शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

रस्ते, बंदर, विमानतळ सारं अदानींनाच का दिलं?; राहुल गांधींचा भर सभागृहात मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:00 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्ली-

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उद्योगपती गौतम अदानींच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला. देशातील रस्ते, बंदर, विमानतळं सारंकाही अदानींनाच का बरं दिलं गेलं? असा थेट सवाल यावेळी राहुल गांधी यांनी सरकारला विचारला आहे. तसंच राष्ट्रपतींच्या अभिभाषणात अनेक योजनांचा उल्लेख केला गेला. पण अग्नीवीर योजनेबाबत फक्त एकदाच छोटासा उल्लेख केला गेला. त्यातही बेरोजगारी आणि महागाईचा उल्लेखही नव्हता. जनतेचं म्हणणं राष्ट्रपतींच्या अभिभाषणात अजिबात नव्हतं, असंही राहुल गांधी म्हणाले. 

गौतम अदानी आणि नरेंद्र मोदींचं काय नातं? संसदेत फोटो दाखवत राहुल गांधींचा सवाल...

"मी जिथं जिथं जातोय तिथं नुसतं अदानींचं नाव ऐकायला मिळतंय. केरळ असो तामीळनाडू असो किंवा संपूर्ण देश असो सर्व ठिकाणी अदानी...अदानी..अदानींचंच नाव दिसतंय. लोक मला भेटतात तेव्हा अदानींबाबत दोन-तीन प्रश्न विचारतात. ते कोणत्याही व्यवसायात सहजपणे शिरतात आणि यश प्राप्त करतात हे त्यांना कसं काय जमतंय? देशातील तरुणही मला हेच विचारतात आणि त्यांनाही जाणून घ्यायचं आहे की अदानींच्या यशाचं गुपीत नेमकं काय आहे?", असा टोला राहुल गांधी यांनी सरकारला लगावला. 

"अदानी ८ ते १० व्यवसायांमध्ये काम करतात. सिमेंट, पोर्ट, एनर्जी आणि इतर बरंच काही. मग लोक विचारायचे की २०१४ ते २०२२ पर्यंत अदानींच्या संपत्तीत इतकी मोठी वाढ कशी काय झाली? ते ८ अब्ज वरून १०८ अब्जांपर्यंत कसे काय पोहोचले? २०१४ मध्ये ते श्रीमंतांच्या यादीत ६०९ व्या क्रमांकावर होते. आज अदानी देशातील प्रमुख क्षेत्रांमध्ये आहेत. पंतप्रधान मोदींचं अदानींसोबतचं नातं नेमकं काय?", असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. 

'व्हायब्रंट गुजरात'पासून सुरू झाला अदानींचा खेळ"उद्योजकांना सोबत घेतल्यास गुजरातला व्हायब्रंट बनवता येईल आणि राज्य पुढे जाईल असा विचार मोदींनी केला. तेव्हापासूनच हा खेळ सुरू झाला. मोदी २०१४ मध्ये दिल्लीत आले. २०१६ मध्ये अदानी श्रीमंतांच्या यादीत ६०९ व्या क्रमांकावर होते आणि काही वर्षांत ते थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. काही वर्षांपूर्वी भारताच्या विमानतळाचा विकास करण्यासाठी सरकारचा नियम होता की ज्याला विमानतळ बांधण्याचा अनुभव नाही तो विमानतळ बांधू शकत नाही. मग मोदी सरकारनं नियमात बदल केला. आता नियम कुणी बनवला हे महत्वाचं नाही. पण नियम कुणी बदलला हे महत्वाचं आहे. अदानींना देशातील ६ महत्वाची विमानतळं दिली गेली", असा आरोप राहुल गांधींनी केला. 

ईडीचा धाक दाखवून अदानींना दिलं विमानतळसरकारवर आरोप करताना राहुल गांधी म्हणाले की, ईडीच्या कारवाईचा धाक दाखवून भारतातील सर्वात फायदेशीर विमानतळ अदानींच्या ताब्यात देण्यात आलं आहे. भारतातील विमानतळावरील एकूण वाहतूकीपैकी २४ टक्के वाहतूक अदानींचं व्यवस्थापन असलेल्या विमानतळांची आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीGautam Adaniगौतम अदानी