शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejriwal : "भाजपाला मत दिलं तर..."; अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली निवडणुकीबाबत मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 12:34 IST

AAP Arvind Kejriwal And BJP : अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. केजरीवाल म्हणाले की, 'आप' सरकारने दहा वर्षे प्रामाणिकपणे दिल्लीतील जनतेची सेवा केली. या काळात अशी अनेक कामं झाली जी देशातील इतर कोणत्याही सरकारने केली नाहीत. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी जनतेला भारतीय जनता पक्षाला (भाजपा) मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे.

दिल्लीमध्ये भाजपाची सत्ता आल्यास आप सरकारच्या मोफत वीज, आरोग्य सेवा, शिक्षण आणि महिलांसाठी बस प्रवासाच्या योजना बंद होतील, असा दावा त्यांनी केला. तसेच "तुम्ही भाजपाला मत दिल्यास, तुम्ही तुमची बिलं भरायची की तुमच्या मुलांची काळजी घ्यायची हे पाहावं लागेल."

"शून्य वीज बिल आता दिल्लीकरांसाठी सामान्य गोष्ट आहे, आप सत्तेत येण्यापूर्वी, वीज बिल १० हजार रुपयांपर्यंत पोहोचलं होतं. फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत. सत्तेत आल्यानंतर, मी मार्चमध्ये ही 'वाढीव' पाणी बिलं माफ करेन" असंही केजरीवालांनी म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधीच अरविंद केजरीवाल सतत पदयात्रा करत आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, भाजपाचे नेते वीरेंद्र सचदेवा यांनी दावा केला की, अरविंद केजरीवाल यांना माहीत आहे की, त्यांचा पक्ष आगामी निवडणुकीत हरणार आहे. ते आपल्या सरकारच्या योजनांबाबत लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीBJPभाजपाPoliticsराजकारण