शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

काश्मीरमधील कलम 370 ची तात्पुरती तरतूद 'राजकारणा'मुळे 70 वर्षे राहिली; एस. जयशंकर यांचा विरोधी पक्षांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 08:41 IST

S Jaishankar : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संवाद साधला.

कोलकाता : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी जम्मू-काश्मीरमधून  (Jammu-Kashmir) कलम 370 (Article 370) हटवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरून विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. राजकीय मजबुरी देशाच्या सीमांना धोका पोहोचवणारी किंवा देशाच्या हिताला बाधक ठरू नये, असे एस. जयशंकर म्हणाले. तसेच, विरोधी पक्षांवर टीका करताना एस. जयशंकर यांनी सवाल केला की, जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 सारखी तात्पुरती तरतूद दीर्घकाळ सुरू ठेवण्यामागे राजकारणाशिवाय दुसरे काय कारण आहे?

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संवाद साधला. यावेळी एस. जयशंकर म्हणाले की, कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरसाठी केलेली तात्पुरती तरतूद 'राजकारणा'मुळे 70 वर्षांहून अधिक काळ राहिली. राष्ट्रहिताला प्राधान्य देणे सर्वात महत्त्वाचे आहे. देशाच्या मोठ्या हिताला बाधा पोहोचेल, असे राजकारण करू नये. हा सर्व नेत्यांचा पहिला दृष्टिकोन असला पाहिजे.

आपल्या सीमांना धोका निर्माण करणारे राजकारण होऊ नये. 2019 मध्ये कलम 370 रद्द करण्याबाबत तात्पुरती तरतूद इतके दिवस टिकण्यासाठी राजकारणाशिवाय दुसरे कारण काय आहे, असा सवाल एस. जयशंकर यांनी केला. तसेच, खरं म्हणजे इथे गोष्टी इतक्या अव्यवस्थित होत्या की जगाने त्याचा वापर केला. देशाच्या राजकारणावर परिणाम होत असल्याने या मुद्द्यावर जनमत तयार करण्याची गरज असल्याचे एस. जयशंकर म्हणाले.

पाकिस्तानला एफ-16 सारखी लढाऊ विमाने दिल्याच्या मुद्द्यावर एस. जयशंकर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 'जर तुम्ही गेल्या 75 वर्षांचा विचार केला तर अशा पावलांनी लष्करी हुकूमशाहीला प्रोत्साहन देण्याशिवाय काहीही केले नाही'. तसेच, पाकिस्तानचे नाव न घेता, त्यांनी शेजारी असलेल्या देशाला आपल्या सीमेबाहेर दहशतवादाला पाठिंबा दिल्याच्या परिणामांचे 'मूल्यांकन' करण्यास सांगितले.

याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील होण्यापूर्वी अनेक दशके मुत्सद्दी म्हणून काम केलेले एस. जयशंकर म्हणाले की, जागतिक स्तरावर भारताला आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्व आहे. आज भारताकडे नेतृत्व आणि दूरदृष्टी तसेच चिकाटी आणि आपले जागतिक स्थान उंचावण्यासाठी वचनबद्धता आहे.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरwest bengalपश्चिम बंगालJammu Kashmirजम्मू-काश्मीर