शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरबाबत आधी का ठरविले नाही?

By admin | Updated: August 24, 2015 01:43 IST

पाकिस्तानला काश्मीर मुद्दा उपस्थित करण्यात एवढे स्वारस्य होते तर उफा येथील बैठकीतच त्याचा उल्लेख का केला नाही, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केला

नवी दिल्ली : पाकिस्तानला काश्मीर मुद्दा उपस्थित करण्यात एवढे स्वारस्य होते तर उफा येथील बैठकीतच त्याचा उल्लेख का केला नाही, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केला. दुसरीकडे मोदी सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी केला आहे. पाकिस्तानातील प्रसिद्धिमाध्यमांनी मात्र चर्चा रद्द होण्याचे खापर अपेक्षेप्रमाणे भारतावर फोडले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी उफा बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चेची सहमती दर्शविली असताना पाकने या बैठकीच्या अजेंड्याला फारकत दिल्याचा आरोप करतानाच राजनाथसिंह यांनी भविष्यातील चर्चा या देशाच्या भूमिकेवरच निर्भर राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी काश्मीर मुद्द्यावर कोणतीही चर्चा होणार नाही असे सांगत अखेरची खीळ घातली. आपण सामोरे जाण्याऐवजी केवळ माघारच घेत आहोत, असे हुरियत कॉन्फरन्सचे नेते मीरवाईज उमर फारूक यांनी सांगितले. चर्चा ऐनवेळी रद्द झाल्याने आमची निराशा झाली. पण दोन्ही देशांनी लवकरच पुन्हा चर्चा करावी, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले.भारत-पाक चर्चा रद्द होणे निराशाजनक आहे, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी दिली असताना माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी सर्व खापर फुटीरतावादी नेत्यांवर फोडले आहे. ओमर अब्दुल्ला यांनीही नाराजी व्यक्त केली.पाकने बनवले खेळणे। चर्चेचा मुद्दा ज्या पद्धतीने हाताळला ते पाहता मोदी सरकार पाकच्या हातचे खेळणे बनल्याचे दिसून येते, असा आरोप काँग्रेसने केला आहे.पाकची लंगडी भूमिका । चर्चेतून माघार घेतल्यामुळे पाकची दहशतवादासंबंधी भूमिका उघडी पडली आहे, असे सांगत भाजपाने काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला.(लोकमत न्यूज नेटवर्क)