शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

दंगलीसाठी ईशान्य दिल्लीच का?, अरुंद रस्ते व निमुळत्या गल्ल्या सोयीच्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 06:48 IST

उत्तर-पूर्व दिल्लीतील दंगल शमली तरी यातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. दंगलीसाठी या भागाची का निवड करण्यात आली?

सुरेश भुसारी नवी दिल्ली : उत्तर-पूर्व दिल्लीतील दंगल शमली तरी यातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. दंगलीसाठी या भागाची का निवड करण्यात आली? या भागातील लोकसंख्या व सामाजिक स्थितीचे पदरही या दंगलीने समोर आले आहेत. दिल्लील उत्तर-पूर्व दिल्ली जिल्हा हा देशातील सर्वात दाट लोकवस्तीच्या भागापैकी एक आहे. अरुंद रस्ते, निमुळत्या गल्ल्या हे या भागाचे वैशिष्ट्य आहे. या निमुळत्या गल्ल्यांमुळे दंगेखोर नेमके कुठे लपले आहे. याचा सुगावा लोकांना येत नव्हता. एखाद्या गल्लीत दबा धरून बसलेले दंगेखोर लोक रस्त्यावर आल्यानंतरच थेट हल्ला करीत होते.उत्तर-पूर्व दिल्ली जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४० हजारावर आहे. या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता ३६,१५५ प्रती चौरस मीटर एवढी आहे. दिल्लीच्या इतर जिल्ह्याचा विचार केल्यास मध्य दिल्लीची लोकसंख्येची घनता २७,७३० प्रती चौरसमीटर एवढी आहे. नवी दिल्ली जिल्ह्याची लोकसंख्येची प्रती चौरस मीटर घनता केवळ ५११७ आहे. म्हणजे नवी दिल्ली जिल्ह्याच्या सातपटीने उत्तर-पूर्व जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता आहे. यावरून उत्तर पूर्व दिल्ली जिल्हा किती दाट लोकवस्तीचा आहे, हे स्पष्ट होते. दाट लोकवस्ती ही दंगल करणाऱ्यासाठी सोईची असते. कमी क्षेत्रामध्ये अधिक लोकांवर हल्ला करण्याची संधी या लोकसंख्येच्या घनतेमुळे मिळत असल्याने दंगलखोरांनी नियोजनपूर्वक या भागाची निवड केल्याचे स्पष्ट झाले आहे.>परावलंबी व्यक्तींचे प्रमाण अधिकया भागाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या जिल्ह्यात एकाच व्यक्तीवर अवलंबून असणाºया व्यक्तींची संख्या अधिक आहे. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार या भागातील ७०.५ टक्के लोकसंख्या कमाविणारी नाही म्हणजे कुटुंबातील एका व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. या भागातील केवळ ३० टक्के व्यक्तींकडे उत्पन्नाचे साधन असून इतर यांच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. या दंगलीत उत्पन्न करणाºया व्यक्तींना लक्ष्य करण्यात आले होते. या दंगलीनंतर या भागातील भीषण स्थितीला आता सामोरे जावे लागत आहे.>६ वर्षांखालील मुले जास्त : या जिल्ह्यात ६ वर्षांखालील मुलांची संख्या ही तब्बल ३ लाखांवर आहे. ही संख्या या जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या १३.४७ टक्के एवढी आहे. तसेच या भागाची निरक्षरताही सर्वाधिक आहे. या जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण ८२ टक्के एवढे आहे; परंतु महिला साक्षरतेचे प्रमाण हे केवळ ७६.५१ टक्के एवढेच आहे. हे प्रमाण नवी दिल्लीतल इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी आहे.>ग्राहक कुठे आहे?या संदर्भात बोलताना या भागातील ज्येष्ठ नागरिक म्हणाला, या दंगलीने या भागातील आर्थिक व्यवस्थाच कोलमडली आहे. आता दुकाने सुरू दिसत असले तरी ग्राहक कुठे आहे? असा त्यांचा सवाल होता. शनिवारला दुपारी या भागातील ९० टक्के दुकाने सुरू होती. परंतु ग्राहक मात्र नव्हते. शनिवारला दुपारी मौजपूर येथील ब्रह्मपुरी मार्ग निर्मनुष्य होता. या भागाची सामाजिक व आर्थिक स्थितीमुळे या भागाचे वास्तव अधिक भीषण झाल्याचे दिसून येत आहे.