शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

संघ का वाढवतोय मुस्लिमांशी जवळीक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 12:24 IST

संघाने १९९० च्या दशकात वरिष्ठ अधिकारी इंद्रेश कुमार यांच्या संयोजनात राष्ट्रीय मुस्लीम मंचचे गठन तर केले होते

शरद गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी मशीद व मदरशांमध्ये का जात आहेत? मुस्लिमांमध्ये स्वीकारार्हता वाढवायची आहे की आंतरराष्ट्रीय दबावात प्रतिमा सुधारण्याचा हा प्रयत्न आहे? 

संघाने १९९० च्या दशकात वरिष्ठ अधिकारी इंद्रेश कुमार यांच्या संयोजनात राष्ट्रीय मुस्लीम मंचचे गठन तर केले होते; परंतु यात संघ कधीही यशस्वी झालेला नाही. श्रीराम जन्मभूमी आंदोलनापासून गुजरात दंगलींपर्यंत दरी मिटली नाही. मागील काही वर्षांत मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर संघ पहिल्यापेक्षा मजबूत होऊन पुढे आला आहे. कधी गोरक्षेच्या नावावर हत्या व कधी दहशतवादाच्या नावावर कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सरकारवर संघाची प्रतिमा कट्टर हिंदुत्वाची झाली. अमेरिका व ब्रिटनमध्ये सत्तांतर झाल्यावर कट्टर हिंदुत्वाच्या विरोधात वातावरण तयार होत आहे. साध्वी ऋतुंभरा यांचा चार दिवसीय दौरा ब्रिटन सरकारने हेट स्पीचमुळे रद्द केला. त्यांना अमेरिकेहून परतावे लागले.  इंग्लंडच्या लिसेस्टर शहरात रस्त्यांवर पोलिसांच्या समोर हिंदू-मुस्लिमांमध्ये झालेला संघर्ष ब्रिटनच्या माध्यमांनी उचलून धरला आहे. राष्ट्रीय मुस्लीम मंचचे संयोजक व संघाचे प्रचारक इंद्रेश कुमार म्हणतात की, मंचच्या विचारानुसार संघ सतत मुस्लिमांशी संपर्क वाढवत आहे. संघ नेहमी लोकांना व समुदायांना जोडण्याच्या बाजूने आहे.

उग्र हिंदुत्वाला सौम्य करायचे आहेमुस्लिमांशी जवळीक वाढत आहे व उग्र हिंदुत्वाची धार काहीशी सौम्य करायची आहे, हा संदेश आपल्या काऱ्यकर्त्यांना द्यायचा आहे. त्याचमुळे मागील एक वर्षाच्या कालावधीत संघप्रमुखांनी चार वेळा मुस्लिमांशी केवळ चर्चाच केलेली नाही तर गुरुवारी प्रथमच मशीद व मदरशाला भेट दिली. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMuslimमुस्लीमMohan Bhagwatमोहन भागवत