शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

रस्ते, बंदर, विमानतळ सारं अदानींनाच का दिलं?; राहुल गांधींचा भर सभागृहात मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:00 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्ली-

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उद्योगपती गौतम अदानींच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला. देशातील रस्ते, बंदर, विमानतळं सारंकाही अदानींनाच का बरं दिलं गेलं? असा थेट सवाल यावेळी राहुल गांधी यांनी सरकारला विचारला आहे. तसंच राष्ट्रपतींच्या अभिभाषणात अनेक योजनांचा उल्लेख केला गेला. पण अग्नीवीर योजनेबाबत फक्त एकदाच छोटासा उल्लेख केला गेला. त्यातही बेरोजगारी आणि महागाईचा उल्लेखही नव्हता. जनतेचं म्हणणं राष्ट्रपतींच्या अभिभाषणात अजिबात नव्हतं, असंही राहुल गांधी म्हणाले. 

गौतम अदानी आणि नरेंद्र मोदींचं काय नातं? संसदेत फोटो दाखवत राहुल गांधींचा सवाल...

"मी जिथं जिथं जातोय तिथं नुसतं अदानींचं नाव ऐकायला मिळतंय. केरळ असो तामीळनाडू असो किंवा संपूर्ण देश असो सर्व ठिकाणी अदानी...अदानी..अदानींचंच नाव दिसतंय. लोक मला भेटतात तेव्हा अदानींबाबत दोन-तीन प्रश्न विचारतात. ते कोणत्याही व्यवसायात सहजपणे शिरतात आणि यश प्राप्त करतात हे त्यांना कसं काय जमतंय? देशातील तरुणही मला हेच विचारतात आणि त्यांनाही जाणून घ्यायचं आहे की अदानींच्या यशाचं गुपीत नेमकं काय आहे?", असा टोला राहुल गांधी यांनी सरकारला लगावला. 

"अदानी ८ ते १० व्यवसायांमध्ये काम करतात. सिमेंट, पोर्ट, एनर्जी आणि इतर बरंच काही. मग लोक विचारायचे की २०१४ ते २०२२ पर्यंत अदानींच्या संपत्तीत इतकी मोठी वाढ कशी काय झाली? ते ८ अब्ज वरून १०८ अब्जांपर्यंत कसे काय पोहोचले? २०१४ मध्ये ते श्रीमंतांच्या यादीत ६०९ व्या क्रमांकावर होते. आज अदानी देशातील प्रमुख क्षेत्रांमध्ये आहेत. पंतप्रधान मोदींचं अदानींसोबतचं नातं नेमकं काय?", असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. 

'व्हायब्रंट गुजरात'पासून सुरू झाला अदानींचा खेळ"उद्योजकांना सोबत घेतल्यास गुजरातला व्हायब्रंट बनवता येईल आणि राज्य पुढे जाईल असा विचार मोदींनी केला. तेव्हापासूनच हा खेळ सुरू झाला. मोदी २०१४ मध्ये दिल्लीत आले. २०१६ मध्ये अदानी श्रीमंतांच्या यादीत ६०९ व्या क्रमांकावर होते आणि काही वर्षांत ते थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. काही वर्षांपूर्वी भारताच्या विमानतळाचा विकास करण्यासाठी सरकारचा नियम होता की ज्याला विमानतळ बांधण्याचा अनुभव नाही तो विमानतळ बांधू शकत नाही. मग मोदी सरकारनं नियमात बदल केला. आता नियम कुणी बनवला हे महत्वाचं नाही. पण नियम कुणी बदलला हे महत्वाचं आहे. अदानींना देशातील ६ महत्वाची विमानतळं दिली गेली", असा आरोप राहुल गांधींनी केला. 

ईडीचा धाक दाखवून अदानींना दिलं विमानतळसरकारवर आरोप करताना राहुल गांधी म्हणाले की, ईडीच्या कारवाईचा धाक दाखवून भारतातील सर्वात फायदेशीर विमानतळ अदानींच्या ताब्यात देण्यात आलं आहे. भारतातील विमानतळावरील एकूण वाहतूकीपैकी २४ टक्के वाहतूक अदानींचं व्यवस्थापन असलेल्या विमानतळांची आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीGautam Adaniगौतम अदानी