शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडींपासून राहूल गांधी अलिप्त का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 16:02 IST

राहुल गांधी या सत्तास्थापनेपासून दूर दिसत आहेत. राहुल यांनी महाशिवआघाडीसंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांना ही आघाडी मान्य आहे की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या मुद्दावरून गल्ली ते दिल्ली राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, काँग्रेसचे राज्यातील नेते या घडामोडींमध्ये केंद्रस्थानी आहेत. मात्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या राज्याच्या सत्तास्थापनेत रस घेताना दिसून येत नाहीये. 

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळवून दिले होते. यापैकी गुजरातमध्ये काँग्रेस सत्तास्थापनेपासून थोडं अंतर दूर होती. तर कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत सहभागी झाले होते. मात्र राजकीय डावपेच आणि आमदार फुटल्यामुळे येथील सत्ता पुन्हा भाजपकडे गेली. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस बॅकफुटला गेली होती. त्यानंतरही हार न मानता राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी प्रचार सभा घेताना दिसले. त्यामुळे राहुल पुन्हा जोमाने मैदानात उतरले अशी चर्चा होती. महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी चांगली होणार नाही, हे सर्वश्रूत होते. तसचं झालं. मात्र अनपेक्षीतपणे काँग्रेसकडे सत्तेत जाण्याची संधी आली आहे. शिवसेनेने हात पुढं केल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सत्तेत सामील होण्याचे योग आले आहे. 

या पार्श्वभूमीवर राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यात आणि दिल्लीत बैठकांचा धडाका सुरू आहे. शरद पवार खुद्द लक्ष घालत असून सोनिया गांधी यांनी देखील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग दिला आहे. मात्र राहुल गांधी या सत्तास्थापनेपासून दूर दिसत आहेत. राहुल यांनी महाशिवआघाडीसंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांना ही आघाडी मान्य आहे की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच मान्य असेल तर राहुल कुठं तरी दिसायला हवे होते, असंही अनेक नेत्यांना वाटत आहे.