शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

हाच का बलिदानाचा सन्मान?; शहीद जवानाच्या संतप्त माता-पित्याने परत केलं शौर्य पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 22:22 IST

आमच्या मुलाने देशासाठी बलिदान दिलं, पण सरकारने त्या बलिदानाची अशी किंमत केली

नवी दिल्ली - गुजरातच्या अहमदाबाद येथील रहिवाशी असलेल्या लान्स नायक गोपालसिंह भदोरिया यांच्या आई-वडिलांनी शौर्य चक्र सरकारला परत पाठवले आहे. कुरिअरने हे शौर्य चक्र भदोरिया कुटुंबीयांसाठी आले होते. शौर्य चक्र कुरिअरने पाठवणे हा आमच्या शहीद मुलाच्या बलिदानाचा हा अपमान असल्याचे सांगत ते परत पाठविले. आता, राष्ट्रपती भवन येथे जाऊन सर्वांसमक्ष हे शौर्यचक्र प्रदान करण्यात यावे, अशी मागणी भदोरिया कुटुंबीयांकडून होत आहे. 

आमच्या मुलाने देशासाठी बलिदान दिलं, पण सरकारने त्या बलिदानाची अशी किंमत केली. शौर्य पदक हे गुप्त ठेवण्याची वस्तू नाही, जे सरकारकडून असं गुपचूप देण्यात येत आहे. माझ्या मुलाने देशासाठी बलिदान दिलं आहे, त्यामुळे देशासमोर त्याचा सन्मान झाला पाहिजे, असे शहीद गोपालसिंह यांच्या आई-वडिलांनी म्हटले. 

गोपालसिंह यांना मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशिष्ट सेवा पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, २००१७ मध्ये जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गोपालसिंह यांना वीरमरण प्राप्त झाले होते. 

गोपालसिंह यांचे २००७ साली लग्न झाले होते, मात्र काही मतभेदामुळे ते २०११ पासून आपल्या पत्नीपासून विभक्त राहात होते. दोघेही व्यस्त असल्याने न्यायालयाने २०१३ मध्ये त्यांची विभक्त होण्याची याचिका रद्द केली. दरम्यान, २०१७ मध्ये गोपालसिंह हे शहीद झाले. त्यानंतर, पत्नी आणि आई-वडिल यांच्यातील वादामुळे लाभ देण्यास विलंब झाला. सन २०२१मध्ये न्यायालयाने आई-वडिलांना पुरस्कारासंबंधित सर्व लाभ देऊ केले. तर, सैन्य दल आणि सरकारकडून मिळणारे इतर सर्व लाभ हे पत्नी आणि आई-वडिलांमध्ये ५० टक्के विभागून द्यावेत, असेही न्यायलायाने निकालात म्हटले होते.  

टॅग्स :MumbaiमुंबईIndian Armyभारतीय जवानGujaratगुजरातGovernmentसरकार