शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडींपासून राहूल गांधी अलिप्त का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 16:02 IST

राहुल गांधी या सत्तास्थापनेपासून दूर दिसत आहेत. राहुल यांनी महाशिवआघाडीसंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांना ही आघाडी मान्य आहे की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या मुद्दावरून गल्ली ते दिल्ली राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, काँग्रेसचे राज्यातील नेते या घडामोडींमध्ये केंद्रस्थानी आहेत. मात्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या राज्याच्या सत्तास्थापनेत रस घेताना दिसून येत नाहीये. 

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळवून दिले होते. यापैकी गुजरातमध्ये काँग्रेस सत्तास्थापनेपासून थोडं अंतर दूर होती. तर कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत सहभागी झाले होते. मात्र राजकीय डावपेच आणि आमदार फुटल्यामुळे येथील सत्ता पुन्हा भाजपकडे गेली. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस बॅकफुटला गेली होती. त्यानंतरही हार न मानता राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी प्रचार सभा घेताना दिसले. त्यामुळे राहुल पुन्हा जोमाने मैदानात उतरले अशी चर्चा होती. महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी चांगली होणार नाही, हे सर्वश्रूत होते. तसचं झालं. मात्र अनपेक्षीतपणे काँग्रेसकडे सत्तेत जाण्याची संधी आली आहे. शिवसेनेने हात पुढं केल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सत्तेत सामील होण्याचे योग आले आहे. 

या पार्श्वभूमीवर राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यात आणि दिल्लीत बैठकांचा धडाका सुरू आहे. शरद पवार खुद्द लक्ष घालत असून सोनिया गांधी यांनी देखील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग दिला आहे. मात्र राहुल गांधी या सत्तास्थापनेपासून दूर दिसत आहेत. राहुल यांनी महाशिवआघाडीसंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांना ही आघाडी मान्य आहे की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच मान्य असेल तर राहुल कुठं तरी दिसायला हवे होते, असंही अनेक नेत्यांना वाटत आहे.