शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

अन्वयार्थ: पैशासाठी लोक पुन्हा-पुन्हा त्याच खड्ड्यांत का पडतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 09:34 IST

कमीत कमी वेळात जास्तीत जास्त परतावा देण्याच्या आमिषाला बळी पडून 'पॉन्झी' योजनांमध्ये लोक पैसे का गुंतवतात? शहाणे कसे होत नाहीत?

अमित बिवलकर, वित्तीय बाजारांचे विश्लेषक, गुंतवणूक सल्लागार |

कमीत कमी काळात भरघोस आर्थिक परताव्यांचे आमिष देऊन गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या योजना (पॉन्झी) 'लाभ' आणि 'लोभ' यातील पुसट रेषा सहज ओलांडून जाणाऱ्या मानसिकतेचे अपत्य आहे. सध्या मुंबईतील 'टोरेस'मागोमाग छ. संभाजीनगरमध्ये असा एक नवा घोटाळा उघडकीला आला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमावली, शिक्षण आणि जनजागृती यांचा समन्वय आवश्यक आहे. अशा फसवणुकीचे अनेक प्रकार सातत्याने उघड होत असूनही लोक पुन्हा-पुन्हा त्याच खड्यात का पडतात? जास्त परताव्याच्या मागे का धावतात? याचे कारण मानसशास्त्र, सामाजिक आणि आर्थिक घटकांमध्ये आहे.

नक्की काय घडते?लोभ आणि अतिआत्मविश्वास या मानसिकतेच्या बळावर अशा योजनांचे सापळे उभे राहतात. जास्त परताव्याचे वचन लोभ जागा करतेआणि यामुळे विवेकबुद्धी कमी होते. अनेक लोक 'लवकर गुंतवणूक करून लवकर बाहेर पडू,' असे समजतात आणि स्वतःला या फसवणुकीपासून वाचवू शकतो, असा भ्रम तयार करतात. यशस्वी गुंतवणूकदारांच्या (अनेकदा खोट्या) गोष्टी ऐकून लोक घाईगडबडीत गुंतवणूक करतात, कारण त्यांना वाटते की, त्यांनी चांगली संधी गमावली तर? लोक जास्त परताव्यावर लक्ष केंद्रित करतात आणि जोखमीकडे दुर्लक्ष करतात. जास्त परताव्याबाबत कोणतीही हमी शक्य नाही, हे त्यांना उमजत नाही.

अनेकदा स्थानिक विक्रेत्यांवरचा विश्वास महत्त्वाचा ठरतो. अशा योजना प्रभावशाली स्थानिक व्यक्ती किंवा परिचितांच्या माध्यमातून प्रचारित केल्या जातात. त्यामुळे खोटा विश्वास निर्माण होतो. आजूबाजूचे, ओळखीचे, परिचयातले इतर लोक गुंतवणूक करताना दिसले, तर 'आपणही गुंतवू पैसे' असे वाटण्याची शक्यता जास्त असते. जे गुंतवणूकदार सुरुवातीला पैसे मिळवतात (प्लॅनच्या सुरुवातीच्या टप्प्यात), ते इतरांना प्रोत्साहन देतात, ज्यामुळे योजना वेगाने पसरते. कठीण आर्थिक परिस्थितीत, लोक आर्थिक सुरक्षा मिळवण्यासाठी लवकर श्रीमंत होण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कमी बैंक व्याजदर आणि अस्थिर बाजारामुळे 'परताव्यांची खात्री' देणाऱ्या 'पॉन्झी' योजना हा अनेकांना अधिक सोपा आणि फायदेशीर पर्याय वाटतो. लोकांना जलद परताव्याची लालसा अधिक असते. पारंपरिक बचत किंवा गुंतवणूक कमी परतावा देत असल्याने लोक अशा योजनांकडे वळतात.

फसवणूक सहज शक्य का होते?गुंतागुंतीच्या आणि बोजड तांत्रिक आर्थिक शब्दांचा वापर करून योजनांमध्ये अंतर्भूत असलेली फसवणूक अनेकदा बेमालूमपणे लपवली जाते. अशा योजना 'फक्त निवडकांसाठी' असल्याचा आभास निर्माण करून गुंतवणूकदारांना विशेष वाटण्यास भाग पाडतात. खोट्या गुंतवणूकदारांच्या कथा प्रचारित करून लोकांचा आत्मविश्वास वाढवला जातो. सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना नवीन सदस्यांकडूनमिळालेल्या निधीने परतावा दिला जातो, ज्यामुळे योजना विश्वासार्ह वाटते.

सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना दिले जाणारे परतावे हे नवीन गुंतवणूकदारांच्या पैशांवर अवलंबून असतात. त्यामुळे या योजनेसाठी सतत नवीन गुंतवणूकदारांची गरज असते, जी दीर्घकाळ टिकवता येत नाही. शेवटी, योजना अशा टप्प्यावर पोहोचते जिथे ती पूर्वीच्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी पुरेसा नवीन पैसा मिळवू शकत नाही. जेव्हा पुरेसा निधी येणे थांबते, तेव्हा योजना कोसळते आणि उशिरा गुंतवणूक केलेल्या लोकांना नुकसान सहन करावे लागते. सर्वसामान्यपणे, अशा योजना चालवणारी व्यक्ती किंवा संस्था शिल्लक रक्कम घेऊन पळून जाते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही.

हा चक्रव्यूह भेदण्यासाठी उपायसरकार, नियामक संस्था आणि आर्थिक सल्लागारांनी गुंतवणूक, जोखीम व्यवस्थापन, आणि फसवणूक ओळखण्यावर जनतेला शिक्षित करणे गरजेचे आहे. फसवणूक योजनांविरोधात त्वरित आणि कठोर कारवाई केली गेली पाहिजे. म्युच्युअल फंड, 'पीपीएफ' यांसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांना प्रोत्साहन असले पाहिजे. 'जर ते खूपच चांगले वाटत असेल तर ते खरे नसण्याची शक्यता जास्त आहे' हे सार्वकालिक सत्य होय!

टॅग्स :businessव्यवसाय