शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

दंगलीसाठी ईशान्य दिल्लीच का?, अरुंद रस्ते व निमुळत्या गल्ल्या सोयीच्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 06:48 IST

उत्तर-पूर्व दिल्लीतील दंगल शमली तरी यातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. दंगलीसाठी या भागाची का निवड करण्यात आली?

सुरेश भुसारी नवी दिल्ली : उत्तर-पूर्व दिल्लीतील दंगल शमली तरी यातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. दंगलीसाठी या भागाची का निवड करण्यात आली? या भागातील लोकसंख्या व सामाजिक स्थितीचे पदरही या दंगलीने समोर आले आहेत. दिल्लील उत्तर-पूर्व दिल्ली जिल्हा हा देशातील सर्वात दाट लोकवस्तीच्या भागापैकी एक आहे. अरुंद रस्ते, निमुळत्या गल्ल्या हे या भागाचे वैशिष्ट्य आहे. या निमुळत्या गल्ल्यांमुळे दंगेखोर नेमके कुठे लपले आहे. याचा सुगावा लोकांना येत नव्हता. एखाद्या गल्लीत दबा धरून बसलेले दंगेखोर लोक रस्त्यावर आल्यानंतरच थेट हल्ला करीत होते.उत्तर-पूर्व दिल्ली जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४० हजारावर आहे. या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता ३६,१५५ प्रती चौरस मीटर एवढी आहे. दिल्लीच्या इतर जिल्ह्याचा विचार केल्यास मध्य दिल्लीची लोकसंख्येची घनता २७,७३० प्रती चौरसमीटर एवढी आहे. नवी दिल्ली जिल्ह्याची लोकसंख्येची प्रती चौरस मीटर घनता केवळ ५११७ आहे. म्हणजे नवी दिल्ली जिल्ह्याच्या सातपटीने उत्तर-पूर्व जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता आहे. यावरून उत्तर पूर्व दिल्ली जिल्हा किती दाट लोकवस्तीचा आहे, हे स्पष्ट होते. दाट लोकवस्ती ही दंगल करणाऱ्यासाठी सोईची असते. कमी क्षेत्रामध्ये अधिक लोकांवर हल्ला करण्याची संधी या लोकसंख्येच्या घनतेमुळे मिळत असल्याने दंगलखोरांनी नियोजनपूर्वक या भागाची निवड केल्याचे स्पष्ट झाले आहे.>परावलंबी व्यक्तींचे प्रमाण अधिकया भागाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या जिल्ह्यात एकाच व्यक्तीवर अवलंबून असणाºया व्यक्तींची संख्या अधिक आहे. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार या भागातील ७०.५ टक्के लोकसंख्या कमाविणारी नाही म्हणजे कुटुंबातील एका व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. या भागातील केवळ ३० टक्के व्यक्तींकडे उत्पन्नाचे साधन असून इतर यांच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. या दंगलीत उत्पन्न करणाºया व्यक्तींना लक्ष्य करण्यात आले होते. या दंगलीनंतर या भागातील भीषण स्थितीला आता सामोरे जावे लागत आहे.>६ वर्षांखालील मुले जास्त : या जिल्ह्यात ६ वर्षांखालील मुलांची संख्या ही तब्बल ३ लाखांवर आहे. ही संख्या या जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या १३.४७ टक्के एवढी आहे. तसेच या भागाची निरक्षरताही सर्वाधिक आहे. या जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण ८२ टक्के एवढे आहे; परंतु महिला साक्षरतेचे प्रमाण हे केवळ ७६.५१ टक्के एवढेच आहे. हे प्रमाण नवी दिल्लीतल इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी आहे.>ग्राहक कुठे आहे?या संदर्भात बोलताना या भागातील ज्येष्ठ नागरिक म्हणाला, या दंगलीने या भागातील आर्थिक व्यवस्थाच कोलमडली आहे. आता दुकाने सुरू दिसत असले तरी ग्राहक कुठे आहे? असा त्यांचा सवाल होता. शनिवारला दुपारी या भागातील ९० टक्के दुकाने सुरू होती. परंतु ग्राहक मात्र नव्हते. शनिवारला दुपारी मौजपूर येथील ब्रह्मपुरी मार्ग निर्मनुष्य होता. या भागाची सामाजिक व आर्थिक स्थितीमुळे या भागाचे वास्तव अधिक भीषण झाल्याचे दिसून येत आहे.