शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रनिहाय मतमोजणी रद्द करण्याबाबत निर्णय का नाही?

By admin | Updated: September 9, 2014 05:26 IST

निवडणूक आयोगाच्या मतदान केंद्रनिहाय मतमोजणी रद्द करण्याच्या निर्णयावर चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा, असा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या मतदान केंद्रनिहाय मतमोजणी रद्द करण्याच्या निर्णयावर चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा, असा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

निवडणुकीसंबंधी सध्याच्या नियमांमध्ये कोणतीही दुरुस्ती न करता हा बदल करता येऊ शकतो काय याबाबत न्यायालयाने निवडणूक आयोगाकडूनही उत्तर मागितले आहे. निवडणुकीनंतर मतदान केंद्रनिहाय मतमोजणी जाहीर केल्यामुळे विजयी उमेदवाराच्या मनात कमी मतदान झालेल्या ठिकाणच्या लोकांबाबत आकस आणि सूडाची भावना निर्माण होऊ शकते, असे सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने स्पष्ट केले. पाच वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला पत्र पाठवून प्रस्ताव दिल्यानंतर सरकारने हा मुद्दा विधी आयोगाकडे का सोपविला नाही आणि गेल्या पाच वर्षांमध्ये कोणताही निर्णय का घेतला नाही, असा प्रश्नही खंडपीठाने विचारला.
विधी आयोगावर जबाबदारी ढकलू नका..
विधी आयोगाला या मुद्याशी काही देणेघेणे नाही. तुमचे उत्तर काय ते आम्हाला कळायला हवे. विधी आयोगाच्या खांद्यावर जबाबदारी सोडून तुम्ही हा मुद्दा टांगणीवर ठेवू शकत नाही, असे खंडपीठाने खडसावले. या खंडपीठात कुरियन जोसेफ आणि आर.एफ. नरीमन यांचा समावेश आहे. 
गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन
मतदानकेंद्रनिहाय मतमोजणी जाहीर केल्यामुळे मतदानाशी निगडित गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याकडे एका याचिकेत लक्ष वेधण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने १२ मे रोजी निवडणूक आयोगाचे उत्तर मागितले होते. 
संपूर्ण मतदारसंघातील मतमोजणीचा निकाल एकाचवेळी जाहीर केला जावा. त्यामुळे त्या मतदारसंघाला निधी पुरवठा करताना भेदभाव केला जाणार नाही आणि विकासातही संतुलन राखले जाईल. राजकीय सूड किंवा द्वेषभावनेने पक्षपात केला जाणार नाही, असा युक्तिवाद पंजाबचे वकील योगेश गुप्ता यांनी केला होता.
अजित पवारांच्या धमकीचा उल्लेख..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा काँग्रेसला मतदान न केल्यास पाणीपुरवठा बंद करण्याची धमकी दिली होती, असा उल्लेख करीत वकील गुप्ता यांनी मतदान केंद्रनिहाय निकाल जाहीर झाल्याने धमकी आणि ब्लॅकमेल करण्याचे तंत्र अवलंबले जाऊ शकते, अशी साधार भीती व्यक्त केली होती. 
सध्याच्या निवडणूक निकालात एखाद्या पक्षाला कोणत्या वॉर्डात जास्त किंवा कुठे कमी मतदान झाले ते कळू शकते. 
एखाद्या पक्षाच्या किंवा विजयी उमेदवाराच्या बाजूने मतदान न करणार्‍या लोकांवर राजकीय सूड उगविण्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करण्यासारखे प्रकार घडू शकतात,असेही याचिकाकर्त्याने म्हटले.