शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

सरस्वतीच्या फोटोमागची गोष्ट; संघाला शरण जाता जाता मनोहर का थांबले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 12:50 IST

सरस्वती नाकारणारे यशवंत मनोहर काही पहिले नाहीत. पण ‘समांतरा’ला पंखाखाली घेण्याच्या संघ-प्रयत्नांना त्यांनी खो दिला!

श्रीमंत माने

सारं सामसूम असताना, वड कलंडतील असे झंझावात कुठे गेले, असे विचारण्यासारख्या परिस्थितीत आंबेडकरी साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी सरस्वती मूर्तीच्या मुद्द्यावर विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार अखेरच्या क्षणी नाकारल्यामुळे तलावावर चार तरंग उमटले.  मकरसंक्रांत हा विदर्भ साहित्य संघाचा स्थापनादिन. यंदा एका दक्षिणपंथी लेखकाचे उत्तरायण सुरू व्हायचे होते, ते झाले नाही.  ‘गांधी का मरत नाही?’ - या पुस्तकाचे लेखक चंद्रकांत वानखडे यांनी मात्र याच समारंभात पुरस्कार स्वीकारला, याबाबत आपली भूमिकाही त्यांनी मांडली. पुरस्कार नाकारायचाच होता तर आधी स्वीकारायची संमती कशाला दिली, त्या पुरस्काराच्या निमित्ताने झालेले सत्कार का स्वीकारले, असा प्रतिहल्ला मनोहर यांच्यावर आता सुरू आहे. दुसरीकडे, साहित्य संघाच्या रूपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच मनोहर ‘संघम् शरणम्’ करीत होते, ते थबकल्याचे समाधान पुरोगामी वर्तुळात आहे.सरस्वती हे धर्माचे व शोषणव्यवस्थेचे प्रतीक असल्याने आपण तिच्या मूर्तीच्या साक्षीने पुरस्कार स्वीकारू शकत नाही, ही मनोहर यांची भूमिका आहे. सरस्वती नाकारणारे ते पहिले नाहीत. महाराष्ट्रात तर सावित्रीबाई फुले यांच्या कर्तबगारीमुळे ‘सरस्वती की सावित्री’ हा परंपरागत वाद आहे. 

विद्या बाळ विचारायच्या, ‘‘सरस्वतीच्या अस्तित्वाचा पुरावा नाही. सावित्रीच्या मात्र आहे. हिंदू देवीला नमन करून अन्य धर्मीयांच्या मुलांनी का शिकावे?’’ - मनोहरांची भूमिका या व्यवहारी युक्तिवादाच्या पुढची आहे. तिला प्रस्थापित-परिवर्तनवादी संघर्षाचे कंगोरे आहेत. आताशा वैचारिक सरहदी पुसट बनल्या आहेत. चळवळी क्षीण झाल्या आहेत. काही दशकांपूर्वी विद्रोही, परिवर्तनवादी चळवळ, साहित्यिकांचा राजकारणावर अंकुश होता. मधल्या काळात रिपब्लिकन पक्षाच्या शकलांसारखीच आंबेडकरी साहित्यिकांमध्ये फूट पडली. कुणी रामदास आठवलेंच्या गाेटात गेले, तर कुणी प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे किंवा अन्य कुणांच्या. प्रवाह सामाजिक, सांस्कृतिक असो की आणखी कोणता, समांतर प्रवाहाच्या प्रवासात एक टप्पा येतोच की समांतर प्रवाहातील अनेकांना मान्यतेचा, प्रतिष्ठेचा मोह खुणावतो. प्रस्थापितांचा मुख्य प्रवाह सामावून घेईल, असे वाटायला लागते. त्यासाठी आयुष्य ज्या प्रवाहात काढले त्याला थोडी बगल देण्याची हिंमत येते. पण, किमान महाराष्ट्राचा इतिहास सांगतो, की असे करणाऱ्यांना पुढे ना मुख्य प्रवाह खऱ्या अर्थाने सन्मान देतो, ना आधीच्या वर्तुळात पूर्वीचे स्थान राहते!

यशवंत मनोहर मोठे साहित्यिक, विचारवंत आहेत. काही दशकांपूर्वी गंगाधर पानतावणे यांच्या समरसता मंचावरील उपस्थितीवेळी त्यांना खडसावून जाब विचारणाऱ्यांमध्ये मनोहर आघाडीवर होते.  ग. त्र्यं. माडखोलकरांशी मैत्रीचे संबंध असल्यानेच गंगाधर पानतावणे यांची वैचारिक निष्ठा पातळ झाली व प्र. ई. सोनकांबळे यांच्यासोबत ते समरसता मंचाच्या व्यासपीठावर गेले, असे म्हणून त्यांना आंबेडकरी समाजापुढे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. तेच मनोहर आता म्हैसाळकरांच्या मैत्रीखातर थेट माडखोलकरांच्याच नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारत असतील, तर ते आंबेडकरी चळवळ, व समाज सहजपणे कसा स्वीकारील? थोड्याशा अपराधीपणासोबतच ही जाणीव अगदी शेवटच्या क्षणी यशवंत मनोहर यांना झाली असावी. पुरस्काराचा स्वीकार व नकार यातील मनोहर यांची चलबिचल या पृष्ठभूमीवर समजून घ्यायला हवी. ...किंवा ‘ते सरस्वतीच्या मूर्तीचे काय ते प्रत्यक्ष कार्यक्रमावेळी पाहू’, असे विदर्भ साहित्य संघाकडून सांगण्यात आले असावे. कदाचित कोरोना महामारीमुळे हा समारंभ ऑनलाइनच होईल, असा कयास असावा.

अर्थात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाआधी दोन वर्षे स्थापन झालेल्या, दोन वर्षांनंतर शताब्दी साजरी करणाऱ्या विदर्भ साहित्य संघाची सांस्कृतिक, वैचारिक बैठक, आतापर्यंतचे अध्यक्ष, साहित्य संमेलने, पुरस्कार वगैरेंबद्दल यशवंत मनोहर यांना नव्याने सांगावे, अशी स्थिती नाही. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी म्हटल्याप्रमाणे, सरस्वतीची मूर्ती किंवा धर्माधिष्ठित असे जे काही असेल तो संघाचा कुळाचार आहे व यशवंत मनोहरांचे तत्त्व सांभाळावे, म्हणून संघ तो साेडणार नाही. थोडक्यात, दोन्ही फळ्यांनी आपापल्या चौकटी पुन्हा घासूनपुसून ठळक बनविल्या आहेत. समांतर नावाचे जे काही असेल ते पंखाखाली घेण्याच्या संघाच्या प्रयत्नांना ठेच लागली आहे.

( लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत )

टॅग्स :Vidarbhaविदर्भmarathiमराठीsahitya akademiसाहित्य अकादमी