शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरबाबत आधी का ठरविले नाही?

By admin | Updated: August 24, 2015 01:43 IST

पाकिस्तानला काश्मीर मुद्दा उपस्थित करण्यात एवढे स्वारस्य होते तर उफा येथील बैठकीतच त्याचा उल्लेख का केला नाही, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केला

नवी दिल्ली : पाकिस्तानला काश्मीर मुद्दा उपस्थित करण्यात एवढे स्वारस्य होते तर उफा येथील बैठकीतच त्याचा उल्लेख का केला नाही, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केला. दुसरीकडे मोदी सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी केला आहे. पाकिस्तानातील प्रसिद्धिमाध्यमांनी मात्र चर्चा रद्द होण्याचे खापर अपेक्षेप्रमाणे भारतावर फोडले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी उफा बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चेची सहमती दर्शविली असताना पाकने या बैठकीच्या अजेंड्याला फारकत दिल्याचा आरोप करतानाच राजनाथसिंह यांनी भविष्यातील चर्चा या देशाच्या भूमिकेवरच निर्भर राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी काश्मीर मुद्द्यावर कोणतीही चर्चा होणार नाही असे सांगत अखेरची खीळ घातली. आपण सामोरे जाण्याऐवजी केवळ माघारच घेत आहोत, असे हुरियत कॉन्फरन्सचे नेते मीरवाईज उमर फारूक यांनी सांगितले. चर्चा ऐनवेळी रद्द झाल्याने आमची निराशा झाली. पण दोन्ही देशांनी लवकरच पुन्हा चर्चा करावी, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले.भारत-पाक चर्चा रद्द होणे निराशाजनक आहे, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी दिली असताना माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी सर्व खापर फुटीरतावादी नेत्यांवर फोडले आहे. ओमर अब्दुल्ला यांनीही नाराजी व्यक्त केली.पाकने बनवले खेळणे। चर्चेचा मुद्दा ज्या पद्धतीने हाताळला ते पाहता मोदी सरकार पाकच्या हातचे खेळणे बनल्याचे दिसून येते, असा आरोप काँग्रेसने केला आहे.पाकची लंगडी भूमिका । चर्चेतून माघार घेतल्यामुळे पाकची दहशतवादासंबंधी भूमिका उघडी पडली आहे, असे सांगत भाजपाने काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला.(लोकमत न्यूज नेटवर्क)