शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

अन्वयार्थ: पैशासाठी लोक पुन्हा-पुन्हा त्याच खड्ड्यांत का पडतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 09:34 IST

कमीत कमी वेळात जास्तीत जास्त परतावा देण्याच्या आमिषाला बळी पडून 'पॉन्झी' योजनांमध्ये लोक पैसे का गुंतवतात? शहाणे कसे होत नाहीत?

अमित बिवलकर, वित्तीय बाजारांचे विश्लेषक, गुंतवणूक सल्लागार |

कमीत कमी काळात भरघोस आर्थिक परताव्यांचे आमिष देऊन गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या योजना (पॉन्झी) 'लाभ' आणि 'लोभ' यातील पुसट रेषा सहज ओलांडून जाणाऱ्या मानसिकतेचे अपत्य आहे. सध्या मुंबईतील 'टोरेस'मागोमाग छ. संभाजीनगरमध्ये असा एक नवा घोटाळा उघडकीला आला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमावली, शिक्षण आणि जनजागृती यांचा समन्वय आवश्यक आहे. अशा फसवणुकीचे अनेक प्रकार सातत्याने उघड होत असूनही लोक पुन्हा-पुन्हा त्याच खड्यात का पडतात? जास्त परताव्याच्या मागे का धावतात? याचे कारण मानसशास्त्र, सामाजिक आणि आर्थिक घटकांमध्ये आहे.

नक्की काय घडते?लोभ आणि अतिआत्मविश्वास या मानसिकतेच्या बळावर अशा योजनांचे सापळे उभे राहतात. जास्त परताव्याचे वचन लोभ जागा करतेआणि यामुळे विवेकबुद्धी कमी होते. अनेक लोक 'लवकर गुंतवणूक करून लवकर बाहेर पडू,' असे समजतात आणि स्वतःला या फसवणुकीपासून वाचवू शकतो, असा भ्रम तयार करतात. यशस्वी गुंतवणूकदारांच्या (अनेकदा खोट्या) गोष्टी ऐकून लोक घाईगडबडीत गुंतवणूक करतात, कारण त्यांना वाटते की, त्यांनी चांगली संधी गमावली तर? लोक जास्त परताव्यावर लक्ष केंद्रित करतात आणि जोखमीकडे दुर्लक्ष करतात. जास्त परताव्याबाबत कोणतीही हमी शक्य नाही, हे त्यांना उमजत नाही.

अनेकदा स्थानिक विक्रेत्यांवरचा विश्वास महत्त्वाचा ठरतो. अशा योजना प्रभावशाली स्थानिक व्यक्ती किंवा परिचितांच्या माध्यमातून प्रचारित केल्या जातात. त्यामुळे खोटा विश्वास निर्माण होतो. आजूबाजूचे, ओळखीचे, परिचयातले इतर लोक गुंतवणूक करताना दिसले, तर 'आपणही गुंतवू पैसे' असे वाटण्याची शक्यता जास्त असते. जे गुंतवणूकदार सुरुवातीला पैसे मिळवतात (प्लॅनच्या सुरुवातीच्या टप्प्यात), ते इतरांना प्रोत्साहन देतात, ज्यामुळे योजना वेगाने पसरते. कठीण आर्थिक परिस्थितीत, लोक आर्थिक सुरक्षा मिळवण्यासाठी लवकर श्रीमंत होण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कमी बैंक व्याजदर आणि अस्थिर बाजारामुळे 'परताव्यांची खात्री' देणाऱ्या 'पॉन्झी' योजना हा अनेकांना अधिक सोपा आणि फायदेशीर पर्याय वाटतो. लोकांना जलद परताव्याची लालसा अधिक असते. पारंपरिक बचत किंवा गुंतवणूक कमी परतावा देत असल्याने लोक अशा योजनांकडे वळतात.

फसवणूक सहज शक्य का होते?गुंतागुंतीच्या आणि बोजड तांत्रिक आर्थिक शब्दांचा वापर करून योजनांमध्ये अंतर्भूत असलेली फसवणूक अनेकदा बेमालूमपणे लपवली जाते. अशा योजना 'फक्त निवडकांसाठी' असल्याचा आभास निर्माण करून गुंतवणूकदारांना विशेष वाटण्यास भाग पाडतात. खोट्या गुंतवणूकदारांच्या कथा प्रचारित करून लोकांचा आत्मविश्वास वाढवला जातो. सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना नवीन सदस्यांकडूनमिळालेल्या निधीने परतावा दिला जातो, ज्यामुळे योजना विश्वासार्ह वाटते.

सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना दिले जाणारे परतावे हे नवीन गुंतवणूकदारांच्या पैशांवर अवलंबून असतात. त्यामुळे या योजनेसाठी सतत नवीन गुंतवणूकदारांची गरज असते, जी दीर्घकाळ टिकवता येत नाही. शेवटी, योजना अशा टप्प्यावर पोहोचते जिथे ती पूर्वीच्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी पुरेसा नवीन पैसा मिळवू शकत नाही. जेव्हा पुरेसा निधी येणे थांबते, तेव्हा योजना कोसळते आणि उशिरा गुंतवणूक केलेल्या लोकांना नुकसान सहन करावे लागते. सर्वसामान्यपणे, अशा योजना चालवणारी व्यक्ती किंवा संस्था शिल्लक रक्कम घेऊन पळून जाते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही.

हा चक्रव्यूह भेदण्यासाठी उपायसरकार, नियामक संस्था आणि आर्थिक सल्लागारांनी गुंतवणूक, जोखीम व्यवस्थापन, आणि फसवणूक ओळखण्यावर जनतेला शिक्षित करणे गरजेचे आहे. फसवणूक योजनांविरोधात त्वरित आणि कठोर कारवाई केली गेली पाहिजे. म्युच्युअल फंड, 'पीपीएफ' यांसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांना प्रोत्साहन असले पाहिजे. 'जर ते खूपच चांगले वाटत असेल तर ते खरे नसण्याची शक्यता जास्त आहे' हे सार्वकालिक सत्य होय!

टॅग्स :businessव्यवसाय