शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

केंद्रनिहाय मतमोजणी रद्द करण्याबाबत निर्णय का नाही?

By admin | Updated: September 9, 2014 05:26 IST

निवडणूक आयोगाच्या मतदान केंद्रनिहाय मतमोजणी रद्द करण्याच्या निर्णयावर चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा, असा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या मतदान केंद्रनिहाय मतमोजणी रद्द करण्याच्या निर्णयावर चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा, असा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

निवडणुकीसंबंधी सध्याच्या नियमांमध्ये कोणतीही दुरुस्ती न करता हा बदल करता येऊ शकतो काय याबाबत न्यायालयाने निवडणूक आयोगाकडूनही उत्तर मागितले आहे. निवडणुकीनंतर मतदान केंद्रनिहाय मतमोजणी जाहीर केल्यामुळे विजयी उमेदवाराच्या मनात कमी मतदान झालेल्या ठिकाणच्या लोकांबाबत आकस आणि सूडाची भावना निर्माण होऊ शकते, असे सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने स्पष्ट केले. पाच वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला पत्र पाठवून प्रस्ताव दिल्यानंतर सरकारने हा मुद्दा विधी आयोगाकडे का सोपविला नाही आणि गेल्या पाच वर्षांमध्ये कोणताही निर्णय का घेतला नाही, असा प्रश्नही खंडपीठाने विचारला.
विधी आयोगावर जबाबदारी ढकलू नका..
विधी आयोगाला या मुद्याशी काही देणेघेणे नाही. तुमचे उत्तर काय ते आम्हाला कळायला हवे. विधी आयोगाच्या खांद्यावर जबाबदारी सोडून तुम्ही हा मुद्दा टांगणीवर ठेवू शकत नाही, असे खंडपीठाने खडसावले. या खंडपीठात कुरियन जोसेफ आणि आर.एफ. नरीमन यांचा समावेश आहे. 
गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन
मतदानकेंद्रनिहाय मतमोजणी जाहीर केल्यामुळे मतदानाशी निगडित गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याकडे एका याचिकेत लक्ष वेधण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने १२ मे रोजी निवडणूक आयोगाचे उत्तर मागितले होते. 
संपूर्ण मतदारसंघातील मतमोजणीचा निकाल एकाचवेळी जाहीर केला जावा. त्यामुळे त्या मतदारसंघाला निधी पुरवठा करताना भेदभाव केला जाणार नाही आणि विकासातही संतुलन राखले जाईल. राजकीय सूड किंवा द्वेषभावनेने पक्षपात केला जाणार नाही, असा युक्तिवाद पंजाबचे वकील योगेश गुप्ता यांनी केला होता.
अजित पवारांच्या धमकीचा उल्लेख..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा काँग्रेसला मतदान न केल्यास पाणीपुरवठा बंद करण्याची धमकी दिली होती, असा उल्लेख करीत वकील गुप्ता यांनी मतदान केंद्रनिहाय निकाल जाहीर झाल्याने धमकी आणि ब्लॅकमेल करण्याचे तंत्र अवलंबले जाऊ शकते, अशी साधार भीती व्यक्त केली होती. 
सध्याच्या निवडणूक निकालात एखाद्या पक्षाला कोणत्या वॉर्डात जास्त किंवा कुठे कमी मतदान झाले ते कळू शकते. 
एखाद्या पक्षाच्या किंवा विजयी उमेदवाराच्या बाजूने मतदान न करणार्‍या लोकांवर राजकीय सूड उगविण्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करण्यासारखे प्रकार घडू शकतात,असेही याचिकाकर्त्याने म्हटले.