शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

खासगी विद्यार्थ्यांनाही ‘नीट’ परीक्षेला का बसू देत नाही? मद्रास हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 04:54 IST

कोणत्याही शाळा-कॉलेजात न जाता घरी बसून अभ्यास करणाऱ्या ‘खासगी’ विद्यार्थ्यांनाही ‘नीट’ परीक्षेला बसू देण्याचा विचार संबंधितांनी करावा, अशी सूचना मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी केली.

मदुरै - कोणत्याही शाळा-कॉलेजात न जाता घरी बसून अभ्यास करणाऱ्या ‘खासगी’ विद्यार्थ्यांनाही ‘नीट’ परीक्षेला बसू देण्याचा विचार संबंधितांनी करावा, अशी सूचना मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी केली.यंदाच्या ‘नीट’ परीक्षेत तामिळ भाषेतील पेपरमध्ये झालेल्या गोंधळासंबंधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभा सदस्य टी. के. रंगराजन यांनी केलेल्या जनहित याचिकेवर निकाल देताना न्या. सी. टी. सेल्वम व न्या. ए. एम.बशीर यांच्या खंडपीठाने हीसूचना केली. आपली राज्यघटना सर्वांना सामावून घेण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.त्यामुळे घरून अभ्यास करून उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेपासून वंचित ठेवणे योग्य होणार नाही, असे खंडपीठाने म्हटले.न्यायालयाने म्हटले, त्यांचीही स्वप्ने साकार होतीलकी, देशात हजारो गोरगरीब विद्यार्थी शाळेत जाणे परवडत नाही, म्हणून एकीकडे उपजीविकेसाठी मोलमजुरी करत घरी अभ्यास करत असतात. पण प्रात्यक्षिकांची सोय नाही म्हणून त्यांना विज्ञान शाखेस जाता येत नाही.सरकारने व शिक्षणसंस्थांनी अशा बाहेरून परीक्षा देऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिकांची सोय उपलब्ध करून दिली, तर तेही ‘नीट’सारख्या परीक्षांची तयारी करून आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहू शकतील. (वृत्तसंस्था)विद्यार्थ्यांना जादा गुण द्याया परीक्षेत तामिळ भाषेतील प्रश्नपत्रिकेत ४९ प्रश्नांंचे मूळ इंग्रजीवरून चुकीचे भाषांतर केले गेले होते. ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडविले असतील, त्यांना प्रत्येक प्रश्नासाठी चार वाढीव गुण द्यावे व त्यानुसार गुणवत्ता यादीची फेररचना करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले. हे करेपर्यंत मूळ गुणवत्ता यादीनुसार ‘कॉन्सेलिंग’ करू नये, असेही न्यायालयाने सांगितले.हे प्रश्न बरोबर होते. तामिळ शिकविणाºया शिक्षकाने जसे केले असते तसेच त्याचे भाषांतर केले गेले होते, असे ‘सीबीएसई’चे म्हणणे होते. परंतु न्यायालयाने म्हटले की, आरामखुर्चीत बसून हे म्हणणे सोपे आहे. पण, या चुकांमुळे ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांचा जो गोंधळ झाला, तो विचारात घ्यायला हवा.गांभीर्याने विचार कराएखाद्या परीक्षेत मिळालेले गुण हे सर्व काही नसते. शेवटी ज्ञान मिळविणे महत्त्वाचे असते, यावर भर देऊन, संबंधित अधिकारी याचा गांभीर्याने विचार करतील, अशी आशाही खंडपीठाने व्यक्त केली.

टॅग्स :Courtन्यायालयexamपरीक्षा