथे गोष्टी इतक्या अव्यवस्थित होत्या की जगाने त्याचा वापर केला. देशाच्या राजकारणावर परिणाम होत असल्याने या मुद्द्यावर जनमत तयार करण्याची गरज असल्याचे एस. जयशंकर म्हणाले.

पाकिस्तानला एफ-16 सारखी लढाऊ विमाने दिल्याच्या मुद्द्यावर एस. जयशंकर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 'जर तुम्ही गेल्या 75 वर्षांचा विचार केला तर अशा पावलांनी लष्करी हुकूमशाहीला प्रोत्साहन देण्याशिवाय काहीही केले नाही'. तसेच, पाकिस्तानचे नाव न घेता, त्यांनी शेजारी असलेल्या देशाला आपल्या सीमेबाहेर दहशतवादाला पाठिंबा दिल्याच्या परिणामांचे 'मूल्यांकन' करण्यास सांगितले.

याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील होण्यापूर्वी अनेक दशके मुत्सद्दी म्हणून काम केलेले एस. जयशंकर म्हणाले की, जागतिक स्तरावर भारताला आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्व आहे. आज भारताकडे नेतृत्व आणि दूरदृष्टी तसेच चिकाटी आणि आपले जागतिक स्थान उंचावण्यासाठी वचनबद्धता आहे.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरwest bengalपश्चिम बंगालJammu Kashmirजम्मू-काश्मीर