शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

हाच का बलिदानाचा सन्मान?; शहीद जवानाच्या संतप्त माता-पित्याने परत केलं शौर्य पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 22:22 IST

आमच्या मुलाने देशासाठी बलिदान दिलं, पण सरकारने त्या बलिदानाची अशी किंमत केली

नवी दिल्ली - गुजरातच्या अहमदाबाद येथील रहिवाशी असलेल्या लान्स नायक गोपालसिंह भदोरिया यांच्या आई-वडिलांनी शौर्य चक्र सरकारला परत पाठवले आहे. कुरिअरने हे शौर्य चक्र भदोरिया कुटुंबीयांसाठी आले होते. शौर्य चक्र कुरिअरने पाठवणे हा आमच्या शहीद मुलाच्या बलिदानाचा हा अपमान असल्याचे सांगत ते परत पाठविले. आता, राष्ट्रपती भवन येथे जाऊन सर्वांसमक्ष हे शौर्यचक्र प्रदान करण्यात यावे, अशी मागणी भदोरिया कुटुंबीयांकडून होत आहे. 

आमच्या मुलाने देशासाठी बलिदान दिलं, पण सरकारने त्या बलिदानाची अशी किंमत केली. शौर्य पदक हे गुप्त ठेवण्याची वस्तू नाही, जे सरकारकडून असं गुपचूप देण्यात येत आहे. माझ्या मुलाने देशासाठी बलिदान दिलं आहे, त्यामुळे देशासमोर त्याचा सन्मान झाला पाहिजे, असे शहीद गोपालसिंह यांच्या आई-वडिलांनी म्हटले. 

गोपालसिंह यांना मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशिष्ट सेवा पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, २००१७ मध्ये जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गोपालसिंह यांना वीरमरण प्राप्त झाले होते. 

गोपालसिंह यांचे २००७ साली लग्न झाले होते, मात्र काही मतभेदामुळे ते २०११ पासून आपल्या पत्नीपासून विभक्त राहात होते. दोघेही व्यस्त असल्याने न्यायालयाने २०१३ मध्ये त्यांची विभक्त होण्याची याचिका रद्द केली. दरम्यान, २०१७ मध्ये गोपालसिंह हे शहीद झाले. त्यानंतर, पत्नी आणि आई-वडिल यांच्यातील वादामुळे लाभ देण्यास विलंब झाला. सन २०२१मध्ये न्यायालयाने आई-वडिलांना पुरस्कारासंबंधित सर्व लाभ देऊ केले. तर, सैन्य दल आणि सरकारकडून मिळणारे इतर सर्व लाभ हे पत्नी आणि आई-वडिलांमध्ये ५० टक्के विभागून द्यावेत, असेही न्यायलायाने निकालात म्हटले होते.  

टॅग्स :MumbaiमुंबईIndian Armyभारतीय जवानGujaratगुजरातGovernmentसरकार