शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

२०२१ ची जातनिहाय जनगणना का नाही?, लवकर सुरू करा; कन्हैय्या कुमारचा मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 19:28 IST

भाजप सरकार पशू, पक्षी, महिला, पुरुष यांची संख्या मोजत आहे. मग, देशातील जाती मोजायला काय अडचण आहे.

नवी दिल्ली - बिहारमध्ये जातनिहाय जनगणना सुरू करण्यात आली असून देशपातळीवर हे प्रकरण अतिशय शांत आहे. त्यामुळे, देशात जातनिहाय जनगणना सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जातनिहाय जनगणना सुरू करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. आता, काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनीही जातनिहाय जनगणना अद्याप का सुरू केली नाही, असा सवाल मोदी सरकारला केला आहे. वास्तविक २०२१ मध्येच जनगणना व्हायला हवी होती, असेही कन्हैय्या कुमार यांनी म्हटलं. 

भाजप सरकार पशू, पक्षी, महिला, पुरुष यांची संख्या मोजत आहे. मग, देशातील जाती मोजायला काय अडचण आहे. देशात दर १० वर्षांनी जनगणना होत असते, त्याचा अहवालही सरकारने सादर करायला हवा, असेही कन्हैय्या कुमार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. तसेच, राहुल गांधींनी चोरांना चोर म्हटलं तर, यांनी तो ओबीसीचा अपमान असल्याचे सांगितले. जातीच्या नावाने मतं मिळवतील, जातीच्या नावाने विरोधी पक्षाला लक्ष्य बनवतील. पण, जातनिहाय जनगणना घेणार नाहीत, असे म्हणत कन्हैय्या कुमारने मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 

सरकार ना २० हजार कोटी रुपयांच्या प्रश्नावर उत्तर देते, ना देशातील वास्तविक लोकसंख्या सांगत आहे. कारण, पंतप्रधान कधी भाषणात देशाची लोकसंख्या १४० कोटी म्हणतात, तर कधी १३५ कोटी म्हणतात. त्यामुळेच, देशातील एकूण लोकसंख्या किती, किती वाढली आणि सध्या जातनिहाय सर्वच वर्गांची परिस्थिती कशी आहे, याची माहिती उपलब्ध व्हायला हवीच. देशात दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांची संख्या किती आहे, हेही देशातील लोकांना समजायला हवं, असे म्हणत कन्हैय्या कुमार यांनी जातनिहाय जनगणना घेण्याची मागणी केलीय.  

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीNarendra Modiनरेंद्र मोदीkanhaiya kumarकन्हैय्या कुमारcongressकाँग्रेस